Wednesday, December 31, 2014

#‎अतिसंभाव्य‬ १०० प्रश्नोत्तरे:- STI पूर्वपरीक्षा 2015


‪#‎चालू‬ घडामोडी:- डिसेंबर २०१४
०१) ‘भारतरत्न’ हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्काराचे ४४वे व ४५वे मानकरी कोण ठरले आहेत?
== स्वातंत्र्य सेनानी पंडित मदन मोहन मालवीय(मरणोत्तर) आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी
०२) मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर झालेले पंडित मदन मोहन मालवीय हे कितवे भारतीय आहेत?
== बारावे
०३) ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर झालेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे कितवे पंतप्रधान आहेत?
== सातवे
पंडित मदन मोहन मालवीय यांचा जन्म कधी व कोठे झाला?
== २५ डिसेंबर १८६१ मध्ये अलाहाबाद येथे(मृत्यू:-१२ नोव्हेंबर १९४६-वाराणसी)
०४) अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म कधी व कोठे झाला?
== सन २५ डिसेंबर १९२४ मध्ये ग्वाल्हेर येथे
०५) नरेंद्र मोदी सरकारने २५ डिसेंबर हा दिवस कोणता दिन म्हणून पाळण्याची घोषणा केली आहे?
== 'सुशासन दिवस' Good Governance Day
०६) आशियातील सर्वात मोठे निवासी विद्यापीठ म्हणून ओळखलेले जाणार्या बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना पंडित मदन मोहन मालवीय यांनी कोणत्या वर्षी केली होती?
== १९१६
०७) १९०९(लाहोर-रौप्यमहोस्तवी),१९१८(दिल्ली) १९३२(दिल्ली) आणि १९३३(कलकत्ता) असे चार वेळेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असलेली व्यक्ती कोण?
== पंडित मदन मोहन मालवीय
०८) हिंदुस्थान असेच इंडियन ओपीनियन,साप्ताहिक अभ्युदय या साप्ताहिकाचे संपादक व अलाहाबादमधून प्रकाशित होणा-या 'द लीडर' या इंग्लिश वर्तमानपत्राचेही संस्थापक असलेली व्यक्ती कोण?
== पंडित मदन मोहन मालवीय
०९) 'मकरंद' आणि 'झक्कड़सिंह' या टोपणनावाने कविता करणारे स्वातंत्रसैनानी कोण?
== पंडित मदन मोहन मालवीय
१०) पंडित मदन मोहन मालवीय यांचे काम आणि सेवाभावी वृत्तीने प्रभावित होऊन लोक त्यांना काय म्हणत असत?
== महामना
११) चौरीचौरा कटाच्या खटल्यात (१९२२) आरोपीची बाजू मांडणारे वकील कोण?
== पंडित मदन मोहन मालवीय
१२) पाचवर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान कोण?
== अटलबिहारी वाजपेयी
१३) १९७७ मध्ये मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे सरकार सत्तेवर असताना अटलबिहारी वाजपेयी यांनी कोणत्या खात्याचा कार्यभार संभाळला होता?
== परराष्ट्र खाते (२४ मार्च १९७७ ते २८ जुलै १९७९)
१४) १६ मे ते १ जून १९९६ आणि नंतर १९ मार्च १९९८ ते २२ मे २००४ पर्यंत भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान असलेला नेता कोण?
== अटलबिहारी वाजपेयी(तीनदा पंतप्रधान)
१५) भारतीय जनसंघ या पक्षाचे सहसंस्थापक आणि १९६८ ते १९७३ पर्यंत त्याचे अध्यक्षपद भूषविणारी व्यक्ती कोण?
== अटलबिहारी वाजपेयी
१६) अटलबिहारी वाजपेयी यांचे आदर्श कोण होते?
== डॉ॰ श्यामा प्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाल उपाध्याय
१७) भारतीय जनसंघाचे अध्यक्ष (१९६८-१९७३), जनसंघाच्या संसदीय दलाचे नेते (१९५५-१९७७), जनता पक्षाचे संस्थापक सदस्य (१९७७-१९८०), भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष (१९८०-१९८६) आणि भारतीय जनता पक्ष संसदीय दलाचे नेते (१९८०-१९८४, १९८६, १९९३-१९९६), ११ व्या लोकसभेतील विरोधी पक्षाचे नेते असलेली व्यक्ती कोण?
