Thursday, February 5, 2015

CSAT ची तयारी कशी करावी ?

#‎सीसॅट_परीक्षेची_तयारी‬
’स्कील, स्केल व स्पीड (Skill, Scale & Speed ) ’ या तीन
शब्दांद्वारे भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी भारतीय
प्रशासनाला गतिमानता देण्यासाठी जी व्यूहरचना आखलेली आहे,
तिचा मूळ आधार म्हणजे भारतीय प्रशासनाची प्रचंड ताकद.
भारतासारख्या खंडप्राय देशामध्ये आर्थिक व सामाजिक
परिवर्तनाला दिशा देताना प्रशासनाची भूमिका नेहमीच
मध्यवर्ती राहिली आहे. त्यातही गेल्या 20 वर्षाच्या आर्थिक
सुधारणांच्या काळात झालेल्या परिवर्तनाच्या बर्या्वाईट
परिणामाशी जुळवून घेताना खंबीर प्रशासकीय नेतृत्वाचा कस
लागलेला आहे. असे खंबीर नेतृत्व फक्त लोकनेत्यांचे असून चालत नाही,
तर तितकेच खंबीर किंवा त्यापेक्षा जास्त कार्यक्षम असे प्रशासकीय
अधिकार्यां चे नेतृत्व आवश्यक असते. 2022
साली भारताच्या स्वातंत्र्याला 75 वर्षे पूर्ण होत असल्याने
मोदी सरकारने व्हिजन 2022 अंतर्गत देशातील 75
कोटी तरुणाईला सक्षम करण्यासाठी जी काही व्यूहरचना आखण्याचे
ठरविले आहे त्यात वरील तीन शब्दांना मध्यवर्ती स्थान आहे. त्यामुळे
स्पर्धा परीक्षा देऊन प्रशासनात करिअर करू
इच्छिणार्या् तरुणांनी त्यांचे व्यक्तिमत्त्व विकसित करताना या पैलूकडे
लक्ष दिले पाहिजे.

* स्पर्धा परीक्षेत यशस्वी होण्यासाठी आवश्यक क्षमता व कौशल्ये
( capacities & skills) -
गेल्या 3 वर्षापासून युपीएससी, एमपीएससी किंवा इतर आयोगाद्वारे
परीक्षा पद्धती आणि अभ्यासक्रमात जो बदल करण्यात आलेला आहे,
त्याचा नेमका उद्देशच अशाप्रकारच्या व्यक्तिमत्त्वाचे उमेदवार
निवडणे हा आहे. प्रशासकीय अधिकारी म्हणून यशस्वी व्हायचे असेल
तर उमेदवाराला स्वतःचे व्यक्तिमत्त्व विकसित करताना पुढील
क्षमता वृद्धीवर भर देणे आवश्यक आहे -
1) परिस्थितीची आकलन करण्याची क्षमता
2) विश्लेिषण क्षमता
3) निर्णय क्षमता
4) संवाद कौशल्य
5) सर्वांना बरोबर घेऊन जाण्याची क्षमता
व्यक्तिमत्त्वात वरील क्षमतांचा विकास करण्यासाठी विद्यार्थ्यांना
काही कौशल्ये त्यांच्यात जाणीवपूर्वक विकसित करावी लागतात.
