Thursday, January 1, 2015

महाराष्ट्राचा इतिहास

मोहोलेश ते महाराष्ट्र
ह्यू एनत्संग या चिनी प्रवाशाने इ.स. ६४०-४१ च्या सुमारास महाराष्ट्रास भेट दिली होती. या देशाची संपत्ती, येथील प्रशासकीय कुशलता, आणि लोकांचे स्वभावविशेष यामुळे तो प्रभावित झाला होता. महाराष्ट्राला तो `मोहोलेश' म्हणतो, आणि या देशाच्या लोकस्थितीचे वर्णन करणारा कदाचित तो पहिलाच परदेशी प्रवासी असावा. तो म्हणतो, `महाराष्ट्राची भूमी सुपीक असून ते धनधान्याने समृद्ध आहे. तेथील लोक साधे, प्रामाणिक पण तापट आहेत. त्यांच्या जे उपयोगी पडतात त्यांशी ते कृतज्ञ असतात. पण त्यांना कोणी दुखविले तर ते सूड घेतल्याखेरीज राहात नाहीत. लढाईत पळपुट्यांचा ते पाठलाग करतात; पण शरण आलेल्यांना ते मारीत नाहीत. राजाजवळ हजारो शूर शिपायांचे सैन्य नित्य खडे असते. या प्रदेशाला `दंडकारण्य' असेही म्हणत आणि या प्रदेशाचे नाग, मुंड, भिल्ल इत्यादी आदिवासी समाज हे मूळ रहिवाशी होते. नंतरच्या काळांत उत्तरेकडून आर्य, शक, हूण लोक आले; दक्षिणेकडून द्रविडी लोक आणि सागरे मार्गाने परदेशी लोक आले. या सर्वांनी मिळून महाराष्ट्राची वसाहत केली, आणि महाराष्ट्राच्या रहिवाशांना `महारट्ट' म्हणून ओळखले जाऊं लागले.
महाराष्ट्राची प्राचीनता साधारणपणे इ.स.पू. तिसऱ्या शतकापर्यंत नेता येईल. कारण संस्कृत भाषेपासून उदयाला आलेली महाराष्ट्री भाषा ही इ.स.पू. चवथ्या अथवा तिसऱ्या शतकांत प्रचारात होती असे तज्ज्ञांचे मत आहे. आजची या प्रदेशाची मराठी भाषा या महाराष्ट्री-प्राकृत भाषेपासून विकसित झाली असून इ.स. च्या १०व्या शतकापासून ती प्रचलित झाली असावी. महाराष्ट्र हे नांव देखील या भाषेवरूनच पडले असावे. कालौघात या नांवाने ओळखल्या जाणाऱ्या प्रदेशात अपरान्त, विदर्भ, कुंतल, मूलक व अश्मक यांचा अंतर्भाव झालेला दिसतो.

मौर्य ते यादव (इ.स.पू. ते स. १३१० सुमारे २२०)
महाराष्ट्राचा कोकण विभाग हा प्राचीन काळांत मौर्य साम्रज्याच्या (इ.स.पू. ३२१-१८४) अंतर्गत होता. या काळात महाराष्ट्राने भरभरटीचा व्यापार आणि बौद्धधर्माचा विकास पाहिला. पण मौर्य साम्राज्याच्या ऱ्हासाबरोबर महाराष्ट्रावरील मौर्य सत्ता संपुष्टात आली, आणि या प्रदेशावर निरनिराळ्या घराण्यांची सत्ता प्रस्थापित होऊ लागली.
सातवाहन हे महाराष्ट्राचे पहिले ज्ञात राजघराण होय. त्यांचा काळ इ.स.पू. साधारणतः २२० ते इ.स. २२५ पर्यंतेचा मानला जातो. अर्थात्‌ या कालखंडाबाबत मतभेद आहेत. प्रतिष्ठान अथवा पैठण ही त्यांची राजधानी आणि सिम्मुक सातवाहन हा या घराण्याचा मूळ पुरूष. महाराष्ट्राच्या राजकीय. सांस्कृतिक आणि सामाजिक इतिहासाच्या दृष्टीने सातवाहनांचा कालखंड हा महत्वाचा गणला जातो. सातव्या शतकातील हाल राजाने महाराष्ट्री प्राकृत भाषेत संकलित केलेले गाथासप्तशती हे काव्य ही सातवाहनांची साहित्याला मोठी देणगी. हिंदूंचा शालिवाहन शक सातवाहनांनीच सुरू केला.
वाकाटक (इ.स. २५० ते ५२५) राजांनी विदर्भ आपल्या वर्चस्वाखाली आणला होता. वाकाटक काळांत महाराष्ट्राची साहित्य, कला आणि धर्म या क्षेत्रांत राजाश्रयामुळे उल्लेखनीय प्रगती झाली. अजिंठ्याची १६, १७, १९ या क्रमांकांची लेणी ही वाकाटक काळांतील आहेत. भित्ति-चित्रांची कला या काळात अतिशय विकसित झाली होती.
वाकाटकांनंतर कलचुरी राजघराणे इ.स. च्या सहाव्या शतकात महाराष्ट्राच्या काही भागांवर राज्य केले. महिष्मती ही त्यांची राजधानी होती.
वाकाटकांचे महत्त्वाचे राजघराणे म्हणजे चालुक्यांचे. महाराष्ट्राचा भूप्रदेश त्यांच्याकडे इ.स. ५५० ते ७६० आणी इ.स. ९७३ ते ११८० या दोन कालखंडांत होता. जयसिंह हा या घराण्याचा संस्थापक आणि बदामी ही त्याची राजधानी. त्रैमहाराष्ट्रिकाचा स्वामी आणि या घराण्याचा सर्वश्रेष्ठ राजा दुसरा पुलकेशी याने नाशिक येथे आपले महत्त्वाचे ठाणे केले होते. चालुक्य राजे हिंदू धर्माचे अभिमान होते त्यांनी मंदिरे बांधण्याच्या कामी मौलिक कामगिरी केली होती.
दंतिदुर्ग या राष्ट्रकूट राजाने इ.स. ७५३ च्या सुमारास चालुक्यांचा पराभव केला आणि गुलबर्गा जिल्ह्यातील मान्यखेत (मालखेड) आपली राजधानी बनविली. कल्याणी शाखेच्या तैलप चालुक्याने इ.स. ९७३ च्या सुमारास राष्ट्रकूटांची सत्ता संपुष्टात आणून चालुक्यांची राजवट दुसऱ्यांदा प्रस्थापित केली. वेरूळ येथील जगप्रसिद्ध कैलास लेणे हे कृष्ण पहिला या राष्ट्रकूट राजाने बांधले.
महाराष्ट्राच्या कांहीं भागावर कल्याणीच्या चालुक्यांनी सत्ता इ.स.११८९ पर्यंत टिकली. यादवानी त्यांचा पराभव केला व इ.स. १३१० पर्यंत महाराष्ट्रावर राज्य केले. गोव्याचे कदंब, कोकण आणि कोल्हापूर येथील शिलाहार राजे हे चालुक्य आणि राष्ट्रकूट यांचे मांडलिक म्हणून राज्य करीत होते. यादवांनी त्यांची सत्ता सपुष्टात आणली.
यादवांनी महाराष्ट्राचा बराचसा भाग आपल्या आधिपत्याखाली आणला होता. यादव राजांनी धार्मिक सहिष्णुतेचे धोरण अवलंबिले होते. त्यांनी मराठी भाषेला राजाश्रय दिला आणि तिला राजभाषेचा दर्जा प्राप्त करून दिला. भक्ती सांप्रदायाचे उद्‌गाते आणि महाराष्ट्राचे सर्वश्रेष्ठ संतकवी ज्ञानेश्वर महाराज हे याच यादव काळात उदयास आले. नवव्या शतकात नाशिक जिल्ह्यांतील चांदोर या ठिकाणी यादवांची पहिली राजधानी होती. इ.स. ११८७ च्या सुमारास भिल्लम राजाने ती देवगिरी येथे आणली.



मुसलमानांची राजवट
इ,स, १२९६ मध्ये अल्ला‍उद्दिन खिलजी या उत्तरेतील सुलतानाने प्रथम दख्खन प्रांतात प्रवेश करून यादवांचा पराभव केला. आणि त्यांची संपत्ती लुटून त्यांना प्रायः दरिद्री बनवले. सेनापती मलीक कफूर याने अल्ला‍उद्दिनाच्या कार्याची पूर्ती केली. आणि इ.स. १३१० मध्ये यादवांची सत्ता लयाला गेली.
अल्ला‍उद्दिनाचे अनुकरण मुहम्मद तुघलक (इ. स. १३२४-१३५०) या दिल्लीच्या सुलतानाने करून आपली सत्ता दक्षिणेतील मदुराईपर्यंत प्रस्थापित केली. मात्र दिल्लीहून आपली राजधानी दौलताबादेस आणण्याचा त्याचा प्रयत्न असफल झाला. तुघलकांची सत्ता क्षीण झाल्यावर अल्ला‍उद्दीन हसन बहमनी याच्या धुरीणत्वाखाली दक्षिणेत इ.स. १३४७ साली बहमनी घराण्याची स्थापना झाली ती सुमारे १५० वर्षे टिकली. देवगिरी अथवा दौलताबाद ही बहमनींची काही काळ राजधानी होती. सोळाव्या शतकात बहमनी राज्याचे गोवळकोंड्याची कुत्बशाही, अहमदनगरची निजामशाही, वऱ्हाडची इमादशाही, विजापूरची आदिलशाही आणि बिदरची बरीदशाही अशा पाच स्वतंत्र राज्यांत विभाजन झाले. आपली सत्ता टिकविण्याकरिता या दख्खनी सुलतानांना प्रशासनासाठी स्थानिक मराठी लोकांचे मोठ्या प्रमाणावर सहाय्य घ्यावे लागले. सनदी सेवा, लष्करी चाकरी आणि राजनैतिक व्यवहार यासाठी प्रामुख्याने त्यांना मराठी माणसांचीच नेमणूक करावी लागली. सतराव्या शतकाच्या अंतापर्यंत या पाच शाह्या मोगल साम्राज्यांत विलीन झाल्या.

मराठे
सतराव्या शतकाच्या मध्यापासून महाराष्ट्रावर मराठ्यांची सत्ता प्रस्थापित होण्यास प्रारंभ झाला `मराठा' हा शब्द इतिहासाच्या दृष्टीने जातिवाचक नसून त्यांत महाराष्ट्रातील मराठी भाषिकांचा प्रामुख्याने समावेश होतो. असे असले तरी महाराष्ट्रावर राजकीय सत्ता ही मुख्यत्वेकरून `मराठा' जातीने प्रस्थापित केली होती. हे मराठी भाषिक मराठे मूळचे कोण हे निश्चितपणे सांगणे कठीण आहे. मराठा हे नामाभिधान महाराष्ट्र देशापासून आले आहे, का मराठे या येथील रहिवाश्यांमुळे या देशाला महाराष्ट्र हे नांव मिळाले आहे हे सांगणे कठिण आहे. रिस्ले या प्रसिद्ध मानववंशशास्त्रज्ञाने शक-द्रविडांच्या मिश्र जमातीपासून मराठे उदयाला आले असा सिद्धांत मांडला होता. पण तो आता त्याज्य ठरला आहे. अर्थात महाराष्ट्रातील अनेक आदिवासी जमातींचा मराठ्यांच्या उत्पत्तीशी संबंध असावा हे सर्वस्वी नाकारता येणार नाही. मराठ्यांच्या अनेक कुळी देवक अथवा वंशचिन्ह मानणाऱ्या आहेत. खंडोबा आणि भवानी या मराठ्यांच्या प्रमुख देवता या आदिवासी स्वरूपाच्या आहेत.
मराठे आणि महाराष्ट्र यासंबंधीचे संदर्भ कांही परदेशी प्रवाशांच्या वृत्तांत आढळतात. यात अल्‌बेरुनी (इ.स. १०३०) फ्रायर जॉर्डनस (इ.स. १३२६ च्या आसपास), इब्न बतूता (इ,स, १३४०) यांच्या लिखाणारून असे उल्लेख आले आहेत. परंतु राजकीय क्षेत्रावर मराठ्यांच्या उदय खऱ्या अर्थाने सतराव्या शतकातच झाला. मराठ्यांच्या उदयाची कारणे इतिहासकारांनी निरनिराळी दिली आहेत. मराठ्यांच्या प्रसिद्ध इंग्रज इतिहासकार ग्रॅंट डफ यांच्या मते हा उदय सह्याद्री पर्वतात वणवा पेटावा तसा, अगदी दैवघटित परिस्थितीमुळे झाला. न्यायमूर्ती रानड्यांना मात्र प्रामाणिक प्रयत्न करून मराठ्यांनी आपला उदय करून घेतला असे वाटते. राजवाडे यांच्या मते परदेशी आणि दख्खनी मुसलमानांचे वर्चस्व रोखण्याकरता अहमदनरच्या निजामशहाने मराठ्यांना आपल्या दरबारांत हेतुपूर्वक उत्तेजन देऊन एक `मराठा पक्ष' निर्माण केला, आणि त्यातूनच मराठ्यांचा उदय झाला. भोसले, जाधव, निंबाळकर, मोरे, घोरपडे, माने, घाटगे, डफळे, सावंत, शिर्के, महाडिक, मोहिते इत्यादी मराठे सरदार निजमाशाही अथवा आदिलशाहीच्या चाकरीत असल्याने लष्करी आणि मुलकी प्रशासनाचे त्यांना उत्तम शिक्षण मिळाले होते. मालोजी भोसले (अंदाजे इ.स. १५५२ ते १६०६) हा निजामशाहीत एक छोटासा शिलेदार म्हणून नोकरीस लागला. त्याचा पुत्र शहाजी (१५९९ ते १६६४) याने तर निजामशाही, मुघल आणि आदिलशाही यांच्याकडे नोकरी करून बरेच श्रेष्ठत्व मिळविले होते. मराठ्यांच्या उदयास प्रारंभ मालोजी-शहाजीपासून झाला असे मानण्यास हरकत नाही.

स्वराज्य संस्थापक शिवाजी राजा
शिवाजी राजांचा जन्म शिवनेरी किल्ल्यावर १९.२.१६३० (जुनी तारीख ६.४.१६२७) रोजी झाला. मराठी राष्ट्र हे शिवाजी राजांची निर्मिती होय. शहाजीने आपली पुणे, सुपे येथील जहागीर, जी प्रायः स्वतंत्र होती. ती शिवाजी राजांना बहाल केली. त्यांनी मावल, कोकण, आणि देश या प्रदेशातील लोकांच्या समोर स्वराज्याचे, महाराष्ट्र धर्माचे ध्येय ठेवून त्यांना संघटित केले, आणि परकी सत्तांना परभूत करून स्वराज्य स्थापन केले. या नूतन महाराष्ट्र राज्याला कार्यक्षम लष्करी आणि सनदी प्रशासन देऊन त्यांनी ते भक्कम पायावर उभे केले. आर्थिक दृष्ट्या देखील ते स्वावलंबी बनविले. सर्वधर्मसमभावाचे तत्व आचरून सर्व धर्म पंथांना आपल्या राज्यांत सामावून घेतले. आपल्या राज्याभिषेक प्रंसंगी (१६७४) राजशक सुरू करणारा, आणि स्वतःची शिवराई आणि होन' ही सोन्याची नाणी चालू करणारा शिवाजी राजा हा पहिला मराठी छत्रपती होय. त्याच्या अकाली मृत्यूमुळे-वयाच्या अवघ्या पन्नासाव्या वर्षी (५ एप्रिल १६८०) महाराष्ट्रांत एक पोकळी निर्माण झाली. मध्ययुगाच्या इतिहांसातील शिवाजी महाराजांचे स्थान सुप्रसिद्ध वंग इतिहासकार, यदुनाथ सरकार यांनी आपल्या शिवचरित्रांत विशद केले आहे. ते म्हणतात,`शिवजी राजा हा केवल मराठी राष्ट्राचा निर्माता नव्हता, तर तो मध्ययुगांतील एक सर्वश्रेष्ठ रचनाकार, लोकोत्तर पुरुष होता. राज्ये नष्ट होतात, साम्राज्याचे विघटन होते, राजघराणी नेस्तनाबूत होतात, परंतु `लोकनायक राजा' अशा शिवाजी राजाची स्मृती म्हणजे मानवजातीला मिळालेला एक अक्षय ऐतिहासिक वारसा होय.
शिवाजी राजांचा पुत्र संभाजी (इ.स. १६५७-८९) याची कारकीर्द अवघे नऊ वर्षांची झाली. या छोट्या काळांत त्याला अंतर्गत कलह आणि शिद्दी, पोर्तुगीज, मुघल यासारखे शत्रू यांच्याशी मुकाबला करावा लागला. मुघलांच्या हातून त्याचा १६८९ साली जो अमानुष वध झाला त्यामुळे मराठी लोकामध्ये देशप्रेमाची जाज्वल्य भावना निर्माण झाली, आणि शिवाजी महाराजांचा कनिष्ठ पुत्र राजाराम (१६७०-१७००) याच्या नेतृत्वाखाली मराठ्यांनी औरंगजेबाच्या सत्तेविरुद्ध स्वातंत्र्य युद्ध पुकारले. आपला बलाढ्य फौजफाटा घेऊन औरंगजेब बादशहाने मरेपर्यंत (१७०७) मराठी सत्ता नेस्तनाबूत करण्याचा निष्फळ प्रयत्न केला. राजारामाच्या मृत्युनंतर त्याची पत्नी ताराबाई हिने स्वातंत्र्ययुद्धाची सुत्रे आपल्या हाती घेतली, आणि आपला पुत्र दुसरा शिवाजी यास छत्रपती म्हणून घोषित केले. परंतु औरंगजेबाच्या नजरकैदेत असलेला संभाजीचा पुत्र शाहू याची जेव्हा १७०७ साली सुटका झाली तेव्हा शाहूपक्ष आणि ताराबाई पक्ष असे दोन तट मराठी राज्यात पडले आणि त्यांच्यात यादवी युद्धाला सुरवात झाली. शाहूने साताऱ्यास तर ताराबाईने पन्हाळ्यास आपली स्वंतत्र गादी स्थापन केली. या दुसऱ्या गादीच्या संदर्भात १७१४ साली एक राजवाड्यांतच छोटीशी राज्यक्रांती कोल्हापुरात झाली. आणि राजारामाचा दुसरा पुत्र संभाजी (इ.स. १६९८ ते १७६०) यास कोल्हापूरची गादी मिळाली. शाहूने वारणेच्या तहान्वये (१७३१) संभाजीस कोल्हापूरचा छत्रपती म्हणून मान्यता दिली.