== अटलबिहारी वाजपेयी
१८) अटलबिहारी वाजपेयी १९५७ मध्ये संसदेवर कोणत्या मतदारसंघातून निवडून आले?
== बलारामपूर
१९) १९७७ च्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत हिंदीतून भाषण करणारी भारतीय व्यक्ती कोण?
== अटलबिहारी वाजपेयी
२०) मे १९९८ मध्ये वाजपेयी सरकारने जमिनीखाली ५ अणुचाचण्या कोठे केल्या?
== पोखरण(राजस्थान) Operation Shakti–98
२१) सदा ए सरहद या नावाने ओळखली जाणारी लाहोर-दिल्ली बससेवेची सुरवात १९९८ मध्ये करणारे पंतप्रधान कोण?
== अटलबिहारी वाजपेयी
२२) राष्ट्रधर्म (मासिक),पाञ्चजन्य (साप्ताहिक) आणि स्वदेश व वीर अर्जुन या दैनिकांचे संपादक म्हणून काम पाहणारी व्यक्ती कोण?
== अटलबिहारी वाजपेयी
२३) सन १९९९ साली तालिबान अतिरेक्यांनी IC - ८१४(काठमांडू कडून दिल्ली) या प्रवासी विमानाचे अपहरण केले होते ही घटना कोणत्या भारतीय पंतप्रधानाच्या काळात घडली आहे?
== अटलबिहारी वाजपेयी
२४) कारगिल युध्दाच्या वेळी १९९९ मध्ये ऑपरेशन विजय कोणत्या भारतीय पंतप्रधानाच्या काळात सुरु झाले?
== अटलबिहारी वाजपेयी
२५) २००१ साली दहशतवादी अफझल गुरु आणि त्याच्या साथीदारांनी संसदेवर हल्ला केला ही घटना कोणत्या भारतीय पंतप्रधानाच्या काळात घडली आहे?
== अटलबिहारी वाजपेयी
२६) माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना कोण-कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
== १९९२ - पद्मविभूषण
१९९३ - कानपूर विद्यापिठाची डॉक्टवरेट
१९९४ - लोकमान्य टिळक पुरस्कार
१९९४ - सर्वोत्कृष्ट संसदपटू
१९९४ - पंडित गोविंद वल्लभ पंत पुरस्कार
२०१४ - भारतरत्न
२७) राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजननेची सुरवात कोणत्या पंतप्रधानांच्या काळात सुरु झाली?
== अटलबिहारी वाजपेयी
२८) माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची साहित्य संपदा:-
नयी चुनौती, नया अवसर (२००२)
इंडियाज पर्स्पेक्टिीव्ह ऑन एशियान अँड एशिया- पॅसिफिक रिजन (२००३)
न्यू डायमेन्शन्स ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी (१९७९)
डिसीसिव्हज डेज (१९९९)
नॅशनल इंटिग्रेशन (१९६१)
शक्ती से शांती (१९९९)
राजनीती की रपतिली रहेम (१९९७)
विकारा बिंदू (हिंदी आवृत्ती) (१९९७)
कुछ लेख, कुछ भाषण (१९९६)
बॅक टू स्क्वेअर (१९९८)
डायनॅमिक्स् ऑफ ॲन ओपन सोसायटी (१९७७)
‘मेरी संसदीय यात्रा’ (चार खंड),
‘फोर डिकेडस इन पार्लमेंट’ (तीन खंडांत भाषणांचा संग्रह) १९५७- ९५,
‘लोकसभा में अटलजी’ (भाषणांचा संग्रह),
‘कैदी कवीराज की कुंडलियाए’
‘न्यू डायमेन्शन्स ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी (१९७७- ७९ या काळात परराष्ट्रमंत्री असताना केलेल्या भाषणांचा संग्रह)
२९) माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे कवितासंग्रह:-
ट्‌वेन्टी वन पोएम्स (२००३)
क्यार खोया, क्या२ पाया (१९९९)
मेरी इक्याावन कविताएँ (१९९५)
श्रेष्ठ कविता (१९९७)
‘अमर आग हैं’

३०) माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काही प्रसिध्द रचना:-
अंतरद्वंद्व
अपने ही मन से कुछ बोलें
ऊँचाई
एक बरस बीत गया
क़दम मिला कर चलना होगा
कौरव कौन, कौन पांडव
क्षमा याचना
जीवन की ढलने लगी साँझ
झुक नहीं सकते
दो अनुभूतियाँ
पुनः चमकेगा दिनकर
मनाली मत जइयो
मैं न चुप हूँ न गाता हूँ
मौत से ठन गई
हरी हरी दूब पर
हिरोशिमा की पीड़ा
३१) युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून खासदार राजीव सातव यांना हटवून पंजाबमधील आमदार असलेल्या कोणत्या नेत्याची नियुक्ती करण्यात आली आहे?
