Wednesday, February 21, 2018

Enviroment in Marathi


#Current_Affairs #Environment_Ecology
For Upcoming UPSC & MPSC Preliminary Exam.
पर्यावरणात घडलेल्या प्रत्येक घटनेचा परीक्षाभिमुख परिपूर्ण आढावा. अधिक माहितीसाठी खालील लिंकवर क्लिक करा...

Part 1
https://unacademy.com/lesson/lesson-no-3a-environment-ecology-current-affairs/J19BOJ4Z

Part 2
https://unacademy.com/lesson/lesson-no-3b-environment-ecology-current-affairs/XD1Q5Z17

Part 3
https://unacademy.com/lesson/lesson-no-4-environment-ecology-current-affairs/ZBVYNM3Q

Part 4
https://unacademy.com/lesson/lesson-no-5-environment-ecology-current-affairs/9XNRGRD5

Part 5
https://unacademy.com/lesson/lesson-no-6-environment-ecology-current-affairs/QU0UZPC2

Tuesday, February 20, 2018

Current Affair

७१ वा बाफ्टा अवॉर्ड्स २०१८:-
-------------------------------
* दिनांक:- १८ फेब्रुवारी २०१८
* स्थळ:- रॉयल अल्बर्ट हॉल (लंडन)

पुरस्कार :-
* सर्वोत्कृष्ट चित्रपट: -- थ्री बिलबोर्ड्स आउटसाइड एबिंग, मिसौरी
(मार्टिन मैकडोनाघ-निर्देशक, लेखक आणि निर्माता)
* सर्वोत्कृष्ट अभिनेता: -- गैरी ओल्डमैन (चित्रपट :- डार्केस्ट ऑवर)
 * सर्वोत्कृष्ट अभिनेत्री: --फ्रांसेस मैकडोरमंड (चित्रपट:-थ्री बिलबोर्ड्स आउटसाइड एबिंग, मिसौरी)
* सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेता: -- सैम रॉकवेल (चित्रपट:-थ्री बिलबोर्ड्स आउटसाइड एबिंग, मिसौरी)
* सर्वोत्कृष्ट सहाय्यक अभिनेत्री: -- एलीसन जैनी (आई, टोन्या)
* सर्वोत्कृष्ट निर्देशक: -- गिलर्मो डेल टोरो (चित्रपट:-द शेप ऑफवाटर)
* ओरिजनल स्क्रीनप्ले अवॉर्ड: -- थ्री बिलबोर्ड्स आउटसाइड एबिंग, मिसौरी
* सर्वोत्कृष्ट  डाक्यूमेंट्री: -- आई एम नॉट योर नेग्रो
* सर्वोत्कृष्ट छायांकन: -- ब्लेड रनर 2049
* सर्वोत्कृष्ट एनीमेटेड चित्रपट: -- कोको
* सर्वोत्कृष्ट ब्रिटिश शॉर्ट एनीमेशन: -- पोलेस अपार्ट
* सर्वोत्कृष्ट ब्रिटिश शॉर्ट फिल्म: -- काऊब्वॉय डेव
* आउटस्टैंडिंग ब्रिटिश फिल्म: -- थ्री बिलबोर्ड्स आउटसाइड एबिंग, मिसौरी
* मार्टिन मैकडोनाघ चा चित्रपट ‘थ्री बिलबोर्ड्स आउटसाइड एबिंग, मिसौरी’ ने सर्वाधिक ५  पुरस्कार जिंकले
* गिलर्मो डेल टोरो चा चित्रपट ‘द शेप ऑफ वाटर’ ला १२वीभागर मानांकन मिळाले होते त्यात या चित्रपटाने ३ पुरस्कार जिंकले
* द ब्रिटिश अॅकडमी  ऑफ फिल्म अॅड टेलीविजन आर्ट्स (BAFTA: The British Academy of Film and Telivison Arts) एक जागतिक स्वतंत्र कला संस्था आहे
* याची स्थापना १६ एप्रिल १९४७ मध्ये झाली होती
............................................................

Telegram Join Link:- http://t.me/TargetMpsc

Cureent affiars

देशातील पहिले डिझाइन विद्यापीठ हरियाणामध्ये :-
देशातील पहिले आणि एकमेव डिझाइन विद्यापीठ ‘वर्ल्ड यूनिवर्सिटी ऑफ डिझाइन’ सोनिपत (हरियाणा) येथे सुरू झाले आहे. ओम प्रकाश बंसल शैक्षणिक आणि सामाजिक कल्याण ट्रस्ट, मंडी गोविंदगड (पंजाब) या संस्थेने हे विद्यापीठ उभारले आहे.

Wednesday, February 18, 2015

प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण महत्त्वाचे!