पेशवे
शाहूच्या आमदानीत रायगड जिल्ह्यांतील भट घराणे मराठ्यांच्या इतिहासात प्रसिद्धीस आले. बाळाजी विश्वनाथ भट याने शाहूला त्याचे स्थान बळकट करण्यास मदत केल्याने त्यास पेशवे पद (१७१३-१७२०) प्राप्त झाले. मुघलांच्याकडून त्याने स्वराज्य, चौथाई आणि सरदेशमुखीच्या सनदा आणल्या. त्याचा मुलगा पहिला बाजीराव ( पेशवा १७२० ते १७४०) याने पेशवाईची वस्त्रे स्वीकारल्यावर आक्रमक धोरणाचा अवलंब केला आणि महाराष्ट्राच्या सीमा ओलांडून उतरंडीस लागलेल्या मुघल साम्राज्याच्या विनाशातून मराठी सत्तेची वाढ करण्याची महत्त्वाकांक्षा बाळगली. त्याने मराठी सरदारांना उत्तरेचे दालन उघडून दिले, आणि यातूनच पुढे मराठ्यांनी छोटी छोटी राज्ये तिकडे निर्माण झाली. गुजरात, माळवा, बुंदेलखंड इत्यादी प्रदेश मराठ्यांच्या वर्चस्वाखाली आले, आणि शिंदे, होळकर, गायकवाड, पवार यांच्यासारखे नवे मराठे सरदार उदयास आले. यदुनाथ सरकारांच्या मते बाजीरावाने बृहन-महाराष्ट्राची निर्मिती केली, आणि पुणे हा भारतीय राजकारणाचा केंद्रबिंदू बनला. बाजीराव पेशवा हा संपूर्णतया शिपाई गडी, एक देवजात शिलेदार होता. आपल्या छोट्याशा कारकीर्दीत त्याने दख्खन प्रदेशात मराठ्यांचे श्रेष्ठत्व आणि उत्तरेस मराठ्यांचे धुरीणत्व प्रस्थापित केले.
बाजीरावानंतर पेशवेपद हे भट घराण्यांत जवळजवळ वंशपरंपरा बनले. बाजीरावाचा पुत्र बालाजी तथा नानासाहेब (पेशवा १७४०-१७६१) याने मराठ्यांचे झेंडे अटकेपार फडकाविले. शाहूचा मृत्यू १७४९ साली झाला. त्याचा दत्तक पुत्र रामराजा हा कर्तृत्ववान नसल्याने नामधारी छत्रपती राहिला व सर्व सत्ता पेशव्यांकडे केंद्रीत झाली. १७६१ साली अहमदशहा अब्दालीकडून पानिपतच्या रणसंग्रामात मराठ्यांचा दारुण पराभव झाला. मराठी सत्तेला शह मिळाला पण ती नेस्तनाबूत झाली नाही. नानासाहेबाचा पुत्र पेशवा पहिला माधवराव ( पेशवा १७६१-१७७२) याने शत्रूंचा बीमोड करून आणि उत्तम प्रशासन करून मराठ्यांचे वर्चस्व पुनश्च प्रस्थापित केले. पण त्याचा अकाली मृत्यू हा मराठी सत्तेला शाप ठरला. ग्रॅण्ट डफ म्हणतो, या गुणवंत पेशव्याचा अकाली मृत्यू हा मराठी साम्राज्याला पानिपतापेक्षा फार हानिकारक ठरला. गृहकलहाने त्याचा भाऊ पेशवा नारायणराव (१७७३) याचा अमानुष वध केला. नारायणरावाच्या मरणोत्तर जन्माला आलेला त्याचा पुत्र पेशवा माधवराव दुसरा (पेशवा १७७३-१७९५) याने कारभाऱ्यांच्या सहाय्याने ( ज्यांना बारभाई म्हणत ) मराठी राज्याची धुरा सांभाळली. यात महादजी शिंदे आणि नाना फडणवीस या दोन कारभाऱ्यांचा मोठा वाटा होता. छत्रपतीकडून पेशव्यांकडे आलेली सत्ता आता कारभाऱ्यांकडे गेली. याच सुमारास पश्चिम किनाऱ्यावर ठाण मांडून बसलेले इंग्रज हळूहळू मराठ्यांच्या राजकारणांत प्रवेश करू लागले होते. वस्तुतः १७८१ साली, पहिल्या इंग्रज-मराठे युद्धात, मराठ्यांनी त्यांना नमविले होते; परंतु शेवटचा पेशवा दुसरा बाजीराव ( पेशवा १७७५-१८१८ ) हा संपूर्णतः त्यांच्या आहारी गेला आणि १८१८ साली मराठी सत्ता संपुष्टात आली. मराठी राज्याची वासलात लावणाऱ्या माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टनने मराठ्यांची सहानुभूती मिळविण्याच्या हेतूने साताऱ्याचे छोटेसे राज्य निर्माण केले आणि त्यावर प्रतापसिंह (१७९३-१८७४) या एका छत्रपतीच्या वंशजाची `राजा' दुय्यम प्रतीचा किताब देऊन नेमणूक केली. पुढे १८३९ साली त्याला पदच्युत करून त्याचा भाऊ शहाजी उर्फ आप्पासाहेब यास साताऱ्याची गादी देण्यात आली, आणि पुढे १८४९ सालीं हे साताऱ्याचे राज्य खालसा करण्यात आले. अशा रीतीने सुमारे दोनशे वर्षे भारताच्या राजकीय इतिहासावर प्रभाव टाकणाऱ्या मराठ्यांची सत्ता नामशेष झाली.
मराठ्यांची परंपरा आणि इतिहास हा असा उज्वल आहे. यदुनाथ सरकार यांनी मराठ्यांची भारतीय इतिहासांतील कामगिरी समर्पक शब्दांत व्यक्त केली आहे. ते म्हणतात, `आजच्या भारतात त्यांच्या ऐतिहासिक कामगिरीमुळे, मराठ्यांना एक अनन्यसाधारण असे स्थान प्राप्त झाले आहे. त्यांच्या अगदी नजीकच्या पूर्वजांनी अनेक समरांगणावर आपले देह अर्पण केले आहेत; त्यांनी सेनापतीपदे भूषविली, राजनीतीक्षेत्रांत भाग घेतला, राज्याची आर्थिक बाजू सांभाळली, साम्राज्याच्या समस्यांशी सामना केला, आणि स्मृतिआड न झालेल्या नजीकच्या काळातील भारताच्या इतिहासाच्या घडणीस हातभार लावला. या सर्व गोष्टींच्या स्मृती म्हणजे या जमातीचा अमूल्य ठेवा होय'

इंग्रज
शिवाजी महाराजांचा उदय होत असतानाच इंग्रज आपली व्यापारी मक्तेदारी पश्चिम किनाऱ्यावर मिळविण्याच्या प्रयत्नांत होते. शिवाजी राजांची वाढती सत्ता ही त्यांना धोकादायक वाटत होती. शिवाजी महाराजांनी त्यांना व्यापाराच्या सवलती दिल्या, पण मराठी भूमीवर ते पाय रोवून उभे राहणार नाहींत याची दक्षता ठेवली. कारण व्यापाराचे निमित्त करुन प्रदेश बळकावयाचा ही त्यांची सुप्त इच्छा महाराजांना उमजली होती. पण इंग्रजांची ही कुटिल नीती पेशव्यांच्या ध्यानी न आल्याने नानासाहेब पेशव्याने त्यांना मराठ्यांच्या राजकारणात हस्तक्षेप करण्याची संधी उपलब्ध करून दिली, आणि १७५४ साली कुलाब्याच्या आंगऱ्यांच्या आरमाराचा धुव्वा उडविला. मराठेच स्वतःचे संहारक आहेत हे आतापवेतो इंग्रजांनी ओळखले होते. मद्रासच्या लष्करी पत्रसंग्रहातील १७ एप्रिल १७७० च्या एका पत्रात म्हटले आहे की आपापसातील कलहामुळे मराठे आपला विनाश ओढवून घेतील हे आता लक्षात आले आहे, आणि त्याला तशी सबळ कारणे आहेत. मराठे सरदार हे एकमेकाविरुद्ध मिळणारी एकही संधी दवडणार नाही हे हिंदुस्थानांतील इतर सत्तांना लाभदायकच ठरणार आहे.
परंतु मराठ्यांना मुळासकट उखडून काढणारा यशस्वी मुत्सद्दी म्हणजे माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टन हा होय. १८११ साली तो प्रथम पुण्यांत रेसिडेंट म्हणून आला. मराठ्यांची सत्ता नष्ट करण्याचे मनसुबे त्याने रचले. १८१७ साली अखेरच्या इंग्रज-मराठे युद्धाला तोंड फुटले, आणि शेवटी ३ जून १८१८ रोजी दुसरा बाजीराव हा माल्कमला शरण गेला; आणि मराठी राज्याचे वैभव नष्ट झाले. पेशव्यांपासून जिंकून घेतलेल्या प्रदेशावर १८१९ साली कमिशनर आणि नंतर मुंबई प्रांताचा गव्हर्नर बनला. महाराष्ट्रात ब्रिटिश राजवटीची पायाभरणी एलफिन्स्टनने केली. प्रशासनांत त्याने विशेष बदल काही केले नाहीत, पण जिंकलेल्या प्रदेशाची व्यवस्था लावणे, शैक्षणिक धोरण अवलंबिणे, पेशव्यांच्या दक्षिणा फंडातून संस्कृत कॉलेज ( जे पुढे डेक्कन कॉलेज बनले ) स्थापन करणे इत्यादी महत्त्वाची कामे त्याने केली.


इंग्रज सत्तेविरुद्ध बंडावा
मराठ्यांना इंग्रजांची राजवट केव्हांच रुचली नाही. इंग्रज अधिकाऱ्यांविरुद्ध ते सतत बंडावा करीत. उमाजी नाईकाच्या नेतृत्वाखाली १८२६ सालीं पुणे जिल्ह्यांतील रामोशांनी बंड करून इंग्रजांना सतावून सोडले, आणि शेवटी त्यांना समझोता करावयास लावला. सरकारने रामोश्यांचे गुन्हे माफ केले, त्यांना सरकारी नोकरीत प्रवेश दिला आणि इनाम जमिनीही दिल्या. नाशिकचा राघु भांग्‌ऱ्या, नगरचा रामजी आणि त्याचा साथीदार रतनगडचा किल्लेदार गोविंदराव खारी यांना इंग्रज सत्तेला शह दिला. पुणे आणि नगर जिल्ह्यांतील कोळीही संघटित झाले. आश्चर्याची गोष्ट म्हणजे या साऱ्या अशिक्षित आणि दऱ्याखोऱ्यांत राहणाऱ्या निःशस्त्र लोकांनी इंग्रज सत्तेला विद्वानांच्या स्वातंंत्र्य लढ्यापूर्वी कितीतरी आधी आव्हान दिले होते.
१८५७ च्या उठावात महाराष्ट्राचा फारसा वाटा नव्हता. पण या उठावाचे पुढारी नानासाहेब, तात्या टोपे, झांशीची महाराणी लक्ष्मीबाई ही सारी मंडळी होती.
१८५७साली पुणे, सातारा, नगर येथील शेतकऱ्यांनी जुलमी सावकारांच्या विरुद्ध उठाव केला. ब्रिटिशांच्या पाठिंब्यामुळे हे सावकार जुलूम करीत होते. शेतकऱ्याचे दंगे या नावांने ही घटना ओळखली जाते. न्यायमूर्ती रानडे आणि सार्वजनिक काका यांनी रयतेची बाजू मांडली. सरकारने नंतर १८७९ साली डेक्कन ऍग्रिकल्चरल रिलिफ ऍक्ट पास करून शेतकऱ्यांना संरक्षण दिले.
वासुदेव बलवंत फडके याने सशस्त्र प्रतिकाराच्या धोरणाचा अवलंब करून इंग्रजांना हुसकावून भारतीय गणराज्याची स्थापना करण्याची मोहीम १८७९ साली सुरू केली. पण त्याला यश आले नाही. त्याला अटक करून एडन येथे कारावासात ठेवले. तेथेच तो १८८३ सालीं मरण पावला. पुढे चाफेकर बंधूंनी २२ जून १८९७ साली पुणे येथे रॅंड आणि लेफ्टनंट आयर्स्ट यांचे खून केले, आणि फाशीची शिक्षा स्वीकारली. मराठ्यांचा इंग्रजांना सतत विरोध राहिला याचे कारण त्यांनी आपल्या सर्वस्वाचे अपहरण केले आहे याचे त्यांना कधीच विस्मरण पडले नाही. इंग्रजांनी हिंदुस्थान जिंकला तो मराठ्यांच्या पराभव करून, आणि म्हणूनच मराठ्यांचा आपल्याला विरोध राहणार याची त्यांना कल्पना होती जी. डब्ल्यू. स्टीव्हन्सने १८९९ साली प्रसिद्ध झालेल्या इंडिया ऑफ यस्टर इयर्स या पुस्तकात ती व्यक्त केली आहे.


सामाजिक सुधारणा चळवळी
मुंबई, पुणे यासारख्या नगरांतील बुद्धिवादी लोकांवर पाश्चिमात्य शिक्षणाचा जो प्रभाव पडत होता यातूनच एकोणिसाव्या शतकात महाराष्ट्रातील सामाजिक सुधारणेच्या चळवळीचा प्रारंभ झाला. या सुधारकांनी अंतर्मुख होऊन आपली समाजव्यवस्था, धार्मिक रूढी, यांचा चिकित्सकपणे अभ्यास करून राजकीय स्वातंत्र्यापेक्षा सामाजिक सुधारणांना अग्रक्रम दिला. प्रारंभी या कार्यात त्यांना सनातनी लोकांकडून कडवा विरोध सहन करावा लागला. बाळशास्त्री जांभेकर (१८१२-४६) यांनी सतीची चाल, लहान मुलींची हत्या, या रुढींचा धिःकार तर केलाच, परंतु हिंदू धर्माचा त्याग करून परधर्म स्वीकारलेल्या लोकांना परत स्वधर्मात यावयाचे असेल तर शुद्धीकरणाची मुभा असली पाहिजे यासाठी झगडा केला. गोपाळ हरी देशमुख तथा लोकहितवादी (१८२३-९२) यांनी आपल्या शतपत्रे या संग्रहातून सामाजिक आणि धार्मिक सुधारणांना विरोध करणाऱ्या सनातनी ब्राह्मणांवर कडाडून हल्ला केला. जोतीराव गोविंदराव फुले (१८२७-१८९०) यानी सत्यशोधक समाजाची स्थापना करून जाती व्यवस्थेवर आघात केले, हरिजनांचा पक्ष उचलून धरला, आणि मागासलेल्या समाजांतील स्त्रियांच्या शिक्षणासाठी जीवापाड मेहनत केली. रामकृष्ण गोपाळ भांडारकर (१८३७-१९२५) आणि न्यायमूर्ती महादेव गोविंद रानडे (१८४२-१९०१) यांनी सामान्य सामाजिक आणि धार्मिक सुधारणा घडवून आणण्यासाठी प्रार्थना समाज स्थापण्याच्या कामी पुढाकार घेतला. गोपाळ गणेश आगरकर (१८५६-१८९५) यांनी सामाजिक सुधारणांना अग्रक्रम दिला. धोंडो केशव कर्वे (१८५८-१९६२) यांनी तर आपले सारे जीवन स्त्रीशिक्षणासाठी समर्पित केले. बेहरामजी मलबारी (१८५३-१९१२) या मुंबईच्या पारशी सुधारकाने सर्व जातींच्या स्त्रियांसाठी सेवा सदन ही संस्था काढली. पंडिता रमाबाई (१८५८-१९२२) यांनी शारदा सदन संस्था काढून वरिष्ठ वर्गातील विधवा स्त्रियांना संरक्षण दिले. ऑक्सफर्ड विद्यापीठाची पदवी धारण करणारे महर्षी विठ्ठल रामजी शिंदे (१८७३-१९४४) यांनी अस्पृश्यता निर्मूलनासाठी डिप्रेस्ड क्लासेस मिशन ही संस्था काढली. कोल्हापूरचे छत्रपती शाहू महाराज (१८७४-१९२२) यांनी जाति संस्थेला विरोध केला, हरिजनांचा पक्ष उचलून धरला, आणि आपल्या संस्थानात शिक्षण प्रसाराचे मोठे कार्य केले. रयत शिक्षण संस्थेचे संस्थापक कर्मवीर भाऊराव पाटील (१८८७-१९५९) यांनी महात्मा फुले, महर्षी शिंदे आणि शाहू महाराज यांच्या कार्याची परंपरा चालविली. डॉ. भीमराव रामजी तथा बाबासाहेब आंबेडकर (१८९१-१९५६) यांचा महाराष्ट्राला सतत अभिमान वाटेल. त्यांनी हरिजन जमातीमध्ये सामाजिक आणि राजकीय जागृती निर्माण केली. भारताच्या संविधानाचे ते प्रमुख शिल्पकार होते. हिंदु धर्मातील अनिष्ट आणि जुलमी रूढी आणि परंपराशी ते सतत झगडत राहिले.