== अमरिंदर राजा ब्रार
३२) कोळसा खाणींचे वाटप करणाऱ्या तसेच विमा क्षेत्रात ४९ टक्के थेट विदेशी गुंतवणुकीला परवानगी देणाऱ्या दोन महत्त्वपूर्ण अध्यादेशांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कधी मंजुरी देण्यात आली?
== २४ डिसेंबर २०१४
३३) चीनमधील कोणत्या शहरातील सरकारी शिक्षण विभागाने शाळांमध्ये ख्रिसमससंबंधी कार्यक्रम साजरे करण्यावर बंदी घातली आहे?
== वेंझोऊ
३४) वेंझोऊ हे शहर चीनच्या पूर्व किनाऱ्याला असून इथे असलेल्या ख्रिश्चन बहुसंख्येमुळे त्या शहराला चीनचे ----- म्हणून संबोधले जाते
== जेरुसलेम
३५))उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कॅपिटल या कंपनीने कोणत्या जपानी वित्तीय संस्थेशी ख्रिसमसच्या मुहूर्तावर व्यावसायिक करार केला आहे?
== सुमिटोमो मित्सुई ट्रस्ट बँक
३६)एटीएम वापरावर शुल्क आकारण्यास परवानगी दिल्याबद्दल कोणत्या उच्च न्यायालयाने रिझर्व्ह बँकेसह इंडियन बँक्स असोसिएशन (आयबीए) आणि स्टेट बँकेलाही नोटिस पाठविली आहे?
== दिल्ली उच्च न्यायालय ( मुख्य न्यायमूर्ती जी. रोहिणी आणि न्या. पी. एस. तेजी यांच्या खंडपीठाने)
३७) कोणते शहर हे लोकसंख्येच्या तुलनेत भारतातील सर्वात जास्त सायकल वापरणारे शहर म्हणून ओळखले जात असल्याचा अहवाल नाशिक सायकल‌स्टि असोसिएशनने केलेल्या पहाणीत आढळून आला आहे?
== नाशिक
३८) चलनात असलेल्या नोटांत संगती असावी आणि बनावट नोटांची तस्करी रोखण्यास मदत व्हावी या अनुषंगाने रिझर्व्ह बँकेने २००५ पूर्वी नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर कधीपासून अंमलबजावणी होणार आहे?
== ३० जून २०१५
३९) आगामी महाराष्ट्र कबड्डी लीगसाठी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने पुणेस्थित कोणत्या स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनीशी करार केला आहे?
== गॉडविट एन्टरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड
४०) सात सक्कं त्रेचाळीस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
== किरण नगरकर
४१) अर्थ मंत्रालयाने कच्च्या तेलासाठी २.५ टक्के; तर वनस्पती तेलासाठी ५ टक्के आयात शुल्क वाढविले आहे.त्यामुळे कच्च्या तेलावरील एकूण आयात शुल्क आणि वनस्पती तेलावरील एकूण आयात शुल्क किती टक्के झाले आहे?
== अनुक्रमे ७.५% आणि १५%
४२) सुमात्रा बेटांच्या उत्तरेला समुद्रात ९.२ रिश्टएर तीव्रतेचा भूकंप बसल्याने प्रचंड त्सुनामी आली होती, त्या घटनेला २६ डिसेंबर २०१४ रोजी किती वर्षे पूर्ण होत आहे?
== दहा वर्षे
४३) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत मोहिमेत कोणत्या जिल्ह्यातील ४ लाख ८५ हजार ४७ लोकांनी जिल्ह्यातील १८९० ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवत नवा विश्व विक्रम केला असून या मोहिमेची नोंद आता गिनेस बुकात होणार असून, या मोहिमेचा देशभर प्रसार करण्यासाठी स्वतंत्र मोबाईल ऍप्लिकेशनदेखील लॉंच केले जाणार आहे. तसेच स्वच्छतेच्या मोहिमेचा संदेश देणारी दिनदर्शिकादेखील प्रसिद्ध केली जाईल?
