Wednesday, December 17, 2014

पंचायतराज : केंद्र सरकार


मागील भागत आपण पंचायतराज विषयी प्रस्ताविना पहिली, या भागात पाहूया उत्क्रांतीचे टप्पे:
  • १७९३ - चार्टर एक्टनुसार भारतात मुम्बई, बंगाल व मद्रास प्रांतात पलिकांची स्थापना करण्यात आली
  • १८४२ - बंगाल प्रांतात तर १८५० मध्ये सम्पूर्ण भारतामध्ये मुनिसिपल कायदा लागू 
  • १८७० - लॉर्ड मेयो आर्थिक सत्तेचे विकेंद्रीकरण 
  • १८८२ - लार्ड रिपन स्थानिक स्वराज्य संस्था कायदा 
  • १९१९ - मोंटेग्यू चेम्सफोर्ड सुधारना कायदा पंचायत राज या विषयाचा समावेश प्रांतातील सोपीव खात्यात करण्यात आला 
  • १९३३ - बॉम्बे व्हिलेज पंचायत ऐक्टनुसार स्थानिक सस्वराज्य संस्थांचा कारभार गावातील स्थानिक प्रशासनामार्फत चालविण्यास प्राधान्य देण्यात आले 
  • १९३५ - च्या कायद्याअन्वये जबाबदार मंत्रिमंडळाने खरया अर्थाने स्थानिक स्वराज्य संस्थांच्या विकासात प्राधान्य दिले 
  • १९५२ - केंद्रशासन 'समुदाय विकास कार्यक्रम'
  • १९५८ - बॉम्बे ग्रामपंचायत कायदा 
  • भारतीय राज्यघटनेतील कलम ४० नुसार ग्रामपंचायतींची स्थापना करण्याची तरतूद करण्यात आली
केंद्र पातळीवरील समित्या: 
१ - बलवंतराय मेहता समिती - १९५७ आणि १९५८ ला अहवाल केंद्रास सादर केला
इतर सदस्य - ठाकुर फूलसिंग, डी. पी. सिंग, बी. जी. राव
  • देशातील पंचायतराज मेहता समितिवार अवलंबून आहे 
  • लोकशाहीच्या विकेंद्रिकरणाची शिफारस 
  • ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद हे पंचायत राजचे तीन स्तर सुचविले 
  • न्यायपंचायतीची तरतूद 
  • २ ऑक्टोंबर १९५९ ला पंचायत राज स्वीकारणारे राजस्थान हे पाहिले राज्य तर नागौर जिल्ह्यात पंचायत राजची सर्वप्रथम सुरुवात करण्यात आली
  • १ में १९६२ रोजी महाराष्ट्र पंचायतराज स्वीकारणारे ९ वे राज्य ठरले
२ - अशोक मेहता समिती - १९७७ आणि १९७८ ला अहवाल केन्द्रास सादर केला 
  • द्विस्तरीय पंचायतराजची शिफारस 
  • पंचायत समिती हा घटक वगळवा व केवळ ग्रामपंचायत आणि जिल्हा परिषद हे दोनच घटक असावे हे सुचविले 
  • पंचायत राजला वैधानिक दर्ज देण्यात यावा 
  • ग्रामपंचायतपासून न्यायपंचायती वेगळ्या असावेत हे सुचाविले
३ - जी. व्ही. के. राव समिति - १९८५ आणि १९८६ ला केंद्रास अहवाल सादर केला 
  • नियोजन आयोगाने ग्रामीण विकास व दारिद्रय निर्मूलन समिति स्थापन केली 
  • जिल्हा स्तरावरती जिल्हा परिषदेस स्थान ही मागणी 
  • पंचायतराज ही चार स्तरीय संस्था असावी ही मागणी 
४ - एल. एम. सिंघवी समिती - १९८६ आणि १९८७ ला केंद्रास अहवाल सादर केला 
  • लोकशाही व विकास याकरिता ही समिति स्थापन केली होती 
  • पंचायतराजला घटनात्मक मान्यता द्यावी 
  • राज्यघटनेत समावेश करण्यात यावा आणि त्यांच्या निवडणुका घेण्यात यावी 
१९८८ मध्ये राजीव गांधी यांनी लोकसभेत प्रथम विधेयक मांडले आणि २४ एप्रिल १९९३ ला ७३ व्या घटनादुरुस्तीमध्ये पंचायतराजला घटनात्मक दर्जा मिळाला

No comments:

Post a Comment