महाराष्ट्र आणि स्वातंत्र्य संग्राम
भारतीय राष्ट्रीय सभेचे पहिले अधिवेशन १८८५ साली महाराष्ट्राच्या राजधानीत-मुंबईस-भरले होते. समाजिक, आर्थिक आणि राजकीय समस्यांबद्दल लोकमत बनविण्यासाठी न्यायमूर्ती रानड्यांनी निरनिराळ्या संस्था काढल्या आणि राष्ट्रीय चळवळीला उदारमतवादाची दिशा दाखविली.
दादाभाई नौरोजी, फिरोजशहा मेहता, दिनशा वाच्छा, ही मुंबईची पारशी मंडळी कॉंग्रेसच्या धुरीणांपैकी होती. १८९० ते १९२० या कालखंडातील महाराष्ट्राचे दोन राजकारण धुरंधर म्हणजे बाळ गंगाधर टिळक (१८५६-१९२०) आणि गोपाळ कृष्ण गोखले (१८६६-१९१५). शिवाजी उत्सव आणि गणेश उत्सव यांच्या माध्यामातून टिळकांनी बहुजन समाजाला देशाच्या राजकारणांत आणले. स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे हा मंत्र त्यांनी स्वांतत्र चळवळीला दिला. भारतातील असंतोषाचे जनक अशी त्यांची ओळख इंग्रजांनी करून दिली आहे. न्यायमूर्ती रानड्यांचे शिष्य गोखले हे बुद्धिवाद्यांचे पुढारी होते. समन्वय आणि समझोता हे त्यांच्या राजकीय धोरणाचे मुख्य सूत्र होते. महाराष्ट्र हा लढाऊ वृत्तीच्या लोकांचा देश असल्याने जनमानसावर लोकमान्यांच्या विचारसरणीचा अधिक प्रभाव होता. अभिनव भारत या दहशतवादी विचारसरणीचा विश्वास असणाऱ्या संस्थेचे अध्वर्यू विनायक दामोदर सावरकर हे तरूणांचे लाडके नेते होते. महात्मा गांधी नामदार गोखल्यांना आपले राजकीय गुरू मानीत. महाराष्ट्र हे रचनात्मक कार्यकर्त्यांचे मोहोळ आहे, असे ते म्हणत. महाराष्ट्राने त्यांच्या विविध चळवळींना उत्तम प्रतिसाद दिला. याच सुमारास काकासाहेब गाडगीळांच्या आर्जवी प्रयत्नांमुळे केशवराव जेध्यांच्या नेतृत्वाखाली बहुजनसमाज कॉंग्रेसमध्ये सामील झाला. भारत छोडो हा निर्वाणीचा इशारा १९४२ साली इंग्रजाना मुंबई येथे देण्यात आला या इशाऱ्याची परिणती पुढे १९४७ साली राजकीय सत्तांतरात झाली. रावसाहेब आणि अच्युतराव पटवर्धन, नानासाहेब गोरे, एस. एम. जोशी, यशवंतराव चव्हाण, वसंतदादा पाटील आणि इतर असंख्य राष्ट्रभक्तांनी या शेवटच्या लढ्यात महत्त्वपूर्ण कामगिरी बजावली. बाळासाहेब खेर हे मूळच्या त्रैभाषिक मुंबई इलाख्याचे पहिले महामंत्री होत. मोरारजी देसाई यानी नंतर त्यांची जागा घेतली.


संयुक्त महाराष्ट्र
कॉंग्रेसने भाषावर प्रांतरचनेचे तत्त्व मान्य केले होते. पण १९५६ सालच्या राज्यपुनर्रचना समितीने महाराष्ट्राच्या बाबतीत मात्र ते लागू केले नाही आणि येथे गुजराती व मराठी लोकांचे द्वैभाषिक राज्य निर्माण करून मुंबई राजधानी केली. महाराष्ट्रात यावर तीव्र प्रतिक्रिया झाली. केशवराव जेध्यांच्या नेतृत्वाखाली पुणे येथे एक सर्वपक्षीयांची सभा होऊन ६ फेब्रूवारी १९५६ साली संयुक्त महाराष्ट्र समितीची स्थापना झाली. दुसऱ्या सार्वत्रिक निवडणुकीत या समितीला भरघोष यश मिळाले. विधानसभेच्या १३३ पैकी समितीला १०१ जागा मिळाल्या. यात मुंबई शहराच्या १२ जागा होत्या. गुजरात, मराठवाडा आणि विदर्भ यांच्या सहकार्याने कॉंग्रेसला मंत्रिमंडळ बनविता आले. या विशाल द्वैभाषिकाचे यशवंतराव चव्हाण हे पहिले मुख्यमंत्री बनले. एस. एम. जोशी, डांगे, नानासाहेब गोरे, आचार्य अत्रे यांनी संयुक्त महाराष्ट्राचा लढा तीव्र केला. काही लोकांना आत्मबलिदान करावे लागले. पण कॉंग्रेसचे मतपरिवर्तन करण्यात त्यांना शेवटी यश आले. नेहरूंच्या मंत्रिमंडळातील चिंतामणराव देशमुखांनी आपल्या अर्थमंत्रीपदाचा राजीनामा दिला. १ मे १९६० रोजी, पश्चिम महाराष्ट्र, विदर्भ आणि मराठवाडा यांचे पंडित जवाहरलाल नेहरूच्या आशीर्वादाने `महाराष्ट्र राज्य' निर्माण झाले. मोहोलोश ते महाराष्ट्र ही ऐतिहासिक वाटचाल १९६० मध्ये पूर्ण झाली. आणि मराठी माणसाचे अनंत वर्षांचे स्वप्न साकार झाले.
ह्यूएनत्संगने तेराशे वर्षांपूर्वी रेखाटलेल्या प्रतिमेशी नूतन महाराष्ट्राचा तोंडवळा मिळताजुळता आहे.

Wednesday, December 31, 2014

महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा (पूर्व) परीक्षा- २०१५ जाहीर अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : 20 जानेवारी 2015 पूर्व परीक्षा दिनांक : 5 एप्रिल 2015


महाराष्ट्र लोकसेवा आयोगामार्फत राज्य सेवा (पूर्व) परीक्षा- २०१५ जाहीर
अर्ज करण्याचा शेवटचा दिनांक : 20 जानेवारी 2015


पूर्व परीक्षा दिनांक : 5 एप्रिल 2015

ब्रिटिश सत्तेची भारतामध्ये स्थापना (Establishment of British rule in India)


 बंगालमध्ये इंग्रज सत्तेचा उदय:
१. भारतात इंग्रजांचे बस्तान
२. प्लासीची लढाई
३. मीर कासीमशी तह
४. बक्सारची लढाई आणि तिचे महत्व

  १. भारतात इंग्रजांचे बस्तान:
  • व्यापाराच्या उद्देशाने पोर्तुगीज आणि डच यांच्या नंतर इंग्रज भारतात आले. त्यासाठी त्यांनी ईस्ट इंडिया कंपनी स्थापन झाली. 
  • इंग्रजांची पहिली वखार मुगल सम्राट जहांगीर च्या कारकीर्दीत पश्चिम किनार्‍यावर सुरत येथे स्थापन झाली.
  • बंगालमध्ये पहिली इंग्रज वखार १६५१ मध्ये हुगळी येथे निघाली. त्यासाठी बंगालचा तत्कालीन सुभेदार शाहशुजा ह्याने इंग्रजांना परवानगी दिली.
  • त्याचवर्षी राजवंशातील एका स्त्रीवर डॉ. बाऊटन ह्याने केलेल्या उपचारांमुळे खूष होऊन शाहशुजाने इंग्रजांना वार्षिक रु. ३०००/- च्या मोबदल्यात संपूर्ण बंगाल, बिहार आणि ओरिसात  मुक्त व्यापाराची परवानगी दिली. 
 २. प्लासीची लढाई:
  • १७५६ मध्ये सिराजउदौला बंगालचा नबाब बनला. ह्याच सुमारास फ्रेंचांशी युद्ध सुरु होण्याची परिस्थिती दिसू लागल्याने   इंग्रजांनी फोर्ट विलियम लढण्यासाठी सज्ज केला व पराकोटावर तोफा चढविल्या.  ह्याबद्दल सिराजउद्दौलाने जाब विचारला असता इंग्रजांनी टाळाटाळीचे उत्तर दिले. त्यामुळे सिराजउदौलाने इंग्रजांविरुद्ध मोहीम सुरु केली आणि फोर्ट विलियमवर हल्ला चढविला. ५ दिवसानंतर इंग्रजांनी शरणागती पत्करली आणि कलकत्त्याचा ताबा माणिकचंदकडे नबाब राजधानी मुर्शिदाबाद येथे निघून गेला.
  • कलकत्ता सिराजउदौलाच्या हाती पडल्याची बातमी मद्रासला पोहोचताच  तेथील अधिका-यांनी तेथील एक सैन्य क्लाइव्हच्या नेतृत्वाखाली कलकत्त्याला पाठवले. हे सैन्य कलकत्त्याला जाताच (डिसेंबर १७५६) माणिकचंदने लाच घेऊन कलकत्त्याचा ताबा इंग्रजांना दिला. 
  • ह्यानंतर सिराजउदौला आणि क्लाइव्ह ह्यांच्यात कलकत्ता येथे एक तह झाला. त्यानुसार इंग्रजांना व्यापारातील जुन्या सवलती पुन्हा मिळाल्या तसेच कलकत्त्याची लष्करी सिद्धता करण्याची अनुमती मिळाली. इंग्रजांचे झालेले नुकसान भरून देण्याचे नबाबाने कबूल केले. परंतु इंग्रज आता आक्रमक भूमिकेत होते. तसेच नबाबाचे काही अधिकारी त्याच्यावर नाराज होते. संधीचा फायदा घेत क्लाइव्हने कारस्थान रचले. त्यात नबाबाचा मुख्य सेनापती मीर जाफर इ. सहभागी झाले. कारस्थान असे ठरले कि मीर जाफरला नबाब बनवले जाईल आणि त्याऐवजी तो कंपनीच्या उपकाराची परतफेड करेल.
  • मार्च १७५७ मध्ये इंग्रजांनी फ्रेंच वसाहत चंद्रनगर जिंकून घेतले. त्यामुळे नबाब संतापला. पण तो अडचणीत होता कारण त्याला अफगानांकडून व मराठ्यांकडून आक्रमण होण्याची भीती वाटत होती. नेमक्या अशावेळी क्लाइव्ह आपल्या सैन्यासह मुर्शिदाबादकडे निघाला. 
  • इंग्रज सैन्य आणि नबाब सिराजउदौलाचे सैन्य २३ जून १७५७ रोजी मुर्शिदाबादच्या दक्षिणेला २२ मैलांवर असलेल्या प्लासी गावात एकमेकांसमोर आले. इंग्रज सैन्यात ९५० युरोपियन पायदळ, १०० युरोपियन तोफ, ५० इंग्रज नाविक आणि २१०० भारतीय सैनिक होते. 
  • लढाई चालू असताना मीर जाफरने नबाबला सल्ला दिला कि त्याने युद्धकार्य  अधिका-यांकडे सोपवावे आणि स्वतः युद्धभूमी सोडून निघून जावे. त्याप्रमाणे नबाब २००० सैन्य घेऊन मुर्शिदाबादकडे निघून गेला. नबाबाकडील फ्रेंच सेनाही लवकर पराभूत झाली. मीर जाफर सर्व लढाई तटस्थपने बघत राहिला. क्लाइव्हच्या विजयाबद्दल मीर जाफरने त्याचे अभिनंदन केले.
  • लवकरच नबाब सिराजउदौला याला पकडून ठार मारण्यात आले आणि मीर जाफरला बंगालचा नबाब म्हणून घोषित करण्यात आले.
  • इंग्रजांच्या मदतीबद्दल मीर जाफरने कंपनीला २४ परगणे जिल्ह्याचा प्रदेश दिला. स्वतः क्लाइव्हला २,३४,००० पौन्ड्स भेट देण्यात आली आणि इतरांना रु. ५० लक्ष बक्षीस देण्यात आले. बंगालमधील सर्व फ्रेंच वसाहती इंग्रजांना देण्यात आल्या. तसेच कोणताही इंग्रजांकडून नबाब घेणार नाही असे ठरले.
 प्लासीच्या लढाईचे महत्व :
  • लष्करी दृष्टीने पाहता प्लासीची लढाई फारशी महत्वाची नव्हती. इंग्रजांनी खास लष्करी डावपेचाचे किंवा चातुर्याचे प्रदर्शन केले नाही. नबाबाच्या सहकार्यांनी त्याचा विश्वासघात केला. 
  • प्लासीच्या लढाईचे खरे महत्व त्यानंतर घडलेल्या घटनाक्रमांमुळे आहे. बंगाल इंग्रज नियंत्रणाखाली आला. नवीन नबाब मीर जाफर आपले पद आणि संरक्षण ह्यासाठी पूर्णतः इंग्रजांवर अवलंबून राहिला. हळूहळू बंगालची सर्व सत्ता कंपनीकडे आली.प्लासीच्या लढाईने विशेषतः त्यानंतर इंग्रजांनी बंगालच्या केलेल्या लुटीमुळे इंग्रज अपरिमित साधनसंपत्तीचे स्वामी बनले. कंपनीच्या स्थितीचाही कायापालट झाला. इंग्रजांनी हि लढाई जवळ जवळ न लढतच जिंकली. भारतावर अधिकार मिळवण्याच्या साखळीतील हि महत्वाची कडी होती. 
 ३. मीर कासीमशी तह:  