यूपीएससी परीक्षेचे गुणात्मक स्वरूप समजण्याकरिता गेल्या काही वर्षांतील प्रश्नपत्रिकांचे घटकनिहाय वर्गीकरण आणि विश्लेषण आवश्यक ठरते. ते कसे करावे, याविषयी..
शैक्षणिक वाटचालीमध्ये पदवी अभ्यासक्रम शिकत असताना प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणास अभ्यासक्रमाइतके महत्त्व दिले जात नाही. खरे तर प्रश्नाभिमुख अभ्यास एका अर्थाने परीक्षाभिमुखच असतो. मर्यादित जागांसाठी घेतल्या जाणाऱ्या स्पर्धा परीक्षांच्या क्षेत्रात या घटकाचे महत्त्व अनन्यसाधारण आहे. नागरी सेवा परीक्षा त्याला अपवाद नाही. त्यामुळे या परीक्षेच्या तयारीमध्ये प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण अनेक अंगांनी फायद्याचे ठरते.
वास्तविक पाहता निव्वळ अभ्यासक्रमातून नागरी सेवा परीक्षेचे स्वरूप समजून येत नाही. अभ्यासक्रम हा एक मानक (Standard) घटक असतो. त्याला वास्तवाशी जोडण्याचे कार्य प्रश्नांच्या वर्गीकरणातून पार पडते. अभ्यासक्रमाला जमिनीवर आणण्याचे, त्यास चालू घडामोडींशी जोडण्याचे काम प्रश्नांद्वारे घडत असते, म्हणूनच अभ्यासक्रमाला परीक्षेच्या दृष्टीने समजून घेण्यात मागील प्रश्नांची भूमिका मोठी असते. या परीक्षेत यश संपादन करण्यासाठी पहिला लढा प्रश्नांशी द्यावा लागतो. प्रश्न समजून घेताना त्यातील अर्थाबरोबरच प्रश्न कोणत्या बाबींवर प्रकाशझोत टाकू इच्छितात, त्यांच्या गरजा काय आहेत, हेही तपासून पाहणे अत्यावश्यक आहे. प्रश्नांचे वर्गीकरण आणि नंतर त्यांचे विश्लेषण न करताच संदर्भग्रंथ आणि वृत्तपत्राकडे वळणे म्हणजेच अभ्यासाच्या पुढील टप्प्याकडे वळणे आत्मघातकी ठरू शकते. या प्रक्रियेमध्ये अभ्यासक्रम जेव्हा प्रश्नांना जोडून पाहिला जातो, त्या वेळीच या परीक्षेचा काहीसा अंदाज यायला लागतो. किंबहुना, या परीक्षेचे खरेखुरे स्वरूपच आपल्यासमोर यायला लागते. त्यानंतरच खऱ्या अर्थाने अभ्यासाची रणनीती ठरवणे फायद्याचे ठरते. थोडक्यात, नागरी सेवा परीक्षेचा अभ्यास करणाऱ्या प्रत्येक विद्यार्थ्यांची सुरुवातीपासूनच प्रश्नांसोबत मत्री झाली पाहिजे.
अभ्यासाला योग्य दिशा कशी द्यावी, संदर्भग्रंथांना आणि वृत्तपत्रांना, नियतकालिकांना कसे हाताळावे, त्यावर कात्री कशी चालवावी, संदर्भसाहित्यांचे वाचन करताना कोणता भाग वगळायचा आणि कोणता नाही, याविषयीची दृष्टी या प्रक्रियेतून मिळते. कमी कालावधीमध्ये निवडक संदर्भसाहित्यामधून तयारी करण्यासाठी प्रश्नपत्रिकेचे विश्लेषण उपयोगी पडते. थोडक्यात, फाफटपसारा टाळून संदर्भसाहित्यातील ज्या भागांवर वारंवार प्रश्न विचारले जातात, त्या भागांवर लक्ष केंद्रित करण्यासाठी विश्लेषणाची मदत होऊ शकते.
प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणामुळे परीक्षेचा आकृतिबंध (pattern) आपल्या लक्षात तर येतोच; त्या बरोबरीने आकृतिबंधात सातत्य आहे की ही परीक्षा दरवर्षी कात टाकीत आहे, हे समजून घेता येते. त्यातून अभ्यासाच्या पुढील वाटचालीचा मार्ग आखणे सोपे जाते. प्रश्न अभ्यासक्रमावर आधारित आहेत की चालू घडामोडीवर आधारित आहेत याचा अंदाज घेता येतो. शेवटी प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणातून प्रश्न तयार करणाऱ्यांच्या तर्कापर्यंत पोहोचता येते; ज्याद्वारे चालू वर्षी कोणत्या घडामोडीवर आणि काय पद्धतीने प्रश्न विचारले जाऊ शकतात या विषयीचा अंदाज बांधता येऊ शकतो.