== सबरकांथा(गुजरात)
४४) केंद्र सरकारची समुद्र विज्ञान संस्था (एनआयओ) आणि राज्याच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) यांच्या एकत्रित अहवालानुसार देशातील सर्वाधिक प्रदूषित समुद्रकिनारा कोणता?
== महाराष्ट्राचा समुद्रकिनारा
४५) संगणक आणि टॅबलेट अश्या दोन्ही प्रकारे वापर करता येणारे व विंडोज ८.१ कार्य प्रणालीवर चालणारे कोणते उपकरण माइक्रोसॉफ्ट कंपनीने सादर केले आहे?
== विंडोज टू इन वन
४६) दहशतवादाशी संबंधित खटले तातडीने निकाली काढण्यासाठी विशेष लष्करी न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय नुकताच कोणत्या देशाने घेतला आहे?
== पाकिस्तान
४७) ‘देशभक्त नथुराम गोडसे’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याच्या मागणीसंदर्भात अखिल भारतीय हिंदू महासभेविरोधात पुणे सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते असलेल्या कोणत्या व्यक्तीने ही याचिका दाखल केली आहे?
== हेमंत पाटील
४८) वाढते सायबर गुन्हे रोखण्यासाठी गृह खात्याने तज्ज्ञ अभ्यास गटाची नियुक्ती केली असून यात कोणाचा समावेश करण्यात आला आहे?
== पुण्यातील सी-डॅकचे महासंचालक डॉ. रजत मुना, बंगळूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे प्रा. कृष्णन, सीहीआरटी-ईनचे महासंचालक डॉ. गुलशन राय, आयआयटी कानपूरचे प्रा. डॉ. मणिंद्र अग्रवाल, बंगळूरआयआयटीचे प्रा. डॉ. डी. दास यांचा समावेश असेल, तर गृह खात्याचे सहसचिव कुमार अलोक हे या तज्ज्ञ गटाचे समन्वयक असतील.
४९) केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने खासगी कंपन्यांना कोळसा खाणींचे "ई ऑक्श न‘द्वारे पुनर्वाटप करण्यासंदर्भातील अध्यादेश पुन्हा एकदा प्रसिद्ध करण्यास संमती दिली असून या अध्यादेशान्वये पहिल्या टप्प्यात एकूण किती खाणींचे पुनर्वाटप केले जाणार आहे?
== १०१ खाणींचे
सार्वजनिक कंपन्यांना:-३६ खाणी
उर्जा मंत्रालयास:- ६३ खाणी
पोलाद व सिमेंट उद्योगासाठी:- २ खाणी
५०) दादासाहेब फाळके पुरस्काराने(२०१०) गौरविण्यात आलेले व "एक दुजे के लिए‘ या चित्रपटाचे प्रसिद्ध तमिळ दिग्दर्शक असलेल्या कोणत्या व्यक्तीचे नुकतेच निधन झाले आहे?
== के. बालचंदर
५१) कवितालया प्रॉडक्शीनच्या माध्यमातून अनेक हिट चित्रपटांची निर्मिती करणारे प्रसिद्ध तमिळ दिग्दर्शक कोण?
== के. बालचंदर
५२) 'Why I Assassinated Gandhi' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
== नथुराम गोडसे
५३) 'मी नथुराम गोडसे बोलतोय' नाटकाचे लेखक कोण आहेत?
== प्रदीप दळवी
५४) 'गांधीहत्या आणि मी' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
== गोपाळ गोडसे
५५) 'पंच्चावन्न कोटींचे बळी' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
== गोपाळ गोडसे
५६) 'Why I killed Gandhi' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
== नथुराम गोडसे
५७) विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी कोणाच्या नावाची घोषणा केली आहे?
== राधाकृष्ण विखे पाटील(कॉंग्रेस पक्ष)
५८) जगात सर्वांत मोठे सर्च इंजिन म्हणून वापरात असलेल्या गुगलने आपल्या कोणत्या बहुचर्चित स्वयंचित कार चे नुकतेच सादरीकरण केले आहे?