  • मीर जाफरविरुद्ध निर्माण होत असलेल्या परिस्थितीचा अचूक फायदा मीर जाफरचा धूर्त जावई मीर कासीम ह्याने घेऊन स्वतःला इंग्रजांचा मित्र व नबाबाचा प्रतिस्पर्धी जाहीर केले. इंग्रजांच्या आर्थिक अडचणी दूर करण्याचेही त्याने आश्वासन दिले. त्यादृष्टीने इंग्रज व मीर कासीममध्ये खालील तह झाला.
    •  मीर कासीमने कंपनीला बरद्वान, मिदनापूर व चितगाव जिल्हे द्यावे.
    • सिल्हटच्या चुना व्यापारात कंपनीची अर्धी भागीदारी राहील.
    • मीर कासीम कंपनीला दक्षिण मोहिमांसाठी रु. ५ लक्ष देईल.
    • कंपनीचे शत्रुमित्र मीर कासीम आपले शत्रुमित्र मानील.
    • एकमेकांच्या प्रदेशातील लोकांना रहिवासाची संमती देण्यात येणार नाही.
    • कंपनी मीर कासीमला लष्करी मदत देईल. परंतु अंतर्गत कारभारामध्ये हस्तक्षेप करणार नाही.
  • तहाची अंमलबजावणी करण्यासाठी इंग्रज अधिकारी मुर्शिदाबादला गेले. एकून परिस्थिती आपल्याविरुद्ध गेल्याची पाहून मीर जाफरने सत्तात्याग केला. त्यानंतर मीर जाफरने कलकत्ता येथे राहणे पसंद केले. त्याला रु. १५,०००/- मासिक पेन्शन देण्याचे ठरले. 
 ४. बक्सारची लढाई आणि तिचे महत्व:
  • कालांतराने मीर कासीम हि इंग्रजांच्या हातातील खेळणे बनले. व्यापारीवृत्तीच्या इंग्रजांनी अखेर मीर कासिम्ला संघर्ष करण्यास प्रवृत्त केले. 
  • प्रत्यक्षात संघर्षाला प्रारंभ १७६३ मध्ये झाला. ताबडतोब मीर कासिमाला नबाब पदावरून हटवून मीर जाफरला पुन्हा बंगालच्या नबाबपदावर बसवण्यात आले. मात्र संघर्ष सुरूच राहिला. हळूहळू मीर कासीमची ताकद कमी पडू लागली. म्हणून तो सीमेवरील अवध राज्यात निघून गेला. ह्यावेळी अवधाचा नबाब शुजा उद्दौला होता. पानिपतच्या युद्धाच्या वेळी दिल्लीहून पळालेला मुगल सम्राट शाह आलम अवधच्याच आश्रयाला होता. इंग्रजांना बाहेर काढण्याबाबत वरील तिघांचे संगनमत होऊन त्यांनी एक संयुक्त फळी तयार केली. त्यात सुमारे ५०,००० च्या आसपास सैनिक होते. 
  • ह्या सैन्याचा मुकाबला कंपनीबरोबर बक्सार येथे झाला. इंग्रज सैन्यात ७०२७ सैनिक असून त्याचे नेतृत्व मेजर मनरोकडे होते.
  • २३ ऑक्टोबर १७६४ रोजी झालेल्या बक्साराच्या लढाईत उभयपक्षी हानी झाली. मात्र विजय इंग्रजांना मिळाला. लढाईत इंग्रजांकडील ८४७ सैनिक जखमी किंवा मृतुमुखी पडले. 
  • प्लासीची लढाई आणि बक्सारची लढाई यामध्ये महत्वाचा फरक म्हणजे प्लासीची लढाई इंग्रजांनी विश्वासघाताच्या मार्गाने जिंकली होती. मात्र बक्सारची लढाई इंग्रजांनी स्वतःच्या युद्धकौशल्यावर जिंकली. 
  • प्लासीच्या निर्णयावर बक्साराच्या विजयाने शिक्कामोर्तब केले. भारतात आता इंग्रजांना आव्हान देणारे दुसरे कोणी राहिले नाही. बंगालचा नबाब इंग्रजांच्या हातातील खेळणे बनला. अवधाचा नबाब शुजा उदौला आणि देल्ली सम्राट शाह आलम इंग्रजांना शरण आले. इंग्रजांचे क्षेत्र पश्चिमेला अलाहाबाद्पर्यंत वाढले आणि त्यामुळे दिल्लीला जाण्याचा मार्ग मोकळा झाला. 
  • प्लासीच्या लढाईने इंग्रज सत्ता दृढमूल झाली तर बक्सारच्या लढाईने उत्तर भारतात ती बलशाली बनली. भारत गुलामगिरीत जाणार हे स्पष्ट दिसत होते. बक्सारची लढाई भारताच्या इतिहासात निर्णायक ठरली होती.

#‎अतिसंभाव्य‬ १०० प्रश्नोत्तरे:- STI पूर्वपरीक्षा 2015


‪#‎चालू‬ घडामोडी:- डिसेंबर २०१४
०१) ‘भारतरत्न’ हा देशातील सर्वोच्च नागरी पुरस्काराचे ४४वे व ४५वे मानकरी कोण ठरले आहेत?
== स्वातंत्र्य सेनानी पंडित मदन मोहन मालवीय(मरणोत्तर) आणि माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी
०२) मरणोत्तर ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर झालेले पंडित मदन मोहन मालवीय हे कितवे भारतीय आहेत?
== बारावे
०३) ‘भारतरत्न’ पुरस्कार जाहीर झालेले माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी हे कितवे पंतप्रधान आहेत?
== सातवे
पंडित मदन मोहन मालवीय यांचा जन्म कधी व कोठे झाला?
== २५ डिसेंबर १८६१ मध्ये अलाहाबाद येथे(मृत्यू:-१२ नोव्हेंबर १९४६-वाराणसी)
०४) अटलबिहारी वाजपेयी यांचा जन्म कधी व कोठे झाला?
== सन २५ डिसेंबर १९२४ मध्ये ग्वाल्हेर येथे
०५) नरेंद्र मोदी सरकारने २५ डिसेंबर हा दिवस कोणता दिन म्हणून पाळण्याची घोषणा केली आहे?
== 'सुशासन दिवस' Good Governance Day
०६) आशियातील सर्वात मोठे निवासी विद्यापीठ म्हणून ओळखलेले जाणार्या बनारस हिंदू विद्यापीठाची स्थापना पंडित मदन मोहन मालवीय यांनी कोणत्या वर्षी केली होती?
== १९१६
०७) १९०९(लाहोर-रौप्यमहोस्तवी),१९१८(दिल्ली) १९३२(दिल्ली) आणि १९३३(कलकत्ता) असे चार वेळेस भारतीय राष्ट्रीय काँग्रेस पक्षाचे अध्यक्ष असलेली व्यक्ती कोण?
== पंडित मदन मोहन मालवीय
०८) हिंदुस्थान असेच इंडियन ओपीनियन,साप्ताहिक अभ्युदय या साप्ताहिकाचे संपादक व अलाहाबादमधून प्रकाशित होणा-या 'द लीडर' या इंग्लिश वर्तमानपत्राचेही संस्थापक असलेली व्यक्ती कोण?
== पंडित मदन मोहन मालवीय
०९) 'मकरंद' आणि 'झक्कड़सिंह' या टोपणनावाने कविता करणारे स्वातंत्रसैनानी कोण?
== पंडित मदन मोहन मालवीय
१०) पंडित मदन मोहन मालवीय यांचे काम आणि सेवाभावी वृत्तीने प्रभावित होऊन लोक त्यांना काय म्हणत असत?
== महामना
११) चौरीचौरा कटाच्या खटल्यात (१९२२) आरोपीची बाजू मांडणारे वकील कोण?
== पंडित मदन मोहन मालवीय
१२) पाचवर्षांचा कार्यकाळ पूर्ण करणारे पहिले बिगर काँग्रेसी पंतप्रधान कोण?
== अटलबिहारी वाजपेयी
१३) १९७७ मध्ये मोरारजी देसाई यांच्या नेतृत्वाखाली जनता पक्षाचे सरकार सत्तेवर असताना अटलबिहारी वाजपेयी यांनी कोणत्या खात्याचा कार्यभार संभाळला होता?
== परराष्ट्र खाते (२४ मार्च १९७७ ते २८ जुलै १९७९)
१४) १६ मे ते १ जून १९९६ आणि नंतर १९ मार्च १९९८ ते २२ मे २००४ पर्यंत भारताच्या पंतप्रधानपदी विराजमान असलेला नेता कोण?
== अटलबिहारी वाजपेयी(तीनदा पंतप्रधान)
१५) भारतीय जनसंघ या पक्षाचे सहसंस्थापक आणि १९६८ ते १९७३ पर्यंत त्याचे अध्यक्षपद भूषविणारी व्यक्ती कोण?
== अटलबिहारी वाजपेयी
१६) अटलबिहारी वाजपेयी यांचे आदर्श कोण होते?
== डॉ॰ श्यामा प्रसाद मुखर्जी आणि पंडित दीनदयाल उपाध्याय
१७) भारतीय जनसंघाचे अध्यक्ष (१९६८-१९७३), जनसंघाच्या संसदीय दलाचे नेते (१९५५-१९७७), जनता पक्षाचे संस्थापक सदस्य (१९७७-१९८०), भारतीय जनता पक्षाचे अध्यक्ष (१९८०-१९८६) आणि भारतीय जनता पक्ष संसदीय दलाचे नेते (१९८०-१९८४, १९८६, १९९३-१९९६), ११ व्या लोकसभेतील विरोधी पक्षाचे नेते असलेली व्यक्ती कोण?
== अटलबिहारी वाजपेयी
१८) अटलबिहारी वाजपेयी १९५७ मध्ये संसदेवर कोणत्या मतदारसंघातून निवडून आले?
== बलारामपूर
१९) १९७७ च्या संयुक्त राष्ट्रांच्या आमसभेत हिंदीतून भाषण करणारी भारतीय व्यक्ती कोण?
== अटलबिहारी वाजपेयी
२०) मे १९९८ मध्ये वाजपेयी सरकारने जमिनीखाली ५ अणुचाचण्या कोठे केल्या?
== पोखरण(राजस्थान) Operation Shakti–98
२१) सदा ए सरहद या नावाने ओळखली जाणारी लाहोर-दिल्ली बससेवेची सुरवात १९९८ मध्ये करणारे पंतप्रधान कोण?
== अटलबिहारी वाजपेयी
२२) राष्ट्रधर्म (मासिक),पाञ्चजन्य (साप्ताहिक) आणि स्वदेश व वीर अर्जुन या दैनिकांचे संपादक म्हणून काम पाहणारी व्यक्ती कोण?
== अटलबिहारी वाजपेयी
२३) सन १९९९ साली तालिबान अतिरेक्यांनी IC - ८१४(काठमांडू कडून दिल्ली) या प्रवासी विमानाचे अपहरण केले होते ही घटना कोणत्या भारतीय पंतप्रधानाच्या काळात घडली आहे?
== अटलबिहारी वाजपेयी
२४) कारगिल युध्दाच्या वेळी १९९९ मध्ये ऑपरेशन विजय कोणत्या भारतीय पंतप्रधानाच्या काळात सुरु झाले?
== अटलबिहारी वाजपेयी
२५) २००१ साली दहशतवादी अफझल गुरु आणि त्याच्या साथीदारांनी संसदेवर हल्ला केला ही घटना कोणत्या भारतीय पंतप्रधानाच्या काळात घडली आहे?
== अटलबिहारी वाजपेयी
२६) माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांना कोण-कोणत्या पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे?
== १९९२ - पद्मविभूषण
१९९३ - कानपूर विद्यापिठाची डॉक्टवरेट
१९९४ - लोकमान्य टिळक पुरस्कार
१९९४ - सर्वोत्कृष्ट संसदपटू
१९९४ - पंडित गोविंद वल्लभ पंत पुरस्कार
२०१४ - भारतरत्न
२७) राष्ट्रीय महामार्ग विकास प्रकल्प आणि प्रधानमंत्री ग्रामसडक योजननेची सुरवात कोणत्या पंतप्रधानांच्या काळात सुरु झाली?
== अटलबिहारी वाजपेयी
२८) माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांची साहित्य संपदा:-
नयी चुनौती, नया अवसर (२००२)
इंडियाज पर्स्पेक्टिीव्ह ऑन एशियान अँड एशिया- पॅसिफिक रिजन (२००३)
न्यू डायमेन्शन्स ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी (१९७९)
डिसीसिव्हज डेज (१९९९)
नॅशनल इंटिग्रेशन (१९६१)
शक्ती से शांती (१९९९)
राजनीती की रपतिली रहेम (१९९७)
विकारा बिंदू (हिंदी आवृत्ती) (१९९७)
कुछ लेख, कुछ भाषण (१९९६)
बॅक टू स्क्वेअर (१९९८)
डायनॅमिक्स् ऑफ ॲन ओपन सोसायटी (१९७७)
‘मेरी संसदीय यात्रा’ (चार खंड),
‘फोर डिकेडस इन पार्लमेंट’ (तीन खंडांत भाषणांचा संग्रह) १९५७- ९५,
‘लोकसभा में अटलजी’ (भाषणांचा संग्रह),
‘कैदी कवीराज की कुंडलियाए’
‘न्यू डायमेन्शन्स ऑफ इंडियाज फॉरेन पॉलिसी (१९७७- ७९ या काळात परराष्ट्रमंत्री असताना केलेल्या भाषणांचा संग्रह)
२९) माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांचे कवितासंग्रह:-
ट्‌वेन्टी वन पोएम्स (२००३)
क्यार खोया, क्या२ पाया (१९९९)
मेरी इक्याावन कविताएँ (१९९५)
श्रेष्ठ कविता (१९९७)
‘अमर आग हैं’