विद्यार्थ्यांनी बाजारातील कोणतेही तयार (readymade) वर्गीकरण आणि विश्लेषण केलेले प्रश्नसंच घेऊ नयेत, अन्यथा प्रश्नांसोबतचा प्रवास आपण हरवून बसू शकतो. त्यामुळे प्रश्नांसोबत होणारी आपली संवादप्रक्रिया थांबते. अभ्यासक्रम आणि त्यावरील प्रश्नांचे आकलन यातील अंतर वाढायला लागते. परिणामी, प्रश्न अधिक बोजड वाटू लागतात. अभ्यासक्रम आणि प्रश्न यांच्यातील अंतर कमी केल्याशिवाय या परीक्षेचे चित्र स्पष्ट होत नाही. त्यामुळे ही प्रक्रिया स्वत: राबवणे अधिक उपयुक्त ठरते.
त्यादृष्टीने सर्वप्रथम, यूपीएससीच्या वेबसाइटवरून मुख्य परीक्षेच्या मागील सात-आठ वर्षांच्या प्रश्नपत्रिका सोबत घ्याव्यात किंवा खासगी प्रकाशनाचे प्रश्नसंच जवळ बाळगावेत. त्यानंतर अभ्यासक्रमाचे सर्वसाधारण घटक पाडून ते स्वतंत्र, कोऱ्या कागदावर वरील बाजूला शीर्षकाच्या रूपात लिहावेत. उदा. भारतीय वारसा आणि संस्कृती, भारताची घटनात्मक आणि राजकीय प्रक्रिया, भारतातील आíथक विकास इत्यादी घटकांचे शीर्षक नोंदवल्यानंतर त्याखाली संबंधित घटकांतर्गत येणाऱ्या अभ्यासक्रमात दिलेले उपघटक  लिहून काढावेत. उपघटकांच्या खाली ज्या वर्षांपासून आपण प्रश्नांचे वर्गीकरण करणार आहोत, त्या प्रश्नपत्रिकेचे वर्ष तिथे नमूद करावे. त्यानंतर त्या प्रश्नपत्रिकेतील एकेक प्रश्न उचलून त्यांच्या वर्गीकरणाला सुरुवात करावी. एका प्रश्नपत्रिकेचे वर्गीकरण करून झाले की दुसरी, नंतर तिसरी अशा क्रमाने सात-आठ वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे वर्गीकरण करावे. अशा तऱ्हेने संपूर्ण अभ्यासक्रम सुटा सुटा होऊन त्याचे खोलवर आकलन होऊ लागते.
घटकनिहाय विश्लेषण करताना असे जाणवते की, दोन किंवा तीन घटकांचा आधार घेऊन प्रश्न विचारले गेले आहेत. त्यामुळे अभ्यास करताना आंतरविद्याशाखीय दृष्टिकोन आत्मसात करण्याची गरज असते.
घटकनिहाय प्रश्नांचे वर्गीकरण झाल्यानंतर पुढील टप्प्यावर त्यातील उपघटक किंवा प्रकरणनिहाय प्रश्नांचे वर्गीकरण करायला सुरुवात करावी. संबंधित प्रकरणे आणि त्यावर विचारले गेलेले प्रश्न यांची एकत्रित मोट बांधावी लागते. विशिष्ट प्रकरणे आणि त्यावर विचारले गेलेले प्रश्न एका ठिकाणी आणल्यानंतर त्या दोन्हीतील आंतरसंबंध तपासायला मदत होते. त्यातून प्रकरणांचे उपयोजन कसे करावे याविषयीची आपली स्वतंत्र दृष्टी विकसित होऊ लागते आणि परीक्षेचे गुणात्मक स्वरूप नजरेसमोर येऊ लागते.
प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण ही अभ्यासाबरोबर समांतरपणे चालणारी द्वंदात्मक प्रक्रिया आहे. 'स्मार्ट वर्क'च्या नावाखाली 'शॉर्टकट वर्क' करण्यातून वरील प्रक्रियेचे फायदे गमावून बसण्याची वेळ आपल्यावर येऊ शकते. त्यामुळे अभ्यासक्रमाबरोबरच प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणाला महत्त्व देऊन त्यादृष्टीने नियोजन आखावे आणि अभ्यासप्रक्रियेत या विश्लेषणाचा पुरेपूर उपयोग करावा.    