ही कौशल्य कोणती असावीत, याबाबत आत्तापर्यंत कोठारी कमिशन,
सतिशचंद्र आयोग, वाय. के. अलघ आयोग,
विराप्पा मोईली प्रशासकीय आयोग, एस. के. खन्ना समिती, डॉ. अरुण
निगवेकर समिती, यासारख्या तज्ज्ञ समित्यांनी वारंवार
शिफारशी केल्या आहेत. या सर्व शिफारशींचा रोख पाहता सद्यस्थितीत
स्पर्धा परीक्षेत उत्तीर्ण व्हायचे असेल तर उमेदवाराला पुढील कौशल्ये
विकसित करणे नुसते आवश्यकच नसून अनिवार्यसुद्धा आहे -
1) ज्ञान/सामग्री संकलन
2) आकलन व अभिवृत्ती
3) अंदाज बांधण्याची कुवत
स्पर्धा परीक्षेमध्ये उमेदवाराकडे असलेले ज्ञान
किंवा सामग्री तपासण्यासाठी विहित अभ्यासक्रमावर जे काही प्रश्न्
विचारले जातात त्यांचे एकूण प्रश्ना तील प्रमाण सुमारे 50 टक्के
असते. आकलन-अभिवृत्ती क्षमता तपासणार्या् प्रश्नां चे प्रमाण 35
टक्के असते, तर अंदाज बांधण्याची कुवत तपासणार्याअ प्रश्नां्चे
प्रमाण 15 टक्के पर्यंत असते. त्यामुळे
स्पर्धा परीक्षेची तयारी करताना निव्वळ अभ्यास (वाचन-मनन-चिंतन)
करून चालत नाही तर विविध प्रकारच्या क्षमता व कौशल्ये विकसित
करावी लागतात.
* अभिवृत्ती (Aptitude) -
प्रशासकीय क्षेत्रामध्ये
भरती करण्यासाठी घेतल्या जाणार्या परीक्षांचा रोख
हा उमेदवाराची अभिवृत्ती (Aptitude) तपासण्याचा असतो.
ही अभिवृत्ती म्हणजे एखाद्या उमेदवाराकडे त्याची निवड झाल्यानंतर
अधिकारीपदासाठी जे प्रशिक्षण दिले जाते ते प्रशिक्षण सक्षमपणे
घेण्याची कुवत. तसेच स्पर्धा परीक्षांची तयारी करणार्याद
उमेदवारासाठी अॅाप्टीट्यूड म्हणजे "The capacity to perform a
given task with available resources to achieve a
set target in a given time frame " ‘ थोडक्यात,
एखाद्या उमेदवाराकडे प्राप्त स्थितीत उपलब्ध साधनांच्या सहाय्याने
दिलेले उद्दिष्ट वेळेत पूर्ण करण्याची क्षमता आहे की नाही हे तपासणे
म्हणजे त्याची अभिवृत्ती तपासणे.
2011 पासून युपीएससीने, तर 2012 पासून एमपीएससीने
अशा प्रकारच्या अभिवृत्ती चाचणीचा पूर्व परीक्षेत समावेश केला आहे.
तसेच 2013 पासून युपीएससीने मुख्य परीक्षेमध्येसुद्धा 250
गुणांसाठी अशाप्रकारच्या अभिवृत्ती चाचणीचा 1 पेपर समाविष्ट
केलेला आहे. अभिवृत्ती चाचणीचा मूळ उद्देश
एखाद्या उमेदवाराची विचार करण्याची कुवत
आणि ओरिजिनॅलिटी तपासणे हा आहे. त्यामुळे
या परीक्षांची तयारी करताना उमेदवाराने आपल्यामध्ये प्रशासकीय
अभिवृत्ती कशी विकसित होईल याकडेच लक्ष देणे आवश्यक ठरते.
ही अभिवृत्ती पूर्व, मुख्य आणि मुलाखत या तिन्ही पातळ्यावर
तपासली जाते.
* पर्याप्त व शाश्ववत अभ्यास (Optimum & Sustainable
Study) -
स्पर्धा परीक्षेचा यशाभिमुख अभ्यास हा नेहमीच उमेदवाराच्या उपजत
गुणाना चालना देणारा असतो. एखाद्या परीक्षेत उत्तीर्ण
होण्यासाठी आवश्यक व पुरेसा अभ्यास म्हणजे पर्याप्त अभ्यास, तर
आज केलेला अभ्यास फक्त एकच परीक्षा पास होण्यासाठी नाही तर
विविध परीक्षा पास होण्याबरोबरच,अधिकारी म्हणून कार्यरत
असतानाही उपयुक्त ठरला तर तो शाश्वहत अभ्यास !