== गुफी
५९) देशातील कोणत्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीत मतदारांना नकाराधिकाराचा (नोटा) अधिकार मिळणार नाही. हे मतदान यंत्राद्वारे होणार असले तरी यात 'नोटा'ची तरतूद नाही?
== अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या (भिंगार)
६०) रामजन्मभूमी वादात मुस्लिमांची बाजू मांडणाऱ्या सात प्रमुख याचिकाकर्त्यांपैकी एक असलेल्या कोणत्या याचिकाकर्त्याचे नुकतेच निधन झाले आहे?
== मोहम्मद फारूक(१०० वय वर्षे)
६१) यंदाच्या यश चोप्रा स्मृती राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले महानायक कोण?
== अमिताभ बच्चन
६२) स्पंदन आर्ट संस्थेतर्फे दिला जाणारा महमद रफी जीवन गौरव पुरस्कार यावर्षी कोणास प्रदान करण्यात आला आहे?
== ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर
६३) विमा क्षेत्रात FDI वाढ व कोळसा खाण वितरणासाठी ई-लिलाव पद्धती आणण्याबाबतच्या अध्यादेशावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कधी स्वाक्षरी.केली?
== २६ डिसेंबर २०१४
६४) ऑस्ट्रेलियन क्रिकेटर फिलिप ह्युज याच्या स्मरणार्थ एव्हरेस्टवर ठेवणार बॅट.नेण्याचा उपक्रम कोणत्या देशाची क्रिकेट संघटना राबविणार आहे?
== नेपाळ क्रिकेट संघटना
६५) सोनितपूरमध्ये बोडो अतिरेक्यांविरुद्ध आसाम रायफल्स, निमलष्करी दल आणि लष्करी जवानांची संयुक्त कारवाई सुरू केली असून या कारवाईस काय नाव देण्यात आले आहे?
== मिशन ऑल आऊट
६६) झारखंडचे नवे मुख्यमंत्री.म्हणून कोणत्या बिगरआदिवासी चेहऱ्याला प्रथमच संधी मिळत आहे?
== रघुवर दास- भाजप (जमशेदपूर पूर्व मतदारसंघ)
६७) प्रवाशांसाठी ऑनलाइन रिचार्ज सुविधा सुरु करणारी मेट्रो सेवा कोणत्या शहरात पुरविली जाणार आहे?
== मुंबई
६८) देशात वाहनचोरीमध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागला आहे?
== दुसरा(पहिल्या स्थानावर उत्तर प्रदेश)
६९) सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (सी-डॅक) यांनी दिल्ली येथे माहिती तंत्रज्ञान व संचारण मंत्रालयातर्फे जगातील सर्वात आटोपशीर महासंगणक प्रणालीचे अनावरण केले.त्याचे नाव काय आहे?
== परम शावक
७०) महाराष्ट्र वीज मंडळाने आपल्या तीनही कंपन्यांमधील तमाम वीज कर्मचाऱ्यांना तीन लाख रुपयांचे विमा सुरक्षा कवच प्रदान करण्यासाठी कोणत्या कंपनीसोबत करार केला आहे?
== ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी
७१) इंडोनेशियातून सिंगापूरला जाणारे 'एअर एशिया'चे विमान उड्डाणानंतर बेपत्ता झाले आहे.या विमानाचा फ्लाईट नंबर काय होता?
== क्यूझेड ८५०१ (एअरबस ३२०-२००' प्रकारातील)
७२) 'एअर एशिया'च्या क्यूझेड ८५०१ फ्लाईट नंबर असलेल्या विमानाने इंडोनेशियाच्या सुरबाया येथून सिंगापूरसाठी स्थानिक वेळेनुसार पहाटे ५.२० वाजता उड्डाण केले होते हे विमान सकाळी ८.३० वाजता सिंगापूरच्या कोणत्या विमानतळावर उतरणार होते?
== चंगी
७३) एअर एशियाचे क्यूझेड ८५०१ हे विमान सुमात्रा बेटाच्या पूर्व किनाऱ्यावरील कोणत्या परिसरात बेपत्ता झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे?
== पूर्व बेलितुंग
७४) दक्षिण आशियात लोकप्रिय असलेली कोणती हवाई सेवा भारतात हवाई सेवा देणारी पहिली विदेशी कंपनी आहे?