सी सॅट - सराव महत्त्वाचा

पूर्व परीक्षा पेपर २ हा अभिव्यत्ती परीक्षणासाठीचा पेपर आहे. उमेदवारांची तर्क करण्याची, विश्लेषण करण्याची व निर्णय घेण्याची क्षमता तसेच त्यांचे आकलन या पेपरद्वारे तपासले जाते. ऐनवेळी समोर आलेल्या प्रश्नांना विचार करून प्रतिसाद द्यायचा असतो आणि उत्तीर्ण व्हायचे तर हा प्रतिसाद, उत्तर अचूक असणे गरजेचे असते. पाठांतराच्या वा स्मरणशक्तीच्या आधारावर या पेपरमधील प्रश्नांची उत्तरे देणे शक्य नाही. पेपरचे व प्रश्नांचे हे स्वरूप लक्षात घेता या पेपरामध्ये प्रत्येकी दोन ते पाच गुणांसाठी ८० प्रश्न विचारण्यात येतात.
मागील वर्षांच्या प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण केल्यास लक्षात येते की, एखाद्या विभागावर किती गुणांचे प्रश्न विचारायचे याबाबत आयोगाने लवचिकता ठेवली आहे. मात्र, ढोबळमानाने उपघटकांसाठी प्रश्नसंख्या पुढीलप्रमाणे असल्याचे दिसून येते-
* आकलनासाठी ५० प्रश्न. यामध्ये मराठी भाषा आकलन व इंग्रजी भाषा आकलन यांसाठी प्रत्येकी पाच ते सात प्रश्न असतात आणि बाकीचे ३७ ते ४० प्रश्न सर्वसाधारण आकलनासाठी विचारण्यात येतात.
* गणित व सामग्री विश्लेषणावर साधारणपणे १० ते १२ प्रश्न.
* ताíकक क्षमता व सामान्य बौद्धिक क्षमतेवर साधारण पाच ते आठ प्रश्न.
वरील विश्लेषणाच्या अनुषंगाने विभागवार तयारी व पेपर सोडवणे या दोन्हींसाठी योजना ठरवावी लागेल.
 आकलन
आकलनक्षमता तपासण्यासाठी 'उताऱ्यावरील प्रश्न' विचारण्यात येतात. मात्र गोंधळात टाकणारे पर्याय प्रश्नाखाली दिले असल्याने उताऱ्याचे नेमके आकलन होणे आवश्यक असते. उताऱ्यांच्या लांबीप्रमाणे प्रश्नांची संख्या कमी-जास्त होईलच असे नाही. खूप मोठय़ा उताऱ्यावरही दोन वा तीनच प्रश्नही विचारण्यात आले आहेत. त्यामुळे पेपर सोडवताना एखाद्या उताऱ्यावर किती प्रश्न विचारले आहेत ते पाहून मगच तो आकलनासाठी वाचायला घ्यावा.
उताऱ्याचा बारकाईने अभ्यास करणे आवश्यक नसते. मात्र उतारा घाईघाईने वाचायचा हलगर्जीपणाही करू नये. आकलन करत वाचताना वरवरच्या वाचनापेक्षा जास्त वेळ लागतोच. त्यामुळे आकलनाच्या प्रश्नांचा सराव अत्यंत महत्त्वाचा आहे. यासाठी एखादा प्रश्नसंच घेऊन आधी वेळ न लावता बरोबर उत्तरे शोधण्याचा सराव करावा. अशा १०-१५ उताऱ्यांनंतर वेळ लावून प्रश्न सोडवायचा सराव सुरू करावा. साधारणपणे ३००-३५० शब्दांवरील उताऱ्यावरचे पाच प्रश्न सोडवायला पाच ते सात मिनिटे इतका अवधी पेपरमध्ये ढोबळमानाने उपलब्ध होतो हे मागील प्रश्नपत्रिका पाहिल्यास लक्षात येते. असा वेग गाठण्यासाठी सराव आवश्यकच आहे.
* आकलनासाठीचे उतारे अनेक उमेदवारांना 'अवघड' वाटतात. कारण या उताऱ्यांचा भावार्थ तिरकस किंवा उपरोधी असतो.
* काही वेळा पारिभाषिक संज्ञांचा वापर जास्त असतो.
* जयंत नारळीकर यांच्या पुस्तकातील एक उताराही प्रश्नपत्रिकेमध्ये विचारण्यात आला होता, हे लक्षात घ्यावे.
* यासाठी आघाडीच्या वृत्तपत्रांतील लेख घेऊन त्यांचा आकलनासाठी सराव करावा.
* तसेच भाषा 'अवघड' वाटेल अशा पुस्तकांचे नियमित वाचनही आवश्यक आहे.
इंग्रजी भाषा आकलनासाठी व्याकरण पक्के असायलाच हवे. एखाद्या शब्द व वाक्प्रचाराच्या अर्थात अंदाज एखाद्या वाक्यावरून किंवा एका परिच्छेदाच्या अर्थावरून बांधता यावा यासाठी भरपूर सराव आणि वाचन आवश्यक आहे.
गणित व सामग्री विश्लेषण