३०) माजी पंतप्रधान अटलबिहारी वाजपेयी यांच्या काही प्रसिध्द रचना:-
अंतरद्वंद्व
अपने ही मन से कुछ बोलें
ऊँचाई
एक बरस बीत गया
क़दम मिला कर चलना होगा
कौरव कौन, कौन पांडव
क्षमा याचना
जीवन की ढलने लगी साँझ
झुक नहीं सकते
दो अनुभूतियाँ
पुनः चमकेगा दिनकर
मनाली मत जइयो
मैं न चुप हूँ न गाता हूँ
मौत से ठन गई
हरी हरी दूब पर
हिरोशिमा की पीड़ा
३१) युवक काँग्रेसच्या अध्यक्षपदावरून खासदार राजीव सातव यांना हटवून पंजाबमधील आमदार असलेल्या कोणत्या नेत्याची नियुक्ती करण्यात आली आहे?
== अमरिंदर राजा ब्रार
३२) कोळसा खाणींचे वाटप करणाऱ्या तसेच विमा क्षेत्रात ४९ टक्के थेट विदेशी गुंतवणुकीला परवानगी देणाऱ्या दोन महत्त्वपूर्ण अध्यादेशांना केंद्रीय मंत्रिमंडळाच्या बैठकीत कधी मंजुरी देण्यात आली?
== २४ डिसेंबर २०१४
३३) चीनमधील कोणत्या शहरातील सरकारी शिक्षण विभागाने शाळांमध्ये ख्रिसमससंबंधी कार्यक्रम साजरे करण्यावर बंदी घातली आहे?
== वेंझोऊ
३४) वेंझोऊ हे शहर चीनच्या पूर्व किनाऱ्याला असून इथे असलेल्या ख्रिश्चन बहुसंख्येमुळे त्या शहराला चीनचे ----- म्हणून संबोधले जाते
== जेरुसलेम
३५))उद्योगपती अनिल अंबानी यांच्या रिलायन्स कॅपिटल या कंपनीने कोणत्या जपानी वित्तीय संस्थेशी ख्रिसमसच्या मुहूर्तावर व्यावसायिक करार केला आहे?
== सुमिटोमो मित्सुई ट्रस्ट बँक
३६)एटीएम वापरावर शुल्क आकारण्यास परवानगी दिल्याबद्दल कोणत्या उच्च न्यायालयाने रिझर्व्ह बँकेसह इंडियन बँक्स असोसिएशन (आयबीए) आणि स्टेट बँकेलाही नोटिस पाठविली आहे?
== दिल्ली उच्च न्यायालय ( मुख्य न्यायमूर्ती जी. रोहिणी आणि न्या. पी. एस. तेजी यांच्या खंडपीठाने)
३७) कोणते शहर हे लोकसंख्येच्या तुलनेत भारतातील सर्वात जास्त सायकल वापरणारे शहर म्हणून ओळखले जात असल्याचा अहवाल नाशिक सायकल‌स्टि असोसिएशनने केलेल्या पहाणीत आढळून आला आहे?
== नाशिक
३८) चलनात असलेल्या नोटांत संगती असावी आणि बनावट नोटांची तस्करी रोखण्यास मदत व्हावी या अनुषंगाने रिझर्व्ह बँकेने २००५ पूर्वी नोटा चलनातून बाद करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यावर कधीपासून अंमलबजावणी होणार आहे?
== ३० जून २०१५
३९) आगामी महाराष्ट्र कबड्डी लीगसाठी महाराष्ट्र राज्य कबड्डी असोसिएशनने पुणेस्थित कोणत्या स्पोर्ट्स मॅनेजमेंट कंपनीशी करार केला आहे?
== गॉडविट एन्टरटेन्मेंट प्रायव्हेट लिमिटेड
४०) सात सक्कं त्रेचाळीस या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
== किरण नगरकर
४१) अर्थ मंत्रालयाने कच्च्या तेलासाठी २.५ टक्के; तर वनस्पती तेलासाठी ५ टक्के आयात शुल्क वाढविले आहे.त्यामुळे कच्च्या तेलावरील एकूण आयात शुल्क आणि वनस्पती तेलावरील एकूण आयात शुल्क किती टक्के झाले आहे?
== अनुक्रमे ७.५% आणि १५%
४२) सुमात्रा बेटांच्या उत्तरेला समुद्रात ९.२ रिश्टएर तीव्रतेचा भूकंप बसल्याने प्रचंड त्सुनामी आली होती, त्या घटनेला २६ डिसेंबर २०१४ रोजी किती वर्षे पूर्ण होत आहे?
== दहा वर्षे
४३) पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या स्वच्छ भारत मोहिमेत कोणत्या जिल्ह्यातील ४ लाख ८५ हजार ४७ लोकांनी जिल्ह्यातील १८९० ठिकाणी स्वच्छता मोहीम राबवत नवा विश्व विक्रम केला असून या मोहिमेची नोंद आता गिनेस बुकात होणार असून, या मोहिमेचा देशभर प्रसार करण्यासाठी स्वतंत्र मोबाईल ऍप्लिकेशनदेखील लॉंच केले जाणार आहे. तसेच स्वच्छतेच्या मोहिमेचा संदेश देणारी दिनदर्शिकादेखील प्रसिद्ध केली जाईल?
== सबरकांथा(गुजरात)
४४) केंद्र सरकारची समुद्र विज्ञान संस्था (एनआयओ) आणि राज्याच्या महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाने (एमपीसीबी) यांच्या एकत्रित अहवालानुसार देशातील सर्वाधिक प्रदूषित समुद्रकिनारा कोणता?
== महाराष्ट्राचा समुद्रकिनारा
४५) संगणक आणि टॅबलेट अश्या दोन्ही प्रकारे वापर करता येणारे व विंडोज ८.१ कार्य प्रणालीवर चालणारे कोणते उपकरण माइक्रोसॉफ्ट कंपनीने सादर केले आहे?
== विंडोज टू इन वन
४६) दहशतवादाशी संबंधित खटले तातडीने निकाली काढण्यासाठी विशेष लष्करी न्यायालये स्थापन करण्याचा निर्णय नुकताच कोणत्या देशाने घेतला आहे?
== पाकिस्तान
४७) ‘देशभक्त नथुराम गोडसे’ या चित्रपटाच्या प्रदर्शनावर बंदी घालण्याच्या मागणीसंदर्भात अखिल भारतीय हिंदू महासभेविरोधात पुणे सत्र न्यायालयात याचिका दाखल करण्यात आली आहे. सामाजिक कार्यकर्ते असलेल्या कोणत्या व्यक्तीने ही याचिका दाखल केली आहे?
== हेमंत पाटील
४८) वाढते सायबर गुन्हे रोखण्यासाठी गृह खात्याने तज्ज्ञ अभ्यास गटाची नियुक्ती केली असून यात कोणाचा समावेश करण्यात आला आहे?
== पुण्यातील सी-डॅकचे महासंचालक डॉ. रजत मुना, बंगळूरच्या इंडियन इन्स्टिट्यूट ऑफ सायन्सचे प्रा. कृष्णन, सीहीआरटी-ईनचे महासंचालक डॉ. गुलशन राय, आयआयटी कानपूरचे प्रा. डॉ. मणिंद्र अग्रवाल, बंगळूरआयआयटीचे प्रा. डॉ. डी. दास यांचा समावेश असेल, तर गृह खात्याचे सहसचिव कुमार अलोक हे या तज्ज्ञ गटाचे समन्वयक असतील.
४९) केंद्रीय मंत्रिमंडळ समितीने खासगी कंपन्यांना कोळसा खाणींचे "ई ऑक्श न‘द्वारे पुनर्वाटप करण्यासंदर्भातील अध्यादेश पुन्हा एकदा प्रसिद्ध करण्यास संमती दिली असून या अध्यादेशान्वये पहिल्या टप्प्यात एकूण किती खाणींचे पुनर्वाटप केले जाणार आहे?
== १०१ खाणींचे
सार्वजनिक कंपन्यांना:-३६ खाणी
उर्जा मंत्रालयास:- ६३ खाणी
पोलाद व सिमेंट उद्योगासाठी:- २ खाणी
५०) दादासाहेब फाळके पुरस्काराने(२०१०) गौरविण्यात आलेले व "एक दुजे के लिए‘ या चित्रपटाचे प्रसिद्ध तमिळ दिग्दर्शक असलेल्या कोणत्या व्यक्तीचे नुकतेच निधन झाले आहे?
== के. बालचंदर
५१) कवितालया प्रॉडक्शीनच्या माध्यमातून अनेक हिट चित्रपटांची निर्मिती करणारे प्रसिद्ध तमिळ दिग्दर्शक कोण?
== के. बालचंदर
५२) 'Why I Assassinated Gandhi' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
== नथुराम गोडसे
५३) 'मी नथुराम गोडसे बोलतोय' नाटकाचे लेखक कोण आहेत?
== प्रदीप दळवी
५४) 'गांधीहत्या आणि मी' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
== गोपाळ गोडसे
५५) 'पंच्चावन्न कोटींचे बळी' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
== गोपाळ गोडसे
५६) 'Why I killed Gandhi' या पुस्तकाचे लेखक कोण आहेत?
== नथुराम गोडसे
५७) विधानसभा अध्यक्ष हरिभाऊ बागडे यांनी महाराष्ट्र विधानसभेच्या विरोधी पक्ष नेतेपदी कोणाच्या नावाची घोषणा केली आहे?
== राधाकृष्ण विखे पाटील(कॉंग्रेस पक्ष)
५८) जगात सर्वांत मोठे सर्च इंजिन म्हणून वापरात असलेल्या गुगलने आपल्या कोणत्या बहुचर्चित स्वयंचित कार चे नुकतेच सादरीकरण केले आहे?
== गुफी
५९) देशातील कोणत्या कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या निवडणुकीत मतदारांना नकाराधिकाराचा (नोटा) अधिकार मिळणार नाही. हे मतदान यंत्राद्वारे होणार असले तरी यात 'नोटा'ची तरतूद नाही?
== अहमदनगर कॅन्टोन्मेंट बोर्डाच्या (भिंगार)
६०) रामजन्मभूमी वादात मुस्लिमांची बाजू मांडणाऱ्या सात प्रमुख याचिकाकर्त्यांपैकी एक असलेल्या कोणत्या याचिकाकर्त्याचे नुकतेच निधन झाले आहे?
== मोहम्मद फारूक(१०० वय वर्षे)
६१) यंदाच्या यश चोप्रा स्मृती राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले महानायक कोण?
== अमिताभ बच्चन
६२) स्पंदन आर्ट संस्थेतर्फे दिला जाणारा महमद रफी जीवन गौरव पुरस्कार यावर्षी कोणास प्रदान करण्यात आला आहे?
== ज्येष्ठ गायिका आशा भोसले आणि ज्येष्ठ गायक सुरेश वाडकर
६३) विमा क्षेत्रात FDI वाढ व कोळसा खाण वितरणासाठी ई-लिलाव पद्धती आणण्याबाबतच्या अध्यादेशावर राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी कधी स्वाक्षरी.केली?
== २६ डिसेंबर २०१४
६४) ऑस्ट्रेलियन क्रिकेटर फिलिप ह्युज याच्या स्मरणार्थ एव्हरेस्टवर ठेवणार बॅट.नेण्याचा उपक्रम कोणत्या देशाची क्रिकेट संघटना राबविणार आहे?
== नेपाळ क्रिकेट संघटना
६५) सोनितपूरमध्ये बोडो अतिरेक्यांविरुद्ध आसाम रायफल्स, निमलष्करी दल आणि लष्करी जवानांची संयुक्त कारवाई सुरू केली असून या कारवाईस काय नाव देण्यात आले आहे?
== मिशन ऑल आऊट
६६) झारखंडचे नवे मुख्यमंत्री.म्हणून कोणत्या बिगरआदिवासी चेहऱ्याला प्रथमच संधी मिळत आहे?
== रघुवर दास- भाजप (जमशेदपूर पूर्व मतदारसंघ)
६७) प्रवाशांसाठी ऑनलाइन रिचार्ज सुविधा सुरु करणारी मेट्रो सेवा कोणत्या शहरात पुरविली जाणार आहे?
== मुंबई
६८) देशात वाहनचोरीमध्ये महाराष्ट्राचा कितवा क्रमांक लागला आहे?
== दुसरा(पहिल्या स्थानावर उत्तर प्रदेश)
६९) सेंटर फॉर डेव्हलपमेंट ऑफ अॅडव्हान्स्ड कॉम्प्युटिंग (सी-डॅक) यांनी दिल्ली येथे माहिती तंत्रज्ञान व संचारण मंत्रालयातर्फे जगातील सर्वात आटोपशीर महासंगणक प्रणालीचे अनावरण केले.त्याचे नाव काय आहे?
== परम शावक
७०) महाराष्ट्र वीज मंडळाने आपल्या तीनही कंपन्यांमधील तमाम वीज कर्मचाऱ्यांना तीन लाख रुपयांचे विमा सुरक्षा कवच प्रदान करण्यासाठी कोणत्या कंपनीसोबत करार केला आहे?
== ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी
७१) इंडोनेशियातून सिंगापूरला जाणारे 'एअर एशिया'चे विमान उड्डाणानंतर बेपत्ता झाले आहे.या विमानाचा फ्लाईट नंबर काय होता?
== क्यूझेड ८५०१ (एअरबस ३२०-२००' प्रकारातील)
७२) 'एअर एशिया'च्या क्यूझेड ८५०१ फ्लाईट नंबर असलेल्या विमानाने इंडोनेशियाच्या सुरबाया येथून सिंगापूरसाठी स्थानिक वेळेनुसार पहाटे ५.२० वाजता उड्डाण केले होते हे विमान सकाळी ८.३० वाजता सिंगापूरच्या कोणत्या विमानतळावर उतरणार होते?
== चंगी
७३) एअर एशियाचे क्यूझेड ८५०१ हे विमान सुमात्रा बेटाच्या पूर्व किनाऱ्यावरील कोणत्या परिसरात बेपत्ता झाल्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे?
== पूर्व बेलितुंग
७४) दक्षिण आशियात लोकप्रिय असलेली कोणती हवाई सेवा भारतात हवाई सेवा देणारी पहिली विदेशी कंपनी आहे?
== एअर एशिया
७५) भारतात टाटा सन्स आणि उद्योगपती लक्ष्मी मित्तल यांचे व्याही अरुण भाटिया यांच्याशी भागिदारी करून एअर एशियाने सेवा सुरू केली केली. १२ जून २०१४ रोजी एअर एशियाचे भारतातील पहिले उड्डाण बेंगळुरूहून कोठे झाले होते?
== गोवा
७६) अफगाणिस्तानातील अमेरिकेच्या तब्बल १३ वर्षांच्या हस्तक्षेपाला/युध्दाला अधिकृतपणे पूर्णविराम दिला आहे?
== २८ डिसेंबर २०१४ (अफगाणिस्तानचे अध्यक्ष अश्रफ घनी)
७७) सोनी पिक्चरच्या कोणत्या चित्रपटात उत्तर कोरियाचे अध्यक्ष किम जोंग उन याच्या हत्येच्या कटाचे कथानक दाखविले असल्याने कोरियाने या चित्रपटाला विरोध केला होता?
== द इंटरव्ह्यू
७८) पेशावरमधील शाळेवर झालेल्या दहशतवादी हल्ल्याचा सूत्रधार आणि वरिष्ठ तालिबानी कमांडर असलेल्या कोणत्या दशहतवाद्यास पाकिस्तानी सुरक्षा दलाच्या जवानांनी खैबर एजन्सीमध्ये ठार केले आहे?
== सद्दाम
७९) सद्दाम हा तेहरीकी तालिबान पाकिस्तानच्या (टीटीपी) कोणत्या ग्रुपचा सदस्य होता?
== तारिक गदर ग्रुप
८०) 'असोचेम-पीडब्ल्यूसी'च्या अहवालानुसार सध्या देशातील प्रति व्यक्ती ऑनलाइन शॉपिंगची मर्यादा वार्षिक सरासरी किती हजार रुपये आहे?
== सहा हजार रुपये
८१) मराठी माणसाच्या व्यवस्थापन कौशल्याला सातासमुद्रापार पोहोचविणाऱ्या मुंबईतील डबेवाल्यांचे नेते असलेल्या कोणत्या व्यक्तीचे नुकतेच निधन झाले आहे?
== गंगाराम तळेकर
८२) अमेरिकेत फिलाडेल्फिया येथे झालेल्या बृहन्महाराष्ट्र मंडळाच्या अधिवेशनात डबेवाल्यांचे प्रतिनिधी म्हणून रघुनाथ मेदगे यांच्यासह कोण उपस्थित होते?
== गंगाराम तळेकर
८३) दिल्ली आयआयटीचे संचालक असलेल्या कोणत्या व्यक्तीने कार्यकाळ संपण्यापूर्वीच राजीनामा दिला आहे?
== रघुनाथ शेवगावकर
८४) सरकारी कर्मचारी अधियम, २०१४ नुसार सरकारी कर्मचाऱ्याला त्याची पत्नी; तसेच त्याच्यावर अवलंबून असलेल्या कुटुंबातील सदस्यांची संपत्ती, देणी या बद्दलची माहिती कधीपर्यंत सरकारला द्यावी लागेल?
== ३० एप्रिल २०१५ पर्यंत (लोकपाल कायद्याअंतर्गत)
८५) संसदेने दोन वर्षांपूर्वी मंजूर केलेला भूसंपादन कायदा १ जानेवारी २०१४ला अस्तित्वात आल्यानंतर त्यातील कलम १०५ (३) नुसार कधीपर्यंत १८८५ चा भूसंपादन (खाण) कायदा, १९५६ चा राष्ट्रीय महामार्ग कायदा, १९६२ चा अणुऊर्जा कायदा, १९७८ चा मेट्रो रेल्वे कायदा, १९८९ चा रेल्वे कायदा यासारख्या केंद्र सरकारशी संबंधित असलेल्या तब्बल १३ कायद्यांमध्ये दुरुस्त्या करायच्या आहेत.
== १ जानेवारी २०१५ पूर्वी
८६) सन टीव्हीचे चीफ ऑपरेटिंग ऑफिसर (सीओओ) असलेल्या कोणत्या व्यक्तीस लैंगिक छळाच्या आरोपावरून चेन्नई पोलिसांच्या सेंट्रल क्राइम ब्रांचच्या अधिकाऱ्यांनी अटक केली आहे?
== सी. प्रवीण
८७) सहा हजार कोटी रुपयांचा अंमली पदार्थांच्या घोटाळ्यातील सहभागाप्रकरणी पंजाबचे महसूलमंत्री असलेल्या कोणत्या नेत्याची अंमलबजावणी संचालनालयातर्फे (ईडी) चौकशी करण्यात आली?
== विक्रमसिंग मजिठिया
८८) मुंबई- काठमांडूला जाणार्या जेट एअरवेजच्या कोणत्या विमानाला एका पक्ष्याची धडक बसल्याने लागलेल्या आगीनंतर आपत्कालीन परिस्थितीत तातडीने त्रिभुवन आंतरराष्ट्रीय विमानतळावर उतरवावे लागले?
== ९ डब्ल्यू २६८ हे बोइंग ७३७
८९) फेसबुकने सरत्या वर्षाच्या आठवणींना उजाळा देण्यासाठी कोणती भेट दिली होती. मात्र, फेसबुकने दिलेल्या या भेटीमुळे अनेकांना मनस्ताप झाल्याचे लक्षात आल्यानंतर फेसबुकने आपल्या युझर्सची माफी मागितली आहे?
== इयर इन रिव्ह्यू
९०) रशियातील सेंट पिट्सबर्ग येथील 'रिसर्च इन्स्टिट्यूट ऑफ एन्फ्लुएन्झा'मधील शास्त्रज्ञांच्या गटाने कोणत्या रोगाविरूध्द रोगप्रतिकारक लस तयार केली आहे?
== इबोला
९१) भूसंपादन अधिक सुलभ करण्यासाठी सरकारने २९ डिसेंबर २०१४ रोजी अध्यादेश काढला यानुसार सध्या लागू असलेल्या कायद्यातील काही तरतुदी शिथिल करण्याची व कोणते नवे कलम समाविष्ट करण्याची तरतूद या वटहुकुमात असेल?
== '१०ए’ हे पुनर्वसन आणि भरपाईसंबंधीचे नवे कलम
९२) महाराष्ट्रातील कोणती नगरपरिषद शतकोत्तर सुवर्ण महोत्सव साजरा करत आहे?
== अलिबाग
९३) ‘छोटे जलाराम बाप्पा’ म्हणून भक्तांचे प्रेरणास्थान असलेल्या आणि गुजराती समाजाचे श्रद्धास्थान व मानवसेवेचे आदर्श असलेल्या कोणत्या संतांचे नुकतेच निधन झाले आहे?
== संत हरिराम बाप्पा
९४) शासनाने महाराष्ट्राच्या समतोल प्रादेशिक विकासाच्या प्रश्नांवरील अभ्यासासाठी कोणाच्या अध्यक्षतेखाली उच्चस्तरीय समिती नेमली होती. या समितीमध्ये नऊ सदस्य असून नियोजन विभागाचे अपर मुख्य सचिव के.बी. बक्षी समितीचे सदस्य सचिव आहेत?
== डॉ.विजय केळकर
९५) ‘चतुरंग प्रतिष्ठान ही संस्था साहित्य चळवळीत तब्बल ४०हून अधिक वर्षे सातत्याने कार्यरत आहे. त्याच्या २४व्या ‘रंगसंमेलना’त जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले साहित्यिक कोण?
== ज्येष्ठ नाटककार-दिग्दर्शक रत्नाकर मतकरी
९६) पतीच्या मृत्यूनंतर त्याच्या कौटुंबिक निवृत्तिवेतनात पहिल्या पत्नीसह दुस-या पत्नीलाही समान वाटा दिला गेला पाहिजे, असा महत्त्वपूर्ण निर्णय मुंबई उच्च न्यायालयाच्या कोणत्या खंडपीठाने दिला आहे.तसेच सध्या हा नियम भारतीय रेल्वेतच असून, शासनाच्या इतर विभागांतही त्याचा अवलंब करावा, अशी सूचना न्यायालयाने केली आहे?
== नागपूर खंडपीठाने
९७) रेल्वे कर्मचारी निवृत्तिवेतन योजनेतील कोणत्या नियामामधील उपनियम ७ (आय)(ए) मध्ये पहिल्या व दुसऱ्या पत्नीमध्ये निवृत्तिवेतनाचे समान वाटप करण्याची तरतूद करण्यात आली आहे?
== नियम ७५
९८) हिंदू विवाह कायद्याच्या कोणत्या कलमानुसार पहिली पत्नी जिवंत असेल आणि तिच्यासोबत घटस्फोट झाला नसेल तर दुसऱ्या महिलेसोबत केलेला विवाह अवैध ठरतो?
== कलम ११
९९) जालना येथील रहिवासी प्रिया हरिभाऊ सुरडकर हिने तब्बल किती तास मेहंदी रेखाटन करीत विक्रमाला गवसणी घातली़ असून विश्वविक्रम (गिनिज बुक आॅफ वर्ल्ड रेकॉर्ड ) प्रस्थापित केला जाणार आहे?
== ७४ तास
१००) नक्षलींचा वाढता प्रभाव लक्षात घेऊन २००४ साली गडचिरोली जिल्ह्यासह गोंदिया, चंद्रपूर, भंडारा, नांदेड आणि यवतमाळ या जिल्ह्यांतील एकूण ३७ तालुके नक्षलग्रस्त म्हणून घोषित करण्यात आले होते परंतु आता गृहविभागाकडून २६ डिसेंबर २०१४ रोजी किती तालुके नक्षलमुक्त घोषित करण्यात आले आहे?
== २२ तालुके