येथे अभ्यासाची उत्पादकता महत्त्वाची आहे. अभ्यास ही गुंतवणूक
समजून त्याद्वारे सतत परतावा मिळालाच पाहिजे, असे नियोजन हवे.
एकदा केलेला अभ्यास अनेक परीक्षा पास होण्यासाठी उपयोगी पडलाच
पाहिजे, म्हणून अभ्यास किती केला त्यापेक्षा कसा याकडे लक्ष द्यावे.
अभ्यासाची उत्पादकता ही वर्षात, महिन्यात, दिवसात
मोजण्यापेक्षा ती प्रतितास मोजली पाहिजे. 1 तास केलेला अभ्यास
हा किमान 1 गुण मिळविण्यासाठी उपयुक्त पडलाच पाहिजे हे लक्षात
घेऊन त्यात सातत्य ठेवण्यासाठी उजळण्या कराव्यात.
* 2015 च्या सीसॅटची तयारी -
पूर्व परीक्षेसाठी आलेल्या 400
गुणांच्या अभ्यासक्रमाची तयारी करावयाची असेल तर प्रतिदिन सुमारे 6
ते 7 गुणांची तयारी करावी लागते.
कोणत्याही स्पर्धा परीक्षेची तयारी करावयाची असेल तर
त्या परीक्षेसाठी असलेल्या एकूण गुणांची संख्या लक्षात घेऊन
प्रत्येक गुणासाठी 1 तासाचा अभ्यास याप्रमाणे नियोजन केल्यास सदर
परीक्षेसाठी उमेदवाराची किमान स्तरावरची तयारी होऊ शकते.
काही उमेदवारांना कदाचित यापेक्षा जास्त अभ्यास करावयाची गरज
असू शकते, पण अभ्यासाची किमान पातळी मात्र संबंधित
तासापेक्षा कमी असून चालत नाही. उदा. युपीएससी सीसॅट
परीक्षेसाठी एकूण 400 गुण आहेत. म्हणजेच
या परीक्षेच्या तयारीसाठी कोणत्याही उमेदवाराने किमान 400
तासांचा अभ्यास करणे अनिवार्य आहे. या 400 तासांचे नियोजन
करताना प्रतिदिन किमान 10 तास अभ्यास केल्यास 40 दिवस लागू
शकतात आणि किमान 4 तास प्रतिदिन अभ्यास केल्यास 100 दिवस
लागू शकतात. थोडक्यात, या परीक्षेच्या परिपूर्ण तयारीसाठी किमान
40 ते कमाल 100 दिवस पुरेसे ठरू शकतात. अर्थात
उमेदवाराच्या कुवतीनुसार आणि आकलन क्षमतेनुसार यात बदल
करता येतो.
गेल्या काही वर्षात पूर्वपरीक्षेत उत्तीर्ण होण्यासाठी खुल्या गटातील
उमेदवारासाठी 400 पैकी किमान 250 गुणांचे मानक युपीएससीसाठी, तर
एमपीएससीसाठी किमान 150 गुणांचे मानक आवश्यक बनले आहे.
2015 च्या परीक्षेतसुद्धा हाच कल राहण्याची शक्यता असल्याने
प्रत्येक उमेदवाराचे 5 एप्रिल पर्यंतच्या अभ्यासाचे उद्दिष्ट हे 400
पैकी 250 गुण मिळविणे हेच असले पाहिजे.
* सामान्य अध्ययन पेपर 2 ची तयारी -
काही उमेदवारांच्या अनुभवावरून पूर्वपरीक्षेत उत्तीर्ण व्हावयाचे असले
तर या परीक्षेतील पेपर 2 मध्ये चांगले गुण मिळविणे आवश्यक आहे.