या दोन्ही भागांवर मिळून साधारण १० ते १२ प्रश्न विचारण्यात येतात. मात्र ही प्रश्नसंख्या वाढू शकते. सामग्री विश्लेषणाच्या प्रश्नांमध्ये भागीदारी, टक्केवारी, गुणोत्तर अशा पायाभूत गणिती प्रक्रियांचाच वापर करायचा असतो. त्यामुळे या विभागात पायाभूत अंकगणिताचा व भूमितीचा अभ्यास पक्का असणे गरजेचे आहे.
या भागाच्या तयारीसाठी २० पर्यंतचे पाढे, २० पर्यंत संख्यांचे वर्ग, घन पाठ असणे आवश्यक आहे. लसावि, मसावि, गुणोत्तर-प्रमाण, probobility, मध्य-मध्यगा (mean-mode-median) व वर्ग समीकरणांची सूत्रे आणि भूमितीमधील मूलभूत सूत्रे व समीकरणे पाठ असावीत. या सूत्रांचा शाब्दिक उदाहरणांमध्ये वापर करायचा सराव परीक्षेपर्यंत करत राहायला हवा.
 ताíकक क्षमता व सामान्य बौद्धिक क्षमता
ताíकक क्षमतेच्या प्रश्नांमध्ये आकृत्या, संख्यामालिका, कूट-भाषा, सांकेतिक भाषा असे प्रकार समाविष्ट असतात हे प्रश्न सोडविण्यासाठी बारकाईने निरीक्षण करण्याचा सराव आवश्यक असतो. यासाठी अशा प्रकारचे प्रश्न वारंवार सोडवावेत. दोन चित्रांमधील फरक ओळखणे इत्यादी. वृत्तपत्रांमध्ये येणाऱ्या कोडय़ांचाही सराव यासाठी उपयोगी ठरेल. कथनांवरून निष्कर्ष काढायच्या प्रश्नामध्ये दिलेली कथने वास्तवाशी विसंगत असली तरीही खरी समजून निष्कर्ष काढायला हवा.
वस्तूंचे रंग, आकार, आकारमान किंवा व्यक्तींचे छंद, काम, खेळ यासंबंधीचे संयुक्त प्रश्न सोडविण्यासाठी तक्ता तयार करावा. दिलेल्या वाक्यांची माहिती तक्त्यात लिहावी आणि त्याचे विश्लेषण करून टेबलमधील बाकीच्या जागा भराव्यात. त्या आधारावर प्रश्नांची उत्तरे द्यावीत.
अनुक्रमावर आधारित प्रश्नांसाठी एक सरळ रेषा आखून प्रत्येक विधानाप्रमाणे व्यक्तीची वा वस्तूची जागा भरत गेल्यास योग्य अनुक्रम सापडतो. वर्तुळातील अनुक्रमामध्ये प्रत्येकाची डावी व उजवी बाजू व्यवस्थित लक्षात घेणे गरजेचे असते.
सामान्य बौद्धिक क्षमतेमध्ये दिशा, नाती, घडय़ाळ, कॅलेंडर इत्यादींवर आधारित प्रश्न विचारले जातात. दिशाविषयक प्रश्नांमध्ये आठ दिशा दाखवून प्रश्नातील क्रमाने दिशा ठरवावी. त्रिकोणातील कर्णाची लांबी काढायचे सूत्र काही वेळा वापरावे लागते. नात्यांची नावे नेमकेपणाने माहीत असावीत. स्वत:ला प्रश्नातील व्यक्तीच्या जागी कल्पून प्रश्न सोडविल्यास त्याचा फायदा होतो. कॅलेंडरवर आधारित प्रश्नांसाठी महत्त्वाचे दिवस, लीप वर्षांमुळे पडणारा फरक या बाबी लक्षात असाव्यात.
व्यवस्थापकीय अभिवृत्ती
या प्रश्नांसाठी नकारात्मक गुणपद्धती लागू नाही. त्यामुळे यातील कोणताही प्रश्न सोडून देऊ नये. दिलेल्या पर्यायांमधून जास्तीत जास्त व्यवहार्य, नतिक व संवेदनशील पर्याय निवडण्यासाठी प्रसंगावधान व कॉमन सेन्सचा वापर इथे करायचा आहे. यासाठी काही गोष्टी आधी समजून घ्याव्यात. दिलेला प्रसंग व त्यामध्ये कोणाचे हितसंबंध गुंतले आहेत, ते घटक व एकूण प्रसंगांमधील सक्रिय घटक समजून घ्यावेत. त्यानंतर त्यातील स्वत:ची भूमिका समजून घ्यावी. कोणतीही ठरावीक भूमिका दिली नसल्यास सामान्य जबाबदार नागरिकाच्या भूमिकेतून तुम्ही निर्णय घेणे अपेक्षित आहे. यानंतर पर्याय पाहावेत. यातील असंवेदनशील, अधिकारांचा गरवापर करणारे,
अनतिक असे पर्याय वगळावेत. उरलेल्या पर्यायांमध्ये तुलना करून उदासीन, वेळकाढूपणाचे जबाबदारी टाळणारे पर्याय बाद करावेत. तरीही तुलनेमध्ये समान वाटणारे पर्याय शिल्लक राहिलेच तर त्या क्षणी तुम्हाला योग्य वाटणारा पर्याय हेच तुमचे उत्तर असेल. एकूणच या पेपरची चांगली तयारी केवळ चांगल्या सरावानेच करता येईल.   