Monday, December 29, 2014

*केंद्र व राज्य सरकारने नियुक्तकेलेल्या समित्या आणि आयोग:-

* केंद्र- राज्य संबंध आयोग- भारत सरकारने २७ एप्रिल २००७ ला केंद्र राज्य संबंध आयोग स्थापन केला, आयोगाचे अध्यक्ष होते मदनमोहन पंछी
* वर्मा समिती- राजीव गांधी हत्येची चौकशी
* न्या. भगवती समिती – भारतातील बेरोजगारीचा अभ्यास करून उपाययोजना सुचविण्यासाठी
* जानकी रामन समिती (१९९२)- रोखे गैरव्यवहारप्रकरणी रिझव्‍‌र्ह बँकने नेमलेली समिती
* न्या. सरकारिया आयोग- केंद्र राज्यसंदर्भात नेमलेला आयोग
* जे. एम. लिंगडोह समिती- कॉलेजमधील निडवणुकांची आचारसंहिता ठरवण्यासाठी
* डॉ. भालचंद्र मुणगेकर समिती- सेट व नेट परीक्षांची अनिवार्यता तपासण्यासाठी
* डॉ. यू. म. पठाण समिती (२००९) राज्यातील शालेय अभ्यासक्रमामध्ये संत साहित्याचा समावेश करण्याकरिता.
* आर. के. राघवन् समिती- उच्चशिक्षण संस्थांतील रॅगिंगला प्रतिबंध करण्यासाठी केंद्र शासनाने नेमलेली समिती
* मुखोपाध्याय समिती – महाराष्ट्रात दुचाकी वाहन चालकांना हेल्मेट सक्तीबाबत
* सुबोध जयस्वाल समिती – बनावट मुद्रांक घोटाळा चौकशीप्रकरणी नेमलेली समिती
* सोली सोराबजी अभ्यास गट – भारताच्या पोलीस यंत्रणेत सुधारणा करण्यासाठी
* पी. एन. टंडन समिती- देशभरातील अभिमत विद्यापीठांची तपासणी करण्यासाठी
* डॉ. राजेंद्र पचौरी समिती – सेतुसमुद्रम प्रकल्पाचा तिढा सोडविण्यासाठी केंद्र सरकारने नेमलेली समिती
* यशपाल समिती – अभिमत विद्यापीठांचा दर्जा रद्द करण्यासाठी शिफारस केलेली समिती
* बी. के. चतुर्वेदी समिती (२००८) – भारतातील खनिज तेल कंपन्यांची वित्तीय स्थिती तपासण्यासाठी
* न्या. बी. एन. श्रीकृष्ण – तेलंगणा वेगळे राज्य निर्माण करण्यासाठी नेमण्यात आलेल्या समितीचे अध्यक्ष.
* मंजुळा कृष्णन समिती – उत्तर प्रदेशातील निठारी बाल हत्याकांडप्रकरणी चौकशी करण्यासाठी
परीक्षाभिमुख विविध मोहिमा-ऑपरेशन्स
* ऑपरेशन ब्लॅक टॉर्नेडो : २६/११ च्या मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या वेळी नरीमन हाऊस वरील दहशतवाद्यांच्या विरुद्ध लष्कराने राबविलेली मोहीम.
* ऑपरेशन सायक्लॉन- मुंबई दहशतवादी हल्ल्याच्या वेळी हॉटेल ताजवरील दहशत वाद्यांच्या विरुद्ध लष्कराने राबविलेली मोहीम.
* ऑपरेशन सायलेन्स – पाकिस्तानी लष्कराने इस्लामाबाद येथील लाल मशिदीत लपलेल्या अतिरेक्यांना मारण्यासाठी राबविलेली मोहीम.
* ऑपरेशन ऑल क्लियर – आसाममधील उल्फा दहशतवादाचा बीमोड करण्यासाठी भारतीय लष्कराने चालविलेली मोहीम.
* ऑपरेशन ग्रीनहंट- महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छतीसगढ व झारखंड या राज्यांतील जंगलव्याप्त प्रदेशात असणाऱ्या नक्षलवादी कारवायांचा बीमोड करण्यासाठी राबविलेली मोहीम
* ऑपरेशन सुकुन- लेबनॉनमधील भारतीय नागरिकांना परत बोलविण्यासाठी केंद्र सरकारने सुरू केलेली आपत्कालीन मोहीम.
* ऑपरेशन ककून – विरप्पनला पकडण्यासाठी राबविलेली मोहीम
* ऑपरेशन रेड डॉन- सद्दाम हुसेनला पकडण्यासाठी अमेरिकेने राबविलेली मोहीम
* ऑपरेशन गरुड – नक्षलवाद्यांविरुद्ध छतीसगडमध्ये राबविलेली मोहीम
* ऑपरेशन बजरंग- उल्फा अतिरेक्यांविरुद्ध आसाममध्ये राबविलेली मोहीम
* ऑपरेशन कोब्रा गोल्ड- थायलंडमध्ये अतिरेक्यांविरुद्ध राबविलेली मोहीम.
* ऑपरेशन सहायता – नर्गिस या वादळाचा तडाखा
बसलेल्या म्यानमारला भारतीय लष्करातर्फे पाठविलेल्या मदत कार्यक्रमाचे नाव
* ऑपरेशन डेनिम (२००४)- श्रीलंकेत आलेल्या पुरामध्ये तेथील लोकांचे पुनर्वसन करण्यासाठी भारतीय लष्कराने राबविलेली मोहीम.
* ऑपरेशन पाशा- भारत व श्रीलंकादरम्यान होणाऱ्या औषधांची व इतर वस्तूंची चोरटी वाहतूक व व्यापार रोखण्यासाठी राबविलेली मोहीम.
* ऑपरेशन पुशबॅक- भारतात बांग्लादेशातून आलेल्या चकमा शरणार्थीविरुद्ध व त्यांना हाकलून लावण्यासाठी भारत सरकारने राबविलेली मोहीम
* ऑपरेशन मुश्तरक- अमेरिकन सैनिकांच्या नेतृत्वाखाली नाटो आणि अफगाणी सेनेने तालिबान विरोधी चालविलेली लष्करी मोहीम.
* ऑपरेशन ब्लॅक गोल्ड- अफूचा बेकायदा व्यवहार करणाऱ्यांना आळा घालण्यासाठी राजस्थान पोलिसांनी राबविलेली मोहीम.
* ऑपरेशन फ्लॅशआऊट- बांग्लादेशी घुसखोरांना मुंबईतून शोधून काढण्यासाठी राबविलेली मोहीम.
केंद्र व राज्य सरकारने नियुक्त केलेल्या समित्या व विविध ऑपरेशन्स :
* डॉ. आ. ह. साळुंखे समिती – महाराष्ट्र राज्याचे नवे सांस्कृतिक धोरणाचा मसुदा तयार करण्यासाठी स्थापन केलेल्या समितीचे अध्यक्ष.
* मधुकर चव्हाण समिती – महाराष्ट्र विधानसभेतील आमदार निलंबनप्रकरणी नेमलेल्या त्रिसदस्यीय समितीचे अध्यक्ष.
* डॉ. एम. एस. स्वामीनाथन समिती – कमी खर्चात अधिक शेती उत्पादन काढता यावे याकरिता पुढील २५ वर्षांकरिता तयार केलेल्या आराखडय़ाचे अध्यक्ष.
* किरीट पारेख समिती – पेट्रोलियम पदार्थाच्या किमती निर्धारण करण्यासाठी.
* प्रमोद आचार्य समिती – आयआयटी प्रवेश परीक्षेत सुधारणा करण्यासाठी केंद्र सरकारच्या मानवी संसाधन मंत्रालयाने नेमलेल्या समितीचे अध्यक्ष.
* तमांग समिती – गुजरातमधील इशरतजहाँ व इतर तिघांची पोलीस चकमकीत झालेल्या हत्येची चौकशी करण्यासाठी.
भूषण गगराणी समिती- महाराष्ट्रातील ग्रामपंचायती व त्यांच्या समस्यांबाबत शिफारसी करण्याकरिता
डॉ. नरेंद्र जाधव समिती- विदर्भातील शेतकऱ्यांच्या सतत नापिकी व कर्जबाजारीपणामुळे होणाऱ्या आत्महत्या रोखण्यासाठी केंद्र व राज्य सरकारने जाहीर केलेल्या विशेष पॅकेजच्या अंमलबजावणीबाबत मूल्यमापन करण्यासाठी
राम प्रधान समिती- २६/११ च्या मुंबईवरील अतिरेकी हल्ल्याच्या संदर्भात शासनाने नेमलेली समिती.
माधवराव चितळे समिती- मुंबईतील पूर परिस्थितीवर अभ्यास करण्यासाठी
न्या. गुंडेवार आयोग- मुंबईतील घाटकोपर येथील रमाबाई आंबेडकर नगरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याची विटंबना झाल्यानंतर गोळीबाराची चौकशी करण्यासाठी
बाळकृष्ण रेणके आयोग- भटक्या विमुक्त जाती-जमातीच्या कल्याणाकरिता
न्या. बापट आयोग (२००८)- मराठा समाजास आरक्षणसंबंधी नेमलेला आयोग (आरक्षण देऊ नये अशी शिफारस)
न्या. सराफ आयोग (२००९) मराठा समाज आरक्षणासंबंधी नेमलेल्या बापट आयोगाच्या अहवालाची फेरतपासणी करण्याकरिता.
न्या. राजन कोचर समिती- सातारा जिल्ह्य़ातील मांढरदेवी येथील झालेल्या चेंगराचेंगरी दुर्घटनेची चौकशी करण्यासाठी
डॉ. अभय बंग समिती- कुपोषणामुळे होणाऱ्या बालमृत्यूच्या चौकशीकरिता
अमरावती पॅटर्न ही मोहीम राज्य शासनाने कुपोषण निर्मूलन- संदर्भात सुरू केली.
विलासराव देशमुख निवडणूक व्यवस्थापन समिती- महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी काँग्रेसच्या व्यवस्थापन समितीचे अध्यक्षपद केंद्रीय अवजड उद्योगमंत्री विलासराव दशमुख यांच्याकडे सोपविण्यात आले.
देशमुख, दांडेकर, देऊस्कर समिती- पाणी वाटप प्रश्नी राज्यात नेमलेली समिती
प्रा. वि. म. दांडेकर समिती- प्रादेशिक असमतोलाचा अभ्यास करून त्यावर उपाय सुचविण्यासाठी
द. म. सुकथनकर समिती (जून १९९६)- मुंबईतील जुन्या मोडकळीस आलेल्या- इमारतींचा प्रश्न सोडविण्यासाठी व उपाय सुचविण्यासाठी
डॉ. विजय केळकर समिती- देशातील साखर उद्योगाचा सर्वागीण आढावा घेऊन ठोस उपाययोजना करण्यासाठी केंद्रीय कृषीमंत्री शरद पवार यांनी नेमलेली समिती
व्ही. रंगनाथन समिती- महाराष्ट्रातील अवर्षणप्रवण क्षेत्रातील सिंचनाचा तालुका निहाय अनुशेष निश्चित करण्यासाठी व निर्मूलन करण्यासाठी राज्य सरकारने नेमलेली समिती
* नंदलाल समिती- नागपूर महानगरपालिकेतील क्रीडा साहित्य घोटाळ्याची चौकशी करण्यासाठी
प्रमोद नवलकर समिती- सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार राज्य सरकारने अल्पवयीन वेश्यांचा अभ्यास करण्यासाठी नेमलेली समिती
प्रा. जनार्दन वाघमारे समिती- नांदेड येथील स्वामी रामानंदतीर्थ विद्यापीठाच्या स्थापनेसाठी नेमलेली समिती
पी. एस. पाटणकर समिती- महाराष्ट्रातील नवीन नांदेड महसूल आयुक्तालयाच्या स्थापनेसंबंधी
वसंत पुरके समिती (२००८)- शालेय अभ्यासक्रमात लैंगिक शिक्षणाचा समावेश करण्याबाबत परीक्षण करण्याकरिता राज्य सरकारने नेमलेली समिती
सुनील तटकरे समिती (२००९)- रायगडावरील किल्ल्यातील मेघडंबरीत छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा बसविण्यासंदर्भात नेमलेली समिती
अशोक बसाक समिती- दूध दरवाढ व खरेदी विक्री धोरण ठरविण्याबाबत
न्या. राजिंदर सच्चर समिती- मुस्लिमांच्या सामाजिक, आर्थिक व शैक्षणिक दर्जाचा अभ्यास करण्यासाठी केंद्र सरकारने नियुक्त केलेली समिती
जगदीश सागर समिती (१९९५)- नवी दिल्लीच्या कॅनॉट प्लेसमध्ये झालेल्या बॉम्बस्फोटाची चौकशी करण्यासाठी
न्या. बी. एन. श्रीकृष्ण आयोग- १९९३ च्या मुंबई बॉम्बस्फोटांची चौकशी करण्यासाठी
के. नलिनाक्षण समिती – ठाणे महानगर पालिकाअंतर्गत धोकादायक इमारतीमागील कारणे शोधण्यासाठी नेमलेली समिती तसेच ठेकेदारांचे भ्रष्टाचाराबद्दल
नंदलाल समिती- ठाणे महानगरपालिकेतील गैरव्यवहारप्रकरणी नेमलेली समिती
न्या. बी. एन. श्रीकृष्ण- सहाव्या वेतन आयोगाचे अध्यक्ष
न्या. कुलदीपसिंग समिती – मतदारसंघाच्या पुनर्रचनेच्या संबंधीचा अभ्यास करण्यासाठी
लिबरहान आयोग बाबरी मशीद विध्वंसप्रकरणी चौकशी करण्यासाठी
न्या. नानावटी आयोग/ न्या. बॅनर्जी समिती- गोध्रा हत्याकांड चौकशी करण्यासाठी
फुकन आयोग (२००४)- संरक्षण क्षेत्रातील लाचखोरी व तहलका चौकशी करण्यासाठी
मणिसाना आयोग- पत्रकारासाठी नेमलेल्या वेतन आयोगानुसार वृत्तपत्रांमध्ये काम करणाऱ्या पत्रकार व गैरपत्रकार कर्मचाऱ्यांना वेतनात ३० टक्के वाढ (अपूर्ण) //