== एअर एशिया
७५) भारतात टाटा सन्स आणि उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांचे व्याही अरुण भाटिया यांच्याशी भागिदारी करून एअर एशियाने सेवा सुरू केली केली. १२ जून २०१४ रोजी एअर एशियाचे भारतातील पहिले उड्डाण बेंगळुरूहून कोठे झाले होते?
== गोवा
७६) अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या तब्बल १३ वर्षांच्या हस्तक्षेपाला/युध्दाला अधिकृतपणे पूर्णविराम दिला आहे?
== २८ डिसेंबर २०१४ (अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी)
७७) सोनी पिक्चरच्या कोणत्या चित्रपटात उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन याच्या हत्येच्या कटाचे कथानक दाखविले असल्याने कोरियाने या चित्रपटाला विरोध केला होता?
== द इंटरव्ह्यू
७८) पेशावरमधील शाळेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि वरिष्ठ तालिबानी कमांडर असलेल्या कोणत्या दशहतवाद्यास पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या जवानांनी खैबर एजन्सीमध्ये ठार केले आहे?
== सद्दाम
७९) सद्दाम हा तेहरीकी तालिबान पाकिस्तानच्या (टीटीपी) कोणत्या ग्रुपचा सदस्य होता?
== तारिक गदर ग्रुप
८०) 'असोचेम-पीडब्ल्यूसी'च्या अहवालानुसार सध्या देशातील प्रति व्यक्ती ऑनलाइन शॉपिंगची मर्यादा वार्षिक सरासरी किती हजार रुपये आहे?
== सहा हजार रुपये
८१) मराठी माणसाच्या व्यवस्थापन कौशल्याला सातासमुद्रापार पोहोचविणाऱ्या मुंबईतील डबेवाल्यांचे नेते असलेल्या कोणत्या व्यक्तीचे नुकतेच निधन झाले आहे?
== गंगाराम तळेकर
८२) अमेरिकेत फिलाडेल्फिया येथे झालेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात डबेवाल्यांचे प्रतिनिधी म्हणून रघुनाथ मेदगे यांच्यासह कोण उपस्थित होते?
== गंगाराम तळेकर
८३) दिल्ली आयआयटीचे संचालक असलेल्या कोणत्या व्यक्तीने कार्यकाळ संपण्यापूर्वीच राजीनामा दिला आहे?
== रघुनाथ शेवगावकर
८४) सरकारी कर्मचारी अधियम, २०१४ नुसार सरकारी कर्मचाऱ्याला त्याची पत्नी; तसेच त्याच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्यांची संपत्ती, देणी या बद्दलची माहिती कधीपर्यंत सरकारला द्यावी लागेल?
== ३० एप्रिल २०१५ पर्यंत (लोकपाल कायद्याअंतर्गत)
८५) संसदेने दोन वर्षांपूर्वी मंजूर केलेला भूसंपादन कायदा १ जानेवारी २०१४ला अस्तित्वात आल्यानंतर त्यातील कलम १०५ (३) नुसार कधीपर्यंत १८८५ चा भूसंपादन (खाण) कायदा, १९५६ चा राष्ट्रीय महामार्ग कायदा, १९६२ चा अणुऊर्जा कायदा, १९७८ चा मेट्रो रेल्वे कायदा, १९८९ चा रेल्वे कायदा यासारख्या केंद्र सरकारशी संबंधित असलेल्या तब्बल १३ कायद्यांमध्ये दुरुस्त्या करायच्या आहेत.
== १ जानेवारी २०१५ पूर्वी
८६) सन टीव्हीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (सीओओ) असलेल्या कोणत्या व्यक्तीस लैंगिक छळाच्या आरोपावरून चेन्नई पोलिसांच्या सेंट्रल क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे?
== सी. प्रवीण
८७) सहा हजार कोटी रुपयांचा अंमली पदार्थांच्या घोटाळ्यातील सहभागाप्रकरणी पंजाबचे महसूलमंत्री असलेल्या कोणत्या नेत्याची अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) चौकशी करण्यात आली?
== विक्रमसिंग मजिठिया
८८) मुंबई- काठमांडूला जाणार्या जेट एअरवेजच्या कोणत्या विमानाला एका पक्ष्याची धडक बसल्याने लागलेल्या आगीनंतर आपत्कालीन परिस्थितीत तातडीने त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवावे लागले?