स्त्रोत: लोकसत्ता

Monday, February 16, 2015

संदर्भपुस्तके अभ्यास पक्का व्हावा, म्हणून..

अभ्यासासंबंधित मुद्दय़ांकडे पाहण्याचे विविध दृष्टिकोन विकसित होण्यासाठी तसेच त्या विषयावरील सद्य चर्चेचे भान येण्याकरता यूपीएससी परीक्षेच्या तयारीत संदर्भपुस्तकांचे महत्त्व अनन्यसाधारण आहे.
अभ्यासाच्या प्रारंभिक टप्प्यात प्रश्नपत्रिकांचे विश्लेषण आणि 'एनसीईआरटी'च्या क्रमिक पुस्तकांचे वाचन याविषयी मागील काही लेखांमध्ये चर्चा केलेली होती. आजच्या लेखात अभ्यास पक्का व्हावा म्हणून संदर्भपुस्तकांची आवश्यकता व्यक्त करण्यात आली आहे. मुख्य परीक्षेत विचारले जाणारे प्रश्न विषयाच्या उपयोजनावर (application) तसेच चालू घडामोडींवर आधारित असतील तर वर्तमानपत्रे आणि नियतकालिके सोडून संदर्भपुस्तकांची गरज असते का, असा प्रश्न यूपीएससी परीक्षांची तयारी करणाऱ्या प्रत्येकाला सतावत असतो. दुसऱ्या बाजूला संदर्भपुस्तके वाचण्यापेक्षा अभ्यासक्रमाला धरून असलेल्या बाजारातील मार्गदíशकांचे वाचन का करू नये, असाही प्रश्न उपस्थित केला जातो. कोणत्याही विषयावरील संदर्भपुस्तकाची रचना, आशय आणि व्याप्ती लक्षात घेता पुढील फायदे अधोरेखित करता येतील. संदर्भ पुस्तकांमुळे कळीच्या विविध मुद्दय़ांविषयी चालणारी सद्य चर्चा समजू शकते. संबंधित मुद्दय़ांकडे पाहण्याचे विविध दृष्टिकोन, त्याविषयक वाद याची कल्पना येते. मुख्यत: वरील प्रश्नांची उत्तरे शोधण्यातूनच त्यांचे महत्त्व कळून येते. अभ्यासक्रमातील विविध विषयांवरील संदर्भग्रंथांमुळे त्या त्या विषयांची व्याप्ती लक्षात येते. तसेच विषयांशी संबंधित घडामोडींवर प्रक्रिया करून आपले विश्लेषणात्मक मत तयार करण्यासाठी संदर्भग्रंथ साहाय्यभूत ठरतात. खरेतर संदर्भग्रंथ म्हणजे त्या त्या काळातील चालू घडामोडींना दिलेला प्रतिसादच असतो.
वास्तविक पाहता 'एनसीईआरटी' पुस्तकांद्वारे संपूर्ण अभ्यासक्रमाचे आकलन होत नाही, तर विषयाची निव्वळ तोंडओळख होत असते. अभ्यासक्रमात समाविष्ट असलेल्या विषयांच्या कक्षा रुंदावण्यासाठी, विषयाचा परिप्रेक्ष्य (approach) आत्मसात होण्यासाठी तसेच महत्त्वाचे म्हणजे विषयाचे मूल्यांकन आणि प्रस्तुतता (relevance) या बाबींचा शोध घेण्यासाठी प्रमाणित, अस्सल संदर्भग्रंथांची आवश्यकता भासते. मात्र संदर्भ निवडताना ते विशिष्ट प्रकारातील न निवडता सर्वसामान्य पद्धतीचे व समावेशक असावेत.
बाजारातील मार्गदíशकांचा (गाइड्स) विचार करता अभ्यासक्रमाला समोर ठेवूनच त्यांची निर्मिती केलेली असते. गाइड्सद्वारे विद्यार्थ्यांच्या अभ्यासातील कच्चे दुवे शोधून तिथे आपला अवकाश शोधण्याचा प्रयत्न केला जातो. खरे पाहता टाळी एका हाताने वाजत नाही. विद्यार्थ्यांचीही मागणी कॅप्सूलप्रमाणे असेल तर बाजार त्यासाठी तयारच असतो. कोणत्या ठिकाणी दुखते त्याप्रमाणे विद्यार्थ्यांला कॅप्सूल पुरविल्या जातात. त्यातूनच आकर्षक बुलेटफॉर्म गाइड्सचा उदय होतो. त्यामुळे अस्सल संदर्भ परिघाबाहेर फेकले जातात. मात्र मुख्य परीक्षेचा प्रत्यक्षात अनुभव घेतल्यानंतरच असे करण्यातील तोटा व चूक लक्षात येते.
संदर्भ कसे आणि किती वाचावेत किंवा काय वगळावे याविषयीचा दृष्टिकोन प्रश्नपत्रिकांच्या विश्लेषणामुळे आलेला असतो. मात्र, विद्यार्थ्यांनी प्रश्नांचे विश्लेषण केलेले नसेल, त्यांना विश्लेषणात्मक वाचनाची सवय जडलेली नसेल मात्र, पूर्वपरीक्षा देण्याची अधिक घाई असेल, अशा 'नेमक्या' वेळी गाइड्स शिरकाव करतात आणि वेळ कमी उरला असल्याचे कारण पुढे करून गाइड्स विद्यार्थ्यांच्या माथी मारली जातात. परिणामी, अभ्यासाच्या अशा शॉर्टकट प्रक्रियेचे लोण सर्वत्र
पसरत जाते.
संदर्भग्रंथांचा विचार करता, मागील प्रश्न समजून घेण्यास, त्यातील विषयाचे उपयोजन बारकाईने पाहून विचारलेल्या प्रश्नांची विश्लेषणात्मक चौकट आणि दृष्टिकोन समजून घेण्यासाठी संदर्भग्रंथांचे वाचन गांभीर्याने करणे फायद्याचे ठरू शकते. निव्वळ माहितीप्रधान पद्धतीने चालू घडामोडींचे वाचन करण्याच्या नादात संदर्भग्रंथांकडे दुर्लक्ष झाले असता, चालू घडामोडींना आपला चेहरा देता येत नाही. त्याउलट, आपली मतेही उसनवारीवर बेतलेली असतात. परिणामी, आपली दृष्टी विश्लेषणात्मक न बनता वरवरची, पोकळ आणि वर्णनात्मक वाटू लागते.
मुख्य परीक्षेतील सामान्य अध्ययनाचा विचार करता इंग्रजी माध्यमासाठी पेपर १ : 'मॉडर्न इंडिया'- ग्रोवर आणि ग्रोवर, 'इंडिया सिन्स इन्डिपेंडन्स' -बिपनचंद्रा, 'मॉडर्न वर्ल्ड हिस्टरी'- अर्जुन देव, 'इंडियन जिऑग्राफी' - माजीद हुसन, 'इकॉनॉमिक जिऑग्राफी'- एच. एम. सक्सेना, पेपर २ - 'इंडियन गव्हर्नमेंट आणि पॉलिटिक्स'- फादिया अ‍ॅण्ड फादिया, 'इंडियाज फॉरेन पॉलिसी'- व्ही. पी. दत्ता, 'वर्ल्ड फोकस' पेपर ३ : 'इंडियन इकॉनॉमी'- रमेशसिंग, उमा कपिला किंवा धीरेंद्रकुमार, 'सायन्स अ‍ॅण्ड टेक्नॉलॉजी'- विमलकुमार सिंग हे संदर्भग्रंथ अभ्यासावेत.
मराठी माध्यमासाठी पेपर १ मधील भारतीय इतिहासासाठी वर नमूद केलेल्या इंग्रजी पुस्तकांचे मराठीतील अनुवाद उपलब्ध आहेत. 'मॉडर्न वर्ल्ड हिस्टरी'साठी मराठीत अनुवाद झालेले जैन-माथुर उपयोगात आणायला हरकत नाही. भारत आणि जागतिक भूगोलासाठी माजीद हुसनची अनुवादित पुस्तके उपलब्ध आहेत.
सारांश केवळ एनसीईआरटी किंवा गाइड्स या आधारे यूपीएससी परीक्षेचा चक्रव्यूह भेदता येत नाही. त्यासाठी त्या त्या विषयांवरील एखादे प्रमाणित संदर्भपुस्तक वाचणे अत्यावश्यक ठरते. बदलता अभ्यासक्रम, वाढणारी विषयांची व्याप्ती आणि वरचेवर प्रश्नांचे बदलत चाललेले आणि आव्हानात्मक बनणारे स्वरूप या बाबी लक्षात घेता यूपीएससीच्या तयारीत संदर्भपुस्तकांना पर्याय नाही, हे लक्षात ठेवायला हवे.