#‎विज्ञान‬ तंत्रज्ञान २०१४

जानेवारी
नेचर या नियतकालिकात प्रसिद्ध झालेल्या संशोधनानुसार पृथ्वीचे तापमान इ.स. २१०० पर्यंत ४ अंश सेल्सियस तर इ.स. २२०० पर्यंत ८ अंश सेल्सियस पर्यंत वाढण्याची शक्यता आहे. मायोटोनिक डिस्ट्रॉफी या आजारास एका रेणूतील दोष कारणीभूत असतो हे स्पष्ट झाल्यानंतर त्यावर संभाव्य औषध शोधून काढण्यात आले. २०१४ एए हा लघुग्रह पृथ्वीच्या अगदी जवळून गेला. रक्तातील कर्करोग पेशींचे मेटास्टेसिस रोखण्याची नवी पद्धत कॉन्रेल विद्यापीठाच्या संशोधकांनी शोधली. नासाने आबेल २७४४ या दीíघकासमूहाचे छायाचित्र टिपले. अंटाíक्टकावर मोठी घळई ग्रँड कॅनन सापडली. जनुकीय उपचार पद्धतीने सहा रुग्णांना अंधत्वापासून वाचवण्यात आले. चीनची युटू रोव्हर गाडी चंद्रावर गेली व तेथील मातीचे परीक्षण केले.
फेब्रुवारी
एका रेणूचा एलईडी तयार करण्यात यश आले. १० लाख वर्षांपूर्वीच्या होमो अँटेसेसर या मानवाच्या पाऊलखुणा इंग्लंडमधील हॅपीसबर्ग येथे सापडल्या. लंडनच्या किंग्ज कॉलेजच्या वैज्ञानिकांनी बुद्धिमत्तेशी संबंधित जनुक शोधून काढले. ४०० समिलगी व्यक्तींच्या अभ्यासातून लंगिक आकर्षण स्त्री-स्त्री, पुरुष-पुरुष असावे की कसे हे जनुकावर अवलंबून असल्याचे दिसून आले. जनुकीय परिवर्तन करून रोग न होणारे बटाटे तयार करण्यात ब्रिटिश वैज्ञानिकांना यश आले. सल्फेटमुळे पृथ्वीचे तापमान वाढत असल्याचे एका संशोधनात स्पष्ट झाले. तीन हजार रुग्णांवर ११ युरोपीय देशात हृदयविकारावर मूलपेशींचा प्रयोग सुरू करण्यात आला.
मार्च
डीएक्स १० हा लघुग्रह पृथ्वीच्या जवळून गेला. युनेस्कोच्या जागतिक वारसा स्थळांना सागरी जलपातळी वाढण्याने धोका असल्याचे सांगण्यात आले. स्टॅनफर्डच्या जैवअभियंत्याने २००० पट मोठी प्रतिमा दाखवणारा कागदाचा सूक्ष्मदर्शक तयार केला. पातळ सौरघटाची क्षमता १७ टक्क्यांपर्यंत मिळवता आली. जैवविघटनशील बॅटरी वैज्ञानिकांनी तयार केली ती शरीरात वापरता येईल. यीस्टचे कृत्रिम गुणसूत्र तयार करण्यात यश आले. बाकदार तोंडाचा व्हेल मासा समुद्रात ३.२ किमी खोल सूर मारतो व तेथे १३७ मिनिटे राहतो. हा सस्तन प्राण्यांमधील विक्रम आहे, असे सांगण्यात आले. सीआरआयएसपीआर या जनुक संपादन तंत्राने रोग बरे करता येऊ शकतात त्याच्या मदतीने यकृताचा रोग बरा करण्यात यश आले.
एप्रिल
फळे व भाज्या जास्त प्रमाणात म्हणजे ५६० ग्रॅम सेवन केल्यास मृत्यूची शक्यता ४२ टक्क्यांनी कमी होते, असे युनिव्हर्सटिी कॉलेज लंडनच्या संशोधनात सांगण्यात आले. नासाने दिलेल्या माहितीनुसार शनीच्या एनसेलॅड्स या चंद्रावर सूक्ष्म स्वरूपात जीवसृष्टी असण्याची शक्यता आहे. तीस सेकंदात चाìजग होणारी बॅटरी तेल अवीव येथे एका प्रदर्शनात सादर करण्यात आली. सस्तन प्राण्यात गर्भधारणेसाठी जुनो नावाचे प्रथिन आवश्यक असते, असे नेचर या नियतकालिकाने प्रसिद्ध केलेल्या संशोधनात म्हटले आहे. आफ्रिकेतील स्लीिपग सीकनेसचे कारण असलेल्या त्सेत्से माशीचा जनुकीय आराखडा पूर्ण करण्यात आला. स्टॅनफर्डच्या अभियंत्यांनी आताच्या नऊ हजार पट वेगाने काम करणारी चिप तयार केली ती मानवी मेंदूवर आधारित आहे. प्रतिजैविकांना जीवाणू दाद देत नसल्याने प्रतिजैविकांचा म्हणजे अँटिबायोटिक्सचा अतिवापर धोकादायक असल्याचे जागतिक आरोग्य संघटनेने सांगितले.
मे
सध्या अमेरिकेत ई सिगारेटचे प्रमाण वाढले आहे पण त्यामुळेही कर्करोग होतो असे संशोधनात दिसून आले. १३ अब्ज वर्षांपूर्वीच्या विश्वाचे आभासी चित्र तयार करण्यात यश आले. आयसॉन धूमकेतूचे तुकडे झाले. अधिक प्रगत असलेला जैवयांत्रिक बाहू तयार करण्यात यश आले. कर्करोगग्रस्त मूलपेशींपर्यंत कर्करोगाचा माग काढण्यात आला. सर्वात मोठा डायनॉसॉर हा अर्जेटिनात सापडलेल्या जीवाश्मावरून ७७ टन वजनाचा होता व तो टिटॅनोसॉर प्रजातीचा होता. स्वादुिपडाच्या कर्करोगातील एका विशिष्ट जनुकाचे उत्परिवर्तन शोधण्यात आले.
जून
ट्रीडमीलवर ताशी ४६ किलोमीटर वेगाने पळणारा यंत्रमानव कोरियाने तयार केला. चंद्र आणि पृथ्वी आपण समजतो त्यापेक्षा ६ कोटी वष्रे जुने असल्याचे पुराव्यात दिसून आले. सामन माशाचा जनुकीय आराखडा पूर्ण झाला. सिलिकॉनची जागा घेऊ शकणाऱ्या कार्बन नॅनोटय़ूब्ज तयार करण्यात आल्या त्या इलेक्ट्रॉनिक सíकटमध्ये वापरता येतील. क्युरिऑसिटी रोव्हरने मंगळावरील वर्ष पूर्ण केले.
जुलै
नासाने कार्बन डायॉक्साईडचा अभ्यास करण्यासाठी ऑरबायटिंग कार्बन ऑब्झर्वेटरी हे अवकाशयान सोडले. स्वमग्नता हा रोग जनुकीय उत्परिवर्तनामुळे होत असल्याचे स्पष्ट झाले. फुले जास्त काळ टवटवीत ठेवण्याचे तंत्रज्ञान जपानी वैज्ञानिकांनी शोधून काढले. व्हायेजर १ यानाला अवकाशात सूर्याकडून फेकल्या जाणाऱ्या सुनामी लाटांचा परिणाम जाणवला त्यामुळे हे यान आंतरतारकीय अवकाशात अजूनही असल्याचे स्पष्ट झाले. सेंद्रिय फळे व भाज्यांमध्ये नेहमीच्या भाज्या व फळांपेक्षा अँटिऑक्सिडंट ७० टक्के जास्त असल्याचे व विषारी धातू कमी असल्याचे दिसून आले. एड्सचा एचआयव्ही विषाणू मानवी पेशीतून नष्ट करता येतो हे पुराव्यानिशी दाखवण्यात आले. १८८० पासून मे व जून २०१४ हे सर्वात उष्ण महिने होते असे दिसून आले. केप्लर ४२१ बी या नवीन बाह्य ग्रहाचा शोध लागला. उंदरांच्या त्वचेतील न्यूरॉन्सचे रिप्रोग्रॅिमग करून ते जास्त स्थिर असल्याचे दिसले. त्यामुळे दोषयुक्त न्यूरॉन्सच्या जागी चांगले न्यूरॉन्स प्रस्थापित करून पाíकन्सनवर उपचार करता येण्याची शक्यता दिसून आली.
ऑगस्ट
हेपॅटिटिस सी हा २०३६ पर्यंत दुर्मीळ आजार ठरेल असे संगणकीय प्रारूपाच्या आधारे सांगण्यात आले. आयबीएम रीसर्चने मेंदूसारखी संगणक चिप तयार केली. त्यात १० लाख प्रोग्रॅमेबल न्यूरॉन्स व २५.६० कोटी सíकट्स म्हणजे सिनॅप्सेसचा वापर करण्यात आला. रशियन अवकाशवीरांना अंतराळस्थानकाबाहेर सागरातील प्लँक्टन वनस्पती सापडली ती तिथे कशी आली हे मात्र समजू शकले नाही. रानटी स्वरूपातील माणसाचा पूर्वज युरोपात आपण समजतो त्यापेक्षा १० पट जास्त म्हणजे पाच हजार वष्रे अस्तित्वात होता असे दिसून आले. थायमसची प्रथमच प्राण्यांच्या शरीरात ठरवून दिलेल्या पद्धतीने वाढ करण्यात आली. व्यायाम करणाऱ्या लोकात वाइनमुळे हृदयविकाराचे प्रमाण कमी होते असे दिसून आले.
सप्टेंबर
कार्यालयात छोटय़ा वनस्पती लावल्यास कर्मचाऱ्यांची कार्यक्षमता १५ टक्के वाढते, असे क्वीन्सलँड विद्यापीठाच्या संशोधनात दिसून आले. वनस्पती व प्राण्यांच्या प्रजाती नष्ट होण्याचा वेग मानवपूर्व काळापेक्षा १००० पटींनी अधिक असल्याचे दिसून आले. पाच हजार मलांवर असलेल्या लोकांमध्ये मेंदू-मेंदू संपर्क प्रस्थापित करण्यात यश आले. ब्राझीलमध्ये २०१३ मध्ये २९ टक्के वाढले म्हणजे ५८९१ वर्गकिलोमीटर जंगलतोड झाल्याचे दिसून आले. कॅनडात २००० ते २११३ दरम्यान ब्राझीलपेक्षा जास्त म्हणजे १०.४ कोटी हेक्टर क्षेत्रात जंगलतोड झाल्याचे दिसून आले. पृथ्वीवर ऑक्सिजन निर्मिती करणारे सजीव आपण समजतो त्याच्या ६० कोटी वष्रे आधीपासून अस्तित्वात होते. कॉफी या वनस्पतीची २५ हजार जनुके शोधण्यात आली. सॅनडिस्क कंपनीने ५१२ जीबीचे एसडी कार्ड तयार केले. अधिक वेगाने पाण्यापासून हायड्रोजन तयार करण्यात आला. १०० अब्ज प्राण्यांना जनुकसंस्कारित अन्न व साधे अन्न देण्यात आले. जनुकसंस्कारित अन्नामुळे त्यांच्या प्रकृतीवर काहीही परिणाम दिसला नाही. नराश्यासाठी रक्तचाचणी विकसित करण्यात आली. कर्करोगास कारण ठरणाऱ्या मेटॅस्टॅसिस या प्रक्रियेला रोखणारे प्रथिन स्टॅनफर्डच्या संशोधकांनी तयार केले. अमेरिकेचे मावेन यान मंगळावर पोहोचले. त्यानंतर भारताचे मंगळयानही तेथे पोहोचले. मायक्रोसॉफ्टने िवडोज १० ही प्रगत ऑपरेटिंग सिस्टीम तयार केली. इबोलाचा रुग्ण अमेरिकेत सापडला.
ऑक्टोबर
गर्भाशय प्रत्यारोपित केलेल्या मातेने प्रथमच बाळाला जन्म दिला. एडवर्ड मोसेर, मे ब्रिट मोसेर व जॉन ओकिफ यांना मेंदूतील जीपीएस प्रणालीच्या संशोधनासाठी वैद्यकशास्त्राचे नोबेल जाहीर झाले. भौतिकशास्त्राचे नोबेल इसामु अकासाकी, हिरोशी अमानो व
शुज नाकामुरा यांना एलईडी लाइटच्या संशोधनासाठी जाहीर झाले, तर रसायनशास्त्रात फ्लुरोसन्स मायक्रोस्कोपीसाठी एरिक बेटझिग, विल्यम मोरनर व स्टेफन हेल यांना नोबेल मिळाले, त्यांनी नॅनो सूक्ष्मदर्शक तयार केला आहे. गर्भाच्या मूलपेशींचे रूपांतर इन्शुलिन निर्मिती करणाऱ्या पेशींमध्ये करण्यात हार्वर्डच्या वैज्ञानिकांना यश आले. कॉफीचे रोज सेवन केल्यास यकृतात घातक वितंचकांचे प्रमाण २५ टक्के कमी होते. नाकातील पेशी मेरुरज्जूत टाकल्याने पक्षाघात झालेला रुग्ण चालू लागला. २५ मिलिलिटर रक्तातील मूलपेशींपासून नवीन रक्तवाहिन्या तयार करण्यात यश आले. डीएनएवर आधारित विद्युत मंडले तयार करण्यात आली. मूलपेशींपासून मानवी पोट आतडे तयार करण्यात आले त्यामुळे अल्सर व इतर आजारांवर उपचार कालांतराने शक्य होईल.
नोव्हेंबर
वैज्ञानिकांनी प्रतिजैविकांशिवाय उपचार करू शकतील असे नॅनोकण मेदापासून तयार केले. उंदरांमध्ये नवीन न्यूरॉन्स मूलपेशीपासून तयार करून त्यांचा पाíकन्सन बरा करण्यात यश आले. रोसेटायानावरील फिली प्रोब ६७ पी चुरयुमोव- गेरासिमेन्को धूमकेतूवर उतरले. जागतिक तापमानावाढीने इ.स. २१०० पर्यंत विजा पडण्याचे प्रमाण ५० टक्क्यांनी वाढणार आहे असे बर्कलेच्या युनिव्हर्सिटि ऑफ कॅलिफोर्नियाने म्हटले आहे. छायाचित्रे ओळखणारे कृत्रिम बुद्धिमत्तेवर आधारित सॉफ्टवेअर गुगल व स्टॅनफर्ड विद्यापीठ यांनी तयार केले.
डिसेंबर
साडेतीन ते साडेचार कोटी वर्षांपूर्वीच्या मांसभक्षी वनस्पतीचे जीवाश्म सापडले ती रोरिडय़ुला प्रजातीची होती. आपल्या विश्वाचे वय १३.८ अब्ज वष्रे असून त्यात ४.९ टक्के अणुद्रव्य व २६.६ टक्के कृष्णद्रव्य, तर ६८.५ टक्के कृष्ण ऊर्जा असल्याचे इटलीतील एका खगोल परिषदेत सांगण्यात आले. इलेक्ट्रॉनिक सíकटसाठी त्रिमिती प्रिंटिंगचा वापर करण्यात आला. जगात प्रथमच कृत्रिम वितंचके तयार करण्यात आली. सौरघटाची कार्यक्षमता ४६ टक्क्यांपर्यंत मिळवण्यात फ्रेंच-जर्मन कंपन्यांना यश. पाच हजार स्त्रियांचा दहा वष्रे अभ्यास केला असता भूमध्यसागरी भागातील आहाराने आयुर्मान वाढते यावर शिक्कामोर्तब झाले. इतर ग्रहांवर बुद्धिमान सजीव असल्याबाबतचे ड्रेक समीकरण केप्लर दुर्बिणीच्या माहितीआधारे बदलले असा ग्रह १०-१०० प्रकाशवष्रे दूर असून बुद्धिमान सजीव असलेला ग्रह काही हजार प्रकाशवष्रे दूर असल्याचे सांगण्यात आले. स्पेस शटलची जागा घेणाऱ्या ओरायन अवकाशवाहनांची चाचणी यशस्वी झाली. मंगळावर कार्बनी रेणू सापडला. भारताच्या जीएसएलव्ही मार्क २ प्रक्षेपकाचे उड्डाण यशस्वी अवकाशकुपी अंतराळात. मानवाला अंतराळात पाठवण्यासाठी भारताचे पहिले पाऊल यशस्वी. प्रयोगशाळेत कृत्रिम रसायन तयार करण्यात यश. केवळ चार रसायन वापरून नवीन रसायनांची निर्मिती. रासायनिक उत्क्रांतीची कल्पना यशस्वी झाली.
(सोर्स:- दैनिक लोकसत्ता)