पेपर 2 मधील असलेल्या एकूण 7 घटकांची तयारी करताना त्याचे तीन
गटात वर्गीकरण करावे.
पहिला गट हा आकलनाचा, ज्यात सर्वसाधारण आकलन
आणि इंग्रजी भाषेचे आकलन यावर मिळून सुमारे 40 प्रश्नर म्हणजेच
परीक्षेतील निम्मा भर असतो. ज्यांची आकलन
घटकाची तयारी चांगली असते त्यांना या 40 पैकी 35 पेक्षा जास्त
प्रश्नांनची उत्तरे काढता आल्यास त्यांना किमान 85 पेक्षा जास्त गुण
येथेच मिळू शकतात.
दुसरा गट म्हणजे निर्णयक्षमता+समस्या निराकरण, संवाद कौशल्य
+अंतरव्यक्तीगत कौशल्य या अभ्यासघटकांचा. आत्तापर्यंत सदर
घटकावर 7 ते 8 प्रश्नि विचारले गेले आहेत. या प्रश्नांकना निगेटिव्ह
मार्किंग नसल्याने येथे थोड्याफार सरावाने येथे पैकीच्या पैकी म्हणजे
20 गुण मिळू शकतात.
उर्वरित तिसरा घटक म्हणजे तर्कसंगत विश्लेतषण + बुद्धिमापन
चाचणी + अंकज्ञान. या तीनही घटकावर मिळून दरवर्षी सुमारे 30 भर
प्रश्नि विचारले जातात. यामध्ये 20 प्रश्नां ची उत्तरे आल्यास
उमेदवारास 50 गुण मिळू शकतात.
अशारीतीने सरासरी अभ्यास केल्यास पेपर 2 मध्ये 85 + 20 + 50 =
150 पर्यंत गुण मिळू शकतात. येथे एक लक्षात घेतले पाहिजे
की या पेपरची तयारी म्हणजे निव्वळ सराव आणि सराव असेच
असल्याने विविध नमुना प्रश्न पत्रिका वेळ लावून 2 तासात
सोडविण्याची प्रॅक्टिस अनिवार्य आहे. त्यातही दररोज एका तासामध्ये
12 ते 15 उतार्याघवरील 40 प्रश्नी सोडविण्याचा सराव करणे, तसेच
अर्ध्या तासामध्ये गणित, बुद्धिमापन आणि तर्कक्षमतेच्या 30
प्रश्नां ची उत्तरे शोधण्याचा सराव करणे फार महत्त्वाचे आहे.
आकलन घटकाला जास्त महत्त्व असल्याने उमेदवाराची वाचन
क्षमता खूपच प्रगल्भ असणे आवश्यक आहे. येथे वाचण्याचा वेग
वाढविण्याबरोबरच संबंधित उतार्या्मध्ये
नेमका कोणता मध्यवर्ती मुद्दा आहे ते समजून घेऊन त्यावरील
प्रश्नां ची उत्तरे शोधण्याचा सराव सतत करणे आवश्यक आहे.
परीक्षेपर्यंत सुमारे 500 उतारे अशाप्रकारे सरावासाठी वापरले तर
आकलन क्षमतेवरील बहुतेक सर्व प्रश्नांआची उत्तरे शोधणे सोपे जाऊ
शकते.
अंकगणित, बुद्धिमापन, तर्कक्षमता घटकाचा अभ्यासक्रम खूपच
विस्तृत असल्याने त्यावर सुमारे वेगवेगळ्या 50 प्रकारचे प्रश्ने
विचारले जातात ते युपीएससीच्या गेल्या 3 व एमपीएससीच्या 2
पेपरवरून लक्षात येते. त्यामुळे असे 50 प्रकार लक्षात घेऊन
त्याबाबतच्या क्लृप्त्या जाणून घेतल्या तर हे प्रश्नए
सोडविण्यासाठी 30 सेकंद पुरेसे ठरू शकतात.