अभ्यास 'कसा' करता, हे महत्त्वाचे!


पूर्वपरीक्षा पेपर-१ मध्ये एकूण सात उपघटक आहेत. हे विषय पारंपरिक असले तरी त्यांचा अभ्यास मात्र पूर्णपणे व्यावसायिक दृष्टिकोनातून करणे आवश्यक आहे. त्यासाठी त्यांचे महत्त्व लक्षात घेऊन त्यांची सरळ दोन भागांत विभागणी करावी- खूप महत्त्वाचे आणि महत्त्वाचे. पहिल्या भागामध्ये इतिहास, भूगोल, राज्यव्यवस्था व अर्थव्यवस्था या चार घटकांना ठेवावे. अभ्यासण्यासाठी बाकीचे चार घटक दुसऱ्या भागामध्ये येतील. या अतिमहत्त्वाच्या घटकांचे महत्त्व जास्त का याचा विचार केला की लक्षात येते, इतिहास वगळता या विषयांवरचे प्रश्न 'मूलभूत' संकल्पना पक्क्या असल्याशिवाय सोडविता येत नाहीत. प्रश्नांचा रोख संकल्प, तथ्ये, विश्लेषण, चालू घडामोडी अशा वेगवेगळ्या पलूंवर विचारण्यावर असतो. त्यामुळे याचा परिपूर्ण अभ्यास आवश्यक आहे. 'इतिहास' विषय हा गटात असण्याचे कारण म्हणजे या विषयावरील प्रश्नांची जास्त संख्या आणि प्रश्नांचे विश्लेषणात्मक स्वरूप.
'चालू घडामोडी' हा उपघटक इतर उपघटकांच्या संबंधाने महत्त्वाचा आहेच. शिवाय या मूलभूत विषयांच्या चालू घडामोडींच्या व्यतिरिक्त काही भागाची तयारीही या घटकात येते. त्यामुळे वेगळा घटक म्हणूनच याची तयारी करायला हवी. या घटकावर एका वेगळ्या लेखात आपण चर्चा करू.
इतिहासाचा अभ्यास केवळ तथ्य (फॅक्ट्स) आणि घटनामालिका पाठ करून पूर्ण होत नाही. राजकीय आणि सामाजिकदृष्टय़ा महत्त्वाच्या घटनांचा क्रम लक्षात ठेवावा लागतो, पण त्यासाठी केवळ पाठांतर करून भागणार नाही. घटनांमधील परस्परसंबंध, कारणे, परिणाम असे आयाम समजून घेतल्यास घटना व त्यांचा क्रम दोन्ही व्यवस्थित समजतात आणि लक्षात राहतात. प्राचीन व मध्ययुगीन भारतीय इतिहासातील एकूण प्रश्न पाच ते सहापेक्षा जास्त नसतात. त्यामुळे पूर्ण भर आधुनिक भारताच्या इतिहासावर देणे व्यवहार्य ठरेल. महाराष्ट्राचा इतिहास भारताच्याच इतिहासाचा भाग म्हणून अभ्यासणे आवश्यक आहे. मात्र काही समाजसुधारक व स्वातंत्र्यसनिक यांचे महाराष्ट्रासाठी महत्त्वाचे योगदान असल्याने त्यांचा अतिरिक्त अभ्यास गरजेचा आहे. यासाठी बिपिनचंद्र यांचे 'भारताचा स्वातंत्र्यलढा' व स्पेक्ट्रम प्रकाशनचे 'आधुनिक भारताच्या इतिहासावरील पुस्तक' ही पुस्तके पुरेशी आहेत.
भूगोलाचा अभ्यास करताना उपघटकांना प्राकृतिक-आíथक-सामाजिक अशा क्रमाने महत्त्व देणे आवश्यक आहे. मूलभूत संज्ञा आणि संकल्पना आधी समजून घेऊन मग भौगोलिक घटना व प्रक्रियांचा अभ्यास करावा. प्राकृतिक विभाग, नदी-पर्वत प्रणाली यांचा अभ्यास नकाशा समोर ठेवून करावा. याबाबत भारत-महाराष्ट्र आणि जग अशा क्रमाने महत्त्व देऊन अभ्यास आवश्यक आहे. मान्सूनची निर्मिती व्यवस्थित समजून घ्यायला हवी. आíथक भूगोलामध्ये खनिजे व त्यांचे उत्पादन, महत्त्वाचे उपयोग व त्यांची स्थाननिश्चिती, महत्त्वाची पिके व त्यांचे उत्पादक प्रदेश यांचा actual अभ्यास तक्त्यांद्वारे करता येईल. मात्र उद्योग व पिके यांच्या उत्पादनाबाबत संकल्पनात्मक अभ्यास आवश्यक आहे. पर्यटनाशी संबंधित विविध संकल्पना व महत्त्वाची स्थाने यांचा आढावा घ्यायला हवा. सामाजिक भूगोलामध्ये जमातींचा अभ्यास महत्त्वाचा आहे. चच्रेचा/बातमीचा विषय ठरल्या असतील तरच भारताबाहेरील जमातींचा आढावा घ्यावा. महाराष्ट्राच्या जमातींचे स्थान, महत्त्वाचे सण, नृत्ये, कला इत्यादींची माहिती घ्यावी. स्थलांतराची कारणे, परिणाम, समस्या, उपाय, प्रकार, प्रभाव इत्यादी महाराष्ट्राच्या विशेष संदर्भात समजून घ्यावे.