Sunday, December 28, 2014

(Constitution of independent India) स्वतंत्र भारताची राज्यघटना


लोकनियुक्त घटना समितीची कल्पना सर्व प्रथम मानवेंद्रनाथ रॉय यांनी १९२७ मध्ये सायमन कमिशन पुढे मांडली भारतमंत्री र्बकन हेड यांच्या आवाहनानुसार भारतीय नेत्यांनी नेहरू रिर्पोट च्या स्वरुपात १९२८ मध्ये घटनेबाबतच्या शिफारशी देण्यात आल्या होत्या. गोलमेज परिषदेतही घटना निर्मितीबाबत कॉंग्रेसने आग्रह धरला. ३० मार्च १९४२ रोजी क्रिप्स योजना जाहीर झाली. त्यानुसार महायुध्द समाप्तीनंतर भारतासाठी एक घटना परिषद नेमण्याचे आश्र्वासन देण्यात आले व १९४६ च्या कॅबिनेट मिशन त्रिमंत्री योजनेनुसार घटना समितीच्या निर्मितीची तरतूद करण्यात आली.
त्रिमंत्री योजनेनुसार १० लाख लोकांमागे एक अशा प्रमाणात प्रतिनिधींची निवड करण्यात येऊन घटना परिषदेची निर्मिती झाली. या परिषदेमध्ये सर्वसामान्य २१० मुस्लीम ७८ शीख ४ इतर ४ अशा २९६ प्रतिनिधींची निवड करण्यात आली. घटना समितीचे हंगामी अध्यक्ष म्हणून डॉ. सच्चिदानंद सिन्हा निवडले गेले. त्यांच्या अध्याक्षतेखाली अध्यक्षपदी डॉ. राजेंद्रप्रसाद यांची निवड झाली घटना समितीचे उपाध्यक्ष म्हणुन डॉ. एच. सी. मुखर्जी यांची तर समितीचे सल्लागार म्हणून डॉ. बी. एन. राव यांची निवड झाली. याचबरोबर सा समितीमध्ये प्रमुख सदस्य म्हणुन पंडित नेहरू, सरदार पटेल, डॉ. आंबेडकर, डॉ. राधाकृष्णन, के.एम. मुन्शी डॉ. जयकर इत्यादींचा सहभाग होता.
घटना परिषदेमार्फत २९ ऑगस्ट १९४७ रोजी मसूदा समितीची निवड झाली. डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची मसूदा समितीच्या अध्यक्षपदी निवड झाली. त्याचबरोबर बी. एन. राव, एस, एन. मुखर्जी, इ. मसुदा समितीचे सदस्य म्हणून काम पाहिले घटनेच्या मसुद्यामध्ये ३१५ कलमे व ७ परिशिष्टे आहेत. घटना समितीने भारताच्या राष्ट्रध्वजाची निर्मिती केली. तर गुरुदेव रविंद्रनाथ टागोरांच्या भारत भाग्य विधाता, या गीताला राष्ट्रगीताचा मान देण्यात आला. २६ नोव्हेंबर १९४९ रोजी नवीन राज्यघटनेला मंजूरी देण्यात आली. राज्यघटना निर्मितीत डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचे योगदान अत्यंत महत्वपूर्ण आहे.
म्हणून त्यांना भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार असे म्हणतात. २६ जानेवारी १९५० पासून नवीन राज्यघटनेनुसार देशाचा कारभार सुरु झाला. म्हणून हा दिवस सर्व देशभर साजरा केला जातो. भारताचे संविधान हा राज्यघटनेचा अत्यंत महत्वपूर्ण भाग आहे. घटनेची ध्येये आणि उद्दिष्टे यात प्रतिबिंब्ंिात झाली आहेत. भारताचे संविधान खालीलप्रमाणे.
भारताचे संविधान

आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडविण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक, व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्र्वास, श्रध्दा व उपासना यांचे स्वातंत्र्य दर्जाची व संधीची समानता:
निश्चितपणे प्राप्त करुन देण्याचा आणि त्या सर्वामध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्र्वासन देणारी बंधूता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करुन,
आमच्या संविधान सभेस आज दिनांक २६ नोव्हेंबर १९४९ रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करुन स्वत:प्रत अर्पण करत आहोत.
भारतीय राज्यघटनेची वैशिष्टे :-

(१) लिखित घटना
भारताची राज्यघटना लिखित स्वरुपाची आहे. इंग्लंडच्या घटनेप्रमाणे ती अलिखित नाही. राज्यकारभाराबाबतचे नियम, कोणाचे काय अधिकार व कर्तव्य याबाबतची माहिती राज्यघटनेत देण्यात आयली आहे. घटना लिखित असली तरी काही अलिखित परंपरा पाळल्या जातात. उदा. एकच व्यक्ती तीन वेळा भारताचा राष्ट्रपती होऊ शकत नाही.
(२) जगातील सर्वात मोठी विस्तृत राज्यघटना
भारतीय राज्यघटना व्यापक व विस्तारित स्वरुपाची आहे. घटनेमध्ये ३९५ कलमे, ९ परिशिष्टे आहेत, केंद्र व प्रांत यांचे स्वरूप व अधिकार, न्यायव्यवस्थेचे अधिकार, निवडणूक आयोगाचे अधिकार, याची तपशीलवार माहिती देण्यात आली आहे. यामुळे भारतीय राज्यघटना जगातील इतर देशांच्या तुलनेत विस्तृत स्वरूपाची आहे.
(३) लोकांचे सार्वभौमत्व
घटनेनुसार जनता सार्वभैाम आहे. जनतेच्या हाती खरी सज्ञ्ल्त्;ाा आहे. कारण जनता आपल्या प्रतिनिधीमार्फ़त राज्यकारभार चालविते राष्ट्रप्रमुखाची (राष्ट्रपती) निवड जनता आपल्या प्रतिनिधीकरवी करते. निवडणुकीच्या माध्यमातुन जनता आपणास आवश्यक असा बदल घडवून आणू शकते. २६ जानेवारी १९५० पासून घटनेनुसार देशाचा राज्यकारभार सुरु झाला म्हणून २६ जानेवारी हा दिवस प्रजासत्ताक दिन राष्ट्रीय सण म्हणुन साजरा केला जातो.
(४) संसदीय लोकशाही
स्वातंत्र्यपूर्व काळात भारतीयांनी लोकशाही शासनपध्दतीची मागणी केली होती. घटनाकारांनी इंग्लंडचा आदर्श समोर ठेवून संसदीय लोकशाहीचा स्वीकार केला. लोसभा व राज्यसभेची निर्मिती करण्यात आली. लोकसभेतील सदस्य पक्ष आपले मंत्रिमंडळ (कार्यकारीमंडळ) बनवतो. कार्यकारी मंडळ हे कायदेमंडळाला जबाबदार आहे. लोकसभा, राज्यसभा व राष्ट्रपती, मिळून भारतीय संसद निर्माण झाल्याचे दिसून येते.
(५) संघराज्यात्मक स्वरूप
भारतीय घटनेने संघराज्यात्मक शासनपध्दतीचा स्वीकार केला आहे. केंद्र सरकार व राज्य सरकार यांच्यात सत्तेचे विभाजन करण्यात आले. आहे. कायदे मंडळ, कार्यकारी मंडळ व न्यायमंडळ यांना आपआपले अधिकार देण्यात आले आहेत. मात्र आणीबाणीच्या वेळी भारतीय संघराज्याचे स्वरूप एकात्म झाल्याचे दिसून येते.
(६) घटना अंशत परिवर्तनीय व अंशत परिदृढ
लिखित व अलिखित याप्रमाणेच परिवर्तनीय व परिदृढ असे घटनेचे प्रकार आहेत. इंग्लंडची राज्यघटना अतिशय लवचीक तर अमेरिकेची राज्यघटना अतिशय ताठर स्वरूपाची आहे. भारतीय राज्यघटना इंग्लंइतकी लवचीक नाही व अमेरिकेइतकी ताठरही नाही. भारतीय घटनादुरुस्तीची पध्दत कलम ३६८ मध्ये देण्यात आलेली आहे. एखाद्या साधारण मुद्यावर संसदेच्या साध्या बहुमताने घटनेत दुरुस्ती करण्यात येते मात्र राष्ट्रपतीची निवडणूक पध्दत केंद्र व प्रांत यांचे अधिकार, सर्वोच्च न्यायालय, उच्च न्यायालय, इ. महत्वपूर्ण बाबीविषयी घटनेत दुरुस्ती करताना संसदेच्या २/३ सदस्यांची अनुमती निम्म्याहून अधिक घटक राज्याच्या विधिमंडळाची अनुमती आवश्यक असते. त्यामुळे भारतीय घटना अंशत, परिवर्तनीय व अंशत परिदृढ अशा स्वरुपाची बनविण्यात आली आहे.
(७) मूलभूतहक्क
भारतीय राज्यघटनेत व्यक्तीच्या मूलभूत अधिकारावर भर देण्यात आला आहे. कलम १२ ते ३५ मध्ये मूलभूत हक्क्ांचा समावेश करण्यात आलेला आहे. स्वातंत्र्य समता शैक्षणिक व सांस्कृतिक हक्क, धार्मिक स्वातंत्र्य संपत्तीचा हक्क, पिळवणुकिविरुध्द हक्क इ. महत्वपूर्ण हक्क व्यक्तीला देण्यात आलेले आहेत. हक्काबरोबरच व्यक्तीला काही कर्तव्यही पार पाडावी लागतात. हक्क आणि कर्तव्य या एकाच नाण्याच्या दोन बाजू आहेत. घटनेत व्यक्तीच्या मूलभूत हक्कांचा समावेश हे घटनेचे महत्वाचे वैशिष्टे आहे.
(८) धर्मनिरपेक्ष राज्य
भारत हे धर्मातील राष्ट्र संबोधण्यात आले आहे. कोणत्याही विशिष्ट धर्माला राजाश्रय न देता सर्व धर्माना समान लेखण्यात आले आहे. प्रत्येकाला आपआपल्या धर्माप्रमाणे प्रार्थना करण्याचा, आचरण ठेवण्याचा अधिकार देण्यात आलेला आहे. सर्व धर्मीयांना समान लेखण्यात आले. असून धर्म, जात पंथ, याद्वारे भेदभाव न करता सर्वाना समान संधी देण्यात आली आहे.
(९) एकेरी नागरिकत्व
अमेरिकन व स्वित्झर्लंड या देशामध्ये केंद्र व प्रांत यांचे दुहेरी नागरिकत्व देण्यात आलेले आहे. भारतात संघराज्यात्मक पध्दतीचा स्वीकार केलेला असूनही केंद्राचे व घटक राज्याचे असे वेगळे नागरिकत्व व्यक्तीस देण्यात आलेले नाही. प्रत्येक भारतीय यास संघराज्याचे नागरिकत्व देण्यात आलेल आहे. राष्ट्रीय ऐक्य वाढीस लागावे यासाठी एकेरी नागरिकत्वाची पध्दत स्वीकारण्यात आली आहे.
(१०) एकच घटना
ज्याप्रमाणे एकेरी नागरिकत्वाच पुरस्कार करण्यात आलेला आहे. त्याप्रमाणेच देशातील सर्व नागरिकांसाठी एकाच घटनेची तरतूद करण्यात आली आहे. घटक राज्यांना स्वतंत्र अशी घटना बनविण्याचा अधिकार नाही. घटक राज्यांना संघराज्याबाहेर फुटून निघण्याचा अधिकार नाकारण्यात आलेला आहे.
(११) राज्यघटना हीच सर्वश्रेष्ठ
देशाचा सर्वोच्च कायदा म्हणजे त्या देशाची राज्यघटना होय. राज्यघटनेच्या सर्वश्रेष्ठत्वाला आव्हान देता येत नाही. राष्ट्रपती, राज्यपाल, न्यायाधीश, मंत्री यांना राज्यघटनेची एकनिष्ठ राहण्याबाबत शपथ घ्यावी लागते.
(१२) जनकल्याणकारी राज्याची निर्मिती
भारताचा राज्यकारभार जनतेने निवडून दिलेल्या प्रतिनिधींमार्फ़त चालतो. भारताचा राष्ट्रपती हा इंग्लंडच्या राजाप्रमाणे वंश परंपरेनुसार नसतो, तर अप्रत्यक्ष निवडणूक पध्दतीने निवडण्यात येतो. जनता आपणास हवे असणारे सरकार निर्माण करू शकते व हे सरकार जनकल्याणासाठी बांधील असते.
(१३) मार्गदर्शक तत्वे
व्यक्तीला मूलभूत हक्कांना कायदेशीर मान्यता असते. मूलभूत हक्कांची शासनाकडून किंवा एखाद्या व्यक्तीकडून पायमल्ली झाल्यास संबंधिताला न्यायालयात दाद मागता येते. मात्र मार्गदर्शक तत्वांच्या बाबतीत हे धोरण लागू पडत नाही. मार्गदर्शक तत्वे व्यक्तीला कल्याणासाठी असली तरी ती सरकारने पाळलीच पाहिजेत असे सरकारवर बंधन नसते. मार्गदर्शक तत्वे ही नावाप्रमाणे मार्ग दाखविण्यासाठी उपयुक्त ठरतात. भारतीय घटनेतील काही निवडक मार्गदर्शक तत्वे पुढीलप्रमाणे (१) जीवनावश्यक गोष्टी सर्वाना मिळाव्यात (२) राज्यातील सर्वासाठी एकच मुलकी कायदा असावा (३) राज्यातील सर्व स्त्री -पुरुषांना समान वेतन असावे. (४) १४ वर्षाखालील सर्व मुलांना सक्तीचे व मोफत शिक्षण असावे (५) संपत्तीचे केंद्रीकरण होऊ नये (६) देशातील साधनसंपज्ञ्ल्त्;ा्ीचे समाजहिताच्या दृष्टीने वाटप व्हावे. (७) दारुबंदी व इतर उपायांनी लोकांच्या आरोग्याचे रक्षण व्हावे.
(१४) स्वतंत्र न्यायालय व्यवस्था
लोकशाहीच्या यशस्वीतेसाठी न्यायालयांना स्वातंत्र्य असणे आवश्यक आहे. भारतास एकेरी न्यायव्यवस्था आहे. सुप्रीम कोर्ट, हाय कोर्ट, जिल्हा, कोर्ट व इतर दुय्यम न्यायालये यांची एक साखळी निर्माण करण्यात आली आहे. न्याय व्यवस्थेवर राजकीय सत्तेचा दबाब येऊ नये यासाठी विधिमंडळ व कार्यकारीमंडळ यांच्या पासून न्यायमंडळाची व्यवस्था स्वतंत्र करण्यात आली आहे. न्यायाधीशांची नेमणूक बदली, बढती, पगार, या सर्व गोष्टींना संरक्षण देऊन न्यायाधीशांकडून कार्यक्षम व निपक्षपाती न्यायाची अपेक्षा करण्यात आली आहे.
(१५) राष्ट्रपती व त्यांचे आणीबाणीचे अधिकार
भारताचा राष्ट्रपती घटनात्मक प्रमुख आहे. त्यांची निवड संसद सदस्य व विधानसभा सदस्यांकडून क्रमदेय निवड पध्दतीने होत असते. सर्व महत्वपूर्ण गोष्टी राष्ट्रपतींच्या नावे होत असल्या तरी प्रत्यक्षात मंत्रिमंडळाच्या हाती सज्ञ्ल्त्;ाा केंदि्रत झाली आहे. भारताच्या राष्ट्रपतीला कायदेविषयक अंमलबजावणीविषयक आर्थिक बाबीविषयी घटक राज्याविषयक, न्यायविषयक व संकटकाल विषयक अशा सहा प्रकारचे अधिकार देण्यात आलेले आहेत. भारतीय राष्ट्रपतीला मिळालेला संकटकाल विषयक अधिकार अत्यंत महत्वाचा आहे.
(१६) हिंदी भाषेस राष्ट्रभाषेचा दर्जा
भारतीय राज्यघटनेत भाषाविषयक धोरण स्पष्ट करण्यात आले आहे. अनुच्छेद ३४३ मध्ये स्पष्ट घोषणा करण्यात आली आहे की, भारत या संघराजयाची अधिकृत भाषा देवनागरीतील हिंदी ही राहील. प्रादेशिक राज्यकारभार ज्या त्या प्रादेशिक भाषेमधून चालविण्याबाबत घटनेत स्पष्ट करण्यात आले आहे. इंग्रजी एक जादा भाषा म्हणून राहील. आंतराष्ट्रीय व्यवहार व हिंदी समजू न शकणार्‍या राज्यांना केद्र सरकारशी व्यवहार करण्यासाठी इंग्रजीचा वापर करता येईल.
(१७) प्रौढ मताधिकार
भारतीय लोकशाहीने प्रौढ मतदार पध्दतीचा स्वीकार केलेला आहे. १८ वर्षावरील सर्व स्त्री पुरुषास मतदानाचा अधिकार देण्यात आलेला. आहे निवडणूक मंडळाची निर्मिती करण्यात आली आहे. लोकसंख्या व विस्ताराच्या दृष्टीने भारतासारख्या विशाल देशात प्रौढ मताताधिराने लोकशाहीचा प्रयोग राबविण्यात येत आहे. सनदी नोकरांच्या निवडीसाठी पब्लिक सर्व्हिस कमिशन (लोकसेवा अयोग मंडळ) ची स्थापना करण्यात आली