निर्णयक्षमता, समस्या निराकरण या घटकावरील प्रश्न
सोडवताना सध्याच्या प्रशासनाचा जो मुख्य उद्देश आहे - सर्व
समावेशकता, सामाजिक पुढाकार, सामाजिक न्याय, प्रशासकीय
नियमांची चौकट, सर्वांना बरोबर घेऊन जायचा दृष्टिकोन, या सर्व
बाबी लक्षात घेणे आवश्यक आहे.
* सामान्य अध्ययन पेपर 1 ची तयारी व संदर्भ साहित्य-
सामान्य अध्ययन पेपर 1 ची तयारी करताना मूलभूत साहित्य म्हणून 8
वी ते 10
वी च्या एनसीईआरटीच्या युपीएससीच्या अभ्यासक्रमाशी संबंधित
असलेली इतिहास, भूगोल, राज्यशास्त्र, अर्थशास्त्र, पर्यावरण,
सामान्यविज्ञान, माहिती तंत्रज्ञान, संख्याशास्त्र,
या विषयांच्या पुस्तकांचा अभ्यास केल्यास
आपल्याला पुरेशी माहिती उपलब्ध होऊ शकते. पण
या माहितीच्या आधारे आपण परीक्षेत येणार्याअ 100 पैकी 50
प्रश्नां चीच उत्तरे शोधू शकतो. उर्वरित 50 प्रश्नां ची उत्तरे
शोधण्यासाठी केंद्र शासनाच्या माहिती प्रसारण विभागामार्फत
प्रकाशित होणार्याक पुढील साहित्याचा वापर करावा लागतो -
इंडिया 2015, योजना, कुरुक्षेत्र,www.vikaspedia वरील माहिती,
शासनाच्या विविध खात्यांची परिपत्रके. याशिवाय ‘द हिंदू‘, फ्रंटलाईन,
मेनस्ट्रीम, इकॉनॉमिक पॉलिटिकल विकली, द इकॉनॉमिस्ट, इंडिया टुडे,
टाइम यासारख्या वृत्तपत्रातून प्रकाशित
झालेल्या महत्त्वाच्या बातम्या परीक्षेतील प्रश्नांुची उत्तरे
शोधण्यासाठी उपयुक्त ठरतात. तसेच युपीएससीच्या वेबसाइटवर
2011 पासून 2015 पर्यंत झालेल्या विविध परीक्षांचे पेपर्स प्रकाशित
करण्यात आले आहेत त्यातील पुढील परीक्षांचे पेपर
नागरी सेवा परीक्षेच्या सामान्य अध्ययनासाठी उपयुक्त ठरू शकतात -
इंडियन फॉरेस्ट सर्व्हिस, कम्बाईड डिफेन्स सर्व्हिसेस, नॅशनल
डिफेन्स अकादमी, कम्बाईंड मेडिकल सर्व्हिसेस, इंडियन इकॉनॉमिक
आणि स्टॅटिस्टिकल सर्व्हिसेस, इंडियन इंजिनियरिंग सर्व्हिसेस, सेंट्रल
पोलीस ऑर्गनायझेशन एसीपी भरती परीक्षा, इत्यादी.
सध्या विविध खाजगी प्रकाशन आणि क्लासेसद्वारे प्रकाशित होणार्यार
मासिकांचा आणि वेबसाइटचा परीक्षेच्या तयारीसाठी आधार घेता येऊ
शकतो. ही मासिके, ब्लॉग्ज आणि वेबसाईटस पुढीलप्रमाणे -
www.thecalibre, सिव्हिल सर्व्हिसेस क्रोनिकल, विझार्ड, केंद्रीय
स्पर्धा परीक्षा नोकरी संदर्भ मासिक.
लेख आवडल्यास नक्की शेअर करा …

No comments:

Post a Comment