== ९ डब्ल्यू २६८ हे बोइंग ७३७
८९) फेसबुकने सरत्या वर्षाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी कोणती भेट दिली होती. मात्र, फेसबुकने दिलेल्या या भेटीमुळे अनेकांना मनस्ताप झाल्याचे लक्षात आल्यानंतर फेसबुकने आपल्या युझर्सची माफी मागितली आहे?
== इयर इन रिव्ह्यू
९०) रशियातील सेंट पिट्सबर्ग येथील 'रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एन्फ्लुएन्झा'मधील शास्त्रज्ञांच्या गटाने कोणत्या रोगाविरूध्द रोगप्रतिकारक लस तयार केली आहे?
== इबोला
९१) भूसंपादन अधिक सुलभ करण्यासाठी सरकारने २९ डिसेंबर २०१४ रोजी अध्यादेश काढला यानुसार सध्या लागू असलेल्या कायद्यातील काही तरतुदी शिथिल करण्याची व कोणते नवे कलम समाविष्ट करण्याची तरतूद या वटहुकुमात असेल?
== '१०ए’ हे पुनर्वसन आणि भरपाईसंबंधीचे नवे कलम
९२) महाराष्ट्रातील कोणती नगरपरिषद शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे?
== अलिबाग
९३) ‘छोटे जलाराम बाप्पा’ म्हणून भक्तांचे प्रेरणास्थान असलेल्या आणि गुजराती समाजाचे श्रद्धास्थान व मानवसेवेचे आदर्श असलेल्या कोणत्या संतांचे नुकतेच निधन झाले आहे?
== संत हरिराम बाप्पा
९४) शासनाने महाराष्ट्राच्या समतोल प्रादेशिक विकासाच्या प्रश्नांवरील अभ्यासासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमली होती. या समितीमध्ये नऊ सदस्य असून नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव के.बी. बक्षी समितीचे सदस्य सचिव आहेत?
== डॉ.विजय केळकर
९५) ‘चतुरंग प्रतिष्ठान ही संस्था साहित्य चळवळीत तब्बल ४०हून अधिक वर्षे सातत्याने कार्यरत आहे. त्याच्या २४व्या ‘रंगसंमेलना’त जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले साहित्यिक कोण?
== ज्येष्ठ नाटककार-दिग्दर्शक रत्नाकर मतकरी
९६) पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या कौटुंबिक निवृत्तिवेतनात पहिल्या पत्नीसह दुस-या पत्नीलाही समान वाटा दिला गेला पाहिजे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या कोणत्या खंडपीठाने दिला आहे.तसेच सध्या हा नियम भारतीय रेल्वेतच असून, शासनाच्या इतर विभागांतही त्याचा अवलंब करावा, अशी सूचना न्यायालयाने केली आहे?
== नागपूर खंडपीठाने
९७) रेल्वे कर्मचारी निवृत्तिवेतन योजनेतील कोणत्या नियामामधील उपनियम ७ (आय)(ए) मध्ये पहिल्या व दुसऱ्या पत्नीमध्ये निवृत्तिवेतनाचे समान वाटप करण्याची तरतूद करण्यात आली आहे?
== नियम ७५
९८) हिंदू विवाह कायद्याच्या कोणत्या कलमानुसार पहिली पत्नी जिवंत असेल आणि तिच्यासोबत घटस्फोट झाला नसेल तर दुसऱ्या महिलेसोबत केलेला विवाह अवैध ठरतो?
== कलम ११
९९) जालना येथील रहिवासी प्रिया हरिभाऊ सुरडकर हिने तब्बल किती तास मेहंदी रेखाटन करीत विक्रमाला गवसणी घातली़ असून विश्वविक्रम (गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड ) प्रस्थापित केला जाणार आहे?
== ७४ तास
१००) नक्षलींचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन २००४ साली गडचिरोली जिल्ह्यासह गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, नांदेड आणि यवतमाळ या जिल्ह्यांतील एकूण ३७ तालुके नक्षलग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले होते परंतु आता गृहविभागाकडून २६ डिसेंबर २०१४ रोजी किती तालुके नक्षलमुक्त घोषित करण्यात आले आहे?
== २२ तालुके

No comments:

Post a Comment