भारतीय राज्यव्यवस्था विषयाच्या तयारीचा पाया आहे. राज्यघटनेचा अभ्यास, घटनेतील मूलभूत हक्क, कर्तव्ये, नीतिनिर्देशक तत्त्वे, घटनात्मक पदे, महिला, मुले, अपंग, मागासवर्ग, अल्पसंख्याक या सामाजिक घटकांसाठीच्या तरतुदी, घटनादुरुस्ती याबाबतची कलमे व तरतुदी तोंडपाठ असायला हव्यात. केंद्र-राज्य संबंध, न्यायालयीन उतरंड, महत्त्वाच्या संज्ञा समजून घ्यायला हवेत. पंचायतीराज व्यवस्था बारकाईने समजून घ्यायला हवी. चच्रेत असलेले तसेच प्रस्तावित कायदे, नियम, धोरणे यांचाही अभ्यास आवश्यक आहे. सर्वोच्च न्यायालयाचे महत्त्वाचे निर्णय माहीत असावेत.
आíथक व सामाजिक विकास या घटकाच्या अभ्यासाची सुरुवात अर्थव्यवस्था विषयाच्या मूलभूत संकल्पना समजून घेऊन करायला हवी. या संकल्पना व्यवस्थित समजून घेतल्यावर संबंधित मुद्दय़ांची आकडेवारी (टक्केवारी) नोंदवून घ्यावी. सामाजिक परिप्रेक्ष्यामध्ये रोजगार, दारिद्रय़, आरोग्य, शिक्षण, समावेशन इत्यादी संकल्पना समाविष्ट होतात. या संकल्पनांचा अभ्यास महत्त्वाच्या संज्ञा, व्याख्या, स्वरूप, समस्या, कारणे, परिणाम, उपाय, योजना अशा आठ आयामांचा विचार करून करावा. दारिद्रय़रेषा निर्धारण, शिक्षण याबाबतच्या महत्त्वाच्या समित्या व त्यांच्या शिफारशींचा आढावा घेता आल्यास उत्तम. आíथक व सामाजिक असमतोल, त्याची कारणे, स्वरूप, परिणाम, उपाय इत्यादी बाबी समजून घेणे आवश्यक आहे. मानव विकास अहवाल व तत्सम निर्देशांकांची अद्ययावत माहिती करून घ्यावी.
सामान्य विज्ञानामध्ये जास्त भर जीवशास्त्र त्यातही मानवी आरोग्यशास्त्रावर असतो. मानवी आरोग्याशी संबंधित बाबींचा अभ्यास तक्त्याच्या स्वरूपामध्ये करता येईल. अवयव संस्थांचा अभ्यासही गरजेचा आहे. औषधी व आíथक महत्त्वाच्या वनस्पतींचा आढावा घ्यावा. भौतिकशास्त्रातील पारंपरिक मूलभूत संकल्पनांबरोबरच इलेक्ट्रॉनिक क्षेत्रातील नवीन घडामोडीही लक्षात घेणे गरजेचे आहे. उदा. मोबाइल, संगणक यांतील अद्ययावत उपकरणे किंवा प्रणालींची मूलभूत शास्त्रीय माहिती.
पर्यावरणीय परिस्थिती घटकामध्ये परिसंस्था, तिचे घटक, अन्नसाखळी इत्यादी बाबी उदाहरणासहित समजून घ्यायला हव्या. 'जैवविविधता' ही संकल्पना व्यवस्थित समजून घ्यायला हवी. आíथक व पर्यावरणीय दृष्टिकोनातून महत्त्वाच्या परिसंस्था पाहायला हव्यात. भारतातील रामसर साइट्स, जैवविविधता हॉट स्पॉट्स, प्रवाळ मित्ती, हिमालयीन, शुष्क प्रदेशातील व किनारी भागातील वैशिष्टय़पूर्ण वनस्पती व प्राणी प्रजातींचा आढावा टेबलमध्ये घेता येईल. IUCN (इंटरनॅशनल युनियन फॉर कॉन्झर्वेशन ऑफ नेचर)च्या 'रेड लिस्ट'मधील भारताच्या संकटग्रस्त प्रजाती, वन्यजीवन संवर्धनाचे कायदे, ठराव, अभयारण्ये व संबंधित संकल्पना यांचाही आढावा आवश्यक आहे.
हरितगृह परिणाम, ओझोन क्षय, जागतिक तापमान वाढ या संकल्पना व त्यांचा परस्परसंबंध जाणून घ्यायला हवा. हवामान बदलाबाबत क्योटो प्रोटोकॉलमधील तरतुदी व संबंधित चालू घडामोडी लक्षात घ्याव्यात. याबाबत भारताची भूमिका नेमकेपणाने समजून घ्यायला हवी. भारतातील यासाठीचे प्रयत्न, त्यासाठीचे कायदे, धोरण, योजना पाहायला हव्यात. अशा नेमक्या रणनीतीने अभ्यास केला तर यश नक्की मिळते. तुम्ही मेहनत किती घेताय यापेक्षा ती कशी घेताय यावरच परिणाम अवलंबून